शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
Silver Returns: २५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता?
3
मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब?
4
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
5
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
6
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
7
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
8
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
9
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
11
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
12
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
13
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
14
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
15
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
16
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
17
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
18
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
19
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
20
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणाच्या रक्षणार्थ वृक्ष लागवड आवश्यक

By admin | Updated: June 20, 2016 01:58 IST

राज्यात १ जुलै २०१६ या एकाच दिवशी दोन कोटी वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे.

रामदास तडस : दोन कोटी वृक्ष लागवडीचा संकल्पवर्धा : राज्यात १ जुलै २०१६ या एकाच दिवशी दोन कोटी वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे. पर्यावरणाचे रक्षण व पृथ्वीच्या सुरक्षिततेकरिता वृक्षलागवड करणे गरजेचे आहे. या वृक्ष लागवडीकरिता सर्व शासकीय, निमशासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, उद्योजक, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, महाविद्यालये, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था तसेच वैयक्तिक या सर्व घटकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन खासदार रामदास तडस यांनी केले. वृक्षांच्या घटत्या संख्येमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. जागतिक तापमान व प्रदूषणात होणारी वाढ यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. हवामान, ऋतू बदल व त्यातून वारंवार उद्भवणारी दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाई यांची दाहकता व परिणामकारकता कमी करण्याचे मोठे आव्हान असल्याचेही खा. तडस यांनी नमूद केले आहे. सध्या पर्यावरण धोक्यात आले, अशा प्रकारची हाकाटी सतत ऐकत असतो; पण पर्यावरणाची बिघडलेली परिस्थिती सुधारणे कसे शक्य होईल, ती सुधारणा कशी करायची, याबद्दल कुणी फारसे बोलताना दिसत नाही. बिघडलेल्या पर्यावरणात सुधारणा करणे शक्य आहे काय, हा प्रश्न प्रत्येकाला सतावत आहे. महाराष्ट्र शासनाचे पाऊल पर्यावरणाचे रक्षण व पृथ्वीच्या सुरक्षिततेकरिता अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण एक रोपटे लावले तर ते ५० वर्षांपर्यंत आपल्याला १७.५० लाख रुपयांचे आॅक्सीजन, ४१ लाख रुपयांचे पाण्याचे रिसायकलींग, ३५ लाख रुपयांचे प्रदूषणावर नियंत्रण, दरवर्षी ३ किलो कार्बनडाय आॅक्साईड शोषण करते. ३ टक्के तापमान कमी करते. यामुळे प्रत्येकाने वृक्ष लागवड केली तर ते वृक्ष ५० वर्षे पर्यावरणाला मदत करतील. एक वृक्ष एवढी मदत करतो तर महाराष्ट्रात दोन कोटी वृक्ष लावल्यावर राज्य प्रदूषणमुक्त होण्यास मदत होईल. यासाठी प्रत्येकाने झाडे लावण्याचा संकल्प करावा, राज्य शासनाच्या २ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प बळकट करावे, असे आवाहनही खा. तडस यांनी केले.(कार्यालय प्रतिनिधी)