शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

शिंदे-फडणवीस सरकार वोक्के, पण जनतेचे जीवन झाले फिक्के; वर्ध्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा हल्लाबोल

By अभिनय खोपडे | Updated: September 1, 2022 18:15 IST

वर्धेच्या छत्रपती शिवाजी पुतळ्याजवळ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

वर्धा : ऐन सनासुदीच्या काळात  महागाईने उच्चांक गाठला आहे. सामान्य जनता साध जीवन जगण्यासाठी संघर्ष करत आहे. असे असतांना नव्याने आलेलं शिंदे-फडणवीस सरकार केवळ उत्सवात दंग असून, पोकळ घोषणा करीत आहे. याच्या निषेधार्थ आज (दि. १) वर्धेच्या छत्रपती शिवाजी पुतळ्याजवळ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

वर्धा जिल्हा हा पूरग्रस्त असून शेतकरी विजेच्या तार तोंडात घेवून, नदीत उडी मारून आत्महत्या करीत आहे. पण या खोकेबहाद्दर सरकारला, व त्यांच्या आमदार खासदार यांना मात्र स्वत:च्या मंत्रिपदाच्या भाऊगर्दित फुर्सत नाही. पन्नास खोके, शिंदे सरकार वोक्के, महागाईकडे दुर्लक्ष करणार्‍या शिंदे भाजप सरकारचा निषेध असो, अशा घोषणा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिल्या.

राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, यांनी राष्ट्रवादी जिल्हा काॅंग्रेसचे अध्यक्ष सुनिल राऊत व युवकचे अध्यक्ष संदीप किटे यांचे नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. नवे शिंदे-फडणवीसांचे हे खोके सरकार केवळ आश्वासन देणारे सरकार आहे. मेट्रो, गुजरातची मेट्रो ट्रेन, विविध स्मारके यांचेसाठी हजारो कोटी खर्च करण्यासाठी यांच्याजवळ पैसे आहेत. पण सामान्यांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी मात्र उपाय नाहीत, उपाययोजना नाहीत.

शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या पुस्तक पेनवर कर लावणार हे भाजपचं सरकार, आतापर्यंत देशातील व महाराष्ट्रातील अतिशय नालायक व जनविरोधी सरकार आहे. शेतकर्‍यांना छत्रपती शिवाजी महाराजांच नाव घेवून, शपथ देवून आत्महत्या करू नका, असा उपदेश देणारे मुख्यमंत्री फक्त नौटंकी करून, केवळ आपल्या पक्षाच्या आमदारांना हजारो कोटी वाटत आहेत आणि शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडत आहे, असे आरोप करत शिंदे व फडणवीस सरकारचा राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वतीने, जाहीर निषेध करण्यात आला.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसwardha-acवर्धा