शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या विकासासाठी निरोगी पशुधन आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:48 IST

ग्रामीण अर्थव्यवस्था मजबुत करण्यासाठी शेती आणि कृषी आधारित उद्योग संपन्न करावे लागतील. आणि ज्या पशुधनाच्या बळावर शेती संपन्न होवू शकते ते पशुधन निरोगी आणि सक्षम करणे गरजेचे आहे. शेतकºयांना मार्गदर्शन करण्यासाठी वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्टने पुढाकार घेतला आहे.

ठळक मुद्देसुधीर दिवे : आर्वी विधानसभा क्षेत्रात पशु तपासणी शिबीर

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : ग्रामीण अर्थव्यवस्था मजबुत करण्यासाठी शेती आणि कृषी आधारित उद्योग संपन्न करावे लागतील. आणि ज्या पशुधनाच्या बळावर शेती संपन्न होवू शकते ते पशुधन निरोगी आणि सक्षम करणे गरजेचे आहे. शेतकºयांना मार्गदर्शन करण्यासाठी वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्टने पुढाकार घेतला आहे. ३० नोव्हेंबरपासून आर्वी परिसरात मोफत पशुचिकित्सा व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्टचे मार्गदर्शक केंद्रीय जलसंधारण मंत्री यांचे विशेष सल्लागार सुधीर दिवे यांनी पत्रकार परिषदेत दिली. नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय, वर्धा जिल्हा पशुसंवर्धन विभाग यांच्या सहकार्याने राष्ट्रीय सेवा योजनेच्या या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाने पदव्युत्तर विभागाचे सुमारे २० डॉक्टर, पदवी प्रशिक्षण येणाºया अंतिम वर्षाचे सुमारे ५० डॉक्टर, पशुवैद्यकीय महाविद्यालयाने प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, वर्धा जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे सर्व डॉक्टर असे सुमारे १०० डॉक्टर तपासणी करतील.यासंदर्भात माहिती देतांना सुधीर दिवे पुढे म्हणाले की, सात दिवस विविध ठिकाणी ही शिबिरे होणार आहेत. मोफत तपासणी, शस्त्रक्रिया, लसीकरण व उपचारासोबतच तज्ज्ञ पशुचिकित्सक शेतकºयांना मार्गदर्शन करणार आहेत. जाजूवाडी आर्वी येथील आशिर्वाद मंगल कार्यालयात ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता शिबिराचे उद्घाटन पशुवैद्यक व मत्स विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशिष पातूरकर यांच्या हस्ते होईल. तसेच ३० नोव्हेंबरला आर्वी येथे गायी, म्हशी व इतर पशुधनासोबतच पाळीव प्राणी म्हणजे कुत्रा यावरही शस्त्रक्रीयेसह इतरही उपचार करण्यात येतील. १ डिसेंबरला साहूर, २ डिसेंबर विरुळ, ३ ला खरांगणा, ४ ला कन्नमवारग्राम, ५ ला नारा, ६ डिसेंबर रोजी रोहणा या ठिकाणी पशुवैद्यकीय रुग्णालयामध्ये सकाळी ७.३० वाजता शिबिरांना प्रारंभ होईल. समारोप ६ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता आशिर्वाद मंगल कार्यालय आर्वी येथे होणार आहे. समारोप कार्यक्रमाला पशुसंवर्धन विभाग पुणेचे आयुक्त डॉ. उमाकांत उमप उपस्थित राहणार आहे.आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यातील परिसरातील शेतकरी व पशुपालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सुधीर दिवे यांनी पत्रपरिषदेत केले. पशुपालकांनी नाव नोंदणीसाठी वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्टच्या आर्वी, आष्टी, कारंजा आणि तळेगाव येथील कार्यालयात संपर्क साधावा. पत्रपरिषदेला नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस. बन्नाळीकर, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजीव भोजने, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रज्ञा डायगव्हाणे, डॉ. सुनील सहातपुरे, डॉ. वसुनाथे उपस्थित होते.

टॅग्स :Farmerशेतकरी