शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
2
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
3
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू
4
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
5
ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत असतानाच झाला स्फोट; पाकिस्तानमध्ये दहशतवाद्याचा बॉम्बस्फोटात मृत्यू
6
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
7
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
8
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
9
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
10
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
11
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
12
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
13
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
14
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
15
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
16
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
17
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
18
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
19
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
20
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?

पर्यावरणाच्या रक्षणार्थ वृक्ष लागवड आवश्यक

By admin | Updated: June 20, 2016 01:58 IST

राज्यात १ जुलै २०१६ या एकाच दिवशी दोन कोटी वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे.

रामदास तडस : दोन कोटी वृक्ष लागवडीचा संकल्पवर्धा : राज्यात १ जुलै २०१६ या एकाच दिवशी दोन कोटी वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे. पर्यावरणाचे रक्षण व पृथ्वीच्या सुरक्षिततेकरिता वृक्षलागवड करणे गरजेचे आहे. या वृक्ष लागवडीकरिता सर्व शासकीय, निमशासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, उद्योजक, स्थानिक स्वराज्य संस्था, शाळा, महाविद्यालये, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था तसेच वैयक्तिक या सर्व घटकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन खासदार रामदास तडस यांनी केले. वृक्षांच्या घटत्या संख्येमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. जागतिक तापमान व प्रदूषणात होणारी वाढ यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. हवामान, ऋतू बदल व त्यातून वारंवार उद्भवणारी दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाई यांची दाहकता व परिणामकारकता कमी करण्याचे मोठे आव्हान असल्याचेही खा. तडस यांनी नमूद केले आहे. सध्या पर्यावरण धोक्यात आले, अशा प्रकारची हाकाटी सतत ऐकत असतो; पण पर्यावरणाची बिघडलेली परिस्थिती सुधारणे कसे शक्य होईल, ती सुधारणा कशी करायची, याबद्दल कुणी फारसे बोलताना दिसत नाही. बिघडलेल्या पर्यावरणात सुधारणा करणे शक्य आहे काय, हा प्रश्न प्रत्येकाला सतावत आहे. महाराष्ट्र शासनाचे पाऊल पर्यावरणाचे रक्षण व पृथ्वीच्या सुरक्षिततेकरिता अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण एक रोपटे लावले तर ते ५० वर्षांपर्यंत आपल्याला १७.५० लाख रुपयांचे आॅक्सीजन, ४१ लाख रुपयांचे पाण्याचे रिसायकलींग, ३५ लाख रुपयांचे प्रदूषणावर नियंत्रण, दरवर्षी ३ किलो कार्बनडाय आॅक्साईड शोषण करते. ३ टक्के तापमान कमी करते. यामुळे प्रत्येकाने वृक्ष लागवड केली तर ते वृक्ष ५० वर्षे पर्यावरणाला मदत करतील. एक वृक्ष एवढी मदत करतो तर महाराष्ट्रात दोन कोटी वृक्ष लावल्यावर राज्य प्रदूषणमुक्त होण्यास मदत होईल. यासाठी प्रत्येकाने झाडे लावण्याचा संकल्प करावा, राज्य शासनाच्या २ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प बळकट करावे, असे आवाहनही खा. तडस यांनी केले.(कार्यालय प्रतिनिधी)