शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

शेतकऱ्यांच्या विकासासाठी निरोगी पशुधन आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:48 IST

ग्रामीण अर्थव्यवस्था मजबुत करण्यासाठी शेती आणि कृषी आधारित उद्योग संपन्न करावे लागतील. आणि ज्या पशुधनाच्या बळावर शेती संपन्न होवू शकते ते पशुधन निरोगी आणि सक्षम करणे गरजेचे आहे. शेतकºयांना मार्गदर्शन करण्यासाठी वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्टने पुढाकार घेतला आहे.

ठळक मुद्देसुधीर दिवे : आर्वी विधानसभा क्षेत्रात पशु तपासणी शिबीर

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : ग्रामीण अर्थव्यवस्था मजबुत करण्यासाठी शेती आणि कृषी आधारित उद्योग संपन्न करावे लागतील. आणि ज्या पशुधनाच्या बळावर शेती संपन्न होवू शकते ते पशुधन निरोगी आणि सक्षम करणे गरजेचे आहे. शेतकºयांना मार्गदर्शन करण्यासाठी वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्टने पुढाकार घेतला आहे. ३० नोव्हेंबरपासून आर्वी परिसरात मोफत पशुचिकित्सा व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्टचे मार्गदर्शक केंद्रीय जलसंधारण मंत्री यांचे विशेष सल्लागार सुधीर दिवे यांनी पत्रकार परिषदेत दिली. नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय, वर्धा जिल्हा पशुसंवर्धन विभाग यांच्या सहकार्याने राष्ट्रीय सेवा योजनेच्या या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाने पदव्युत्तर विभागाचे सुमारे २० डॉक्टर, पदवी प्रशिक्षण येणाºया अंतिम वर्षाचे सुमारे ५० डॉक्टर, पशुवैद्यकीय महाविद्यालयाने प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, वर्धा जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे सर्व डॉक्टर असे सुमारे १०० डॉक्टर तपासणी करतील.यासंदर्भात माहिती देतांना सुधीर दिवे पुढे म्हणाले की, सात दिवस विविध ठिकाणी ही शिबिरे होणार आहेत. मोफत तपासणी, शस्त्रक्रिया, लसीकरण व उपचारासोबतच तज्ज्ञ पशुचिकित्सक शेतकºयांना मार्गदर्शन करणार आहेत. जाजूवाडी आर्वी येथील आशिर्वाद मंगल कार्यालयात ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता शिबिराचे उद्घाटन पशुवैद्यक व मत्स विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशिष पातूरकर यांच्या हस्ते होईल. तसेच ३० नोव्हेंबरला आर्वी येथे गायी, म्हशी व इतर पशुधनासोबतच पाळीव प्राणी म्हणजे कुत्रा यावरही शस्त्रक्रीयेसह इतरही उपचार करण्यात येतील. १ डिसेंबरला साहूर, २ डिसेंबर विरुळ, ३ ला खरांगणा, ४ ला कन्नमवारग्राम, ५ ला नारा, ६ डिसेंबर रोजी रोहणा या ठिकाणी पशुवैद्यकीय रुग्णालयामध्ये सकाळी ७.३० वाजता शिबिरांना प्रारंभ होईल. समारोप ६ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता आशिर्वाद मंगल कार्यालय आर्वी येथे होणार आहे. समारोप कार्यक्रमाला पशुसंवर्धन विभाग पुणेचे आयुक्त डॉ. उमाकांत उमप उपस्थित राहणार आहे.आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यातील परिसरातील शेतकरी व पशुपालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सुधीर दिवे यांनी पत्रपरिषदेत केले. पशुपालकांनी नाव नोंदणीसाठी वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्टच्या आर्वी, आष्टी, कारंजा आणि तळेगाव येथील कार्यालयात संपर्क साधावा. पत्रपरिषदेला नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस. बन्नाळीकर, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजीव भोजने, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रज्ञा डायगव्हाणे, डॉ. सुनील सहातपुरे, डॉ. वसुनाथे उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरी