शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

शेताला आले तलावाचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 00:23 IST

देवळी तालुक्यातील चिखली येथील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी अडविण्यात आल्यामुळे लगतच्या शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान होत आहे. महसूल विभागाने शेतातील पाणी वाहून जाण्याचा मार्ग मोकळा करावा, याबाबत देवळी तहसीलदारांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ठळक मुद्देचिखली येथील घटना : पिकांचे नुकसान, तहसीलदारांकडे तक्रार; पाण्याचा मार्ग मोकळा करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : देवळी तालुक्यातील चिखली येथील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी अडविण्यात आल्यामुळे लगतच्या शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान होत आहे. महसूल विभागाने शेतातील पाणी वाहून जाण्याचा मार्ग मोकळा करावा, याबाबत देवळी तहसीलदारांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. कार्यवाहीकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे.देवळी तालुक्यातील चिखली येथील शेतकरी चंद्रशेखर महादेव थूल यांच्या शेतातील पाणी वाहून जाण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यांचे मौजा चिखली येथे शेत सर्व्हे क्रमांक ३९७ असून यांच्या शेताच्या खालील बाजूस पूर्व दिशेने तक्रारकर्त्याचे शेत आहे.२०१७ साली शेत दुरुस्ती योजनेअंतर्गत विकासाच्या बांध्या शेतामधून करण्यात आल्या होत्या. त्यामुळे शेतकºयांच्या शेतातील पाणी हे सरळ बांधाने वाहून जात असे. तसेच कालव्यावर पुलाचेदेखील बांधकाम करण्यात आले होते.मात्र, पूर्व दिशेने शेती असलेल्या शेतकºयाने कालव्याच्या पुलावर स्वखर्चाने मुरमाचा भरावा टाकला. परिणामी, पावसाळ्यातील येणारे पाणी वाहून जाण्यात अडथळा निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी शेतातच साचून राहते. यामुळे शेतकºयाच्या शेतातील उभ्या पिकाचे नुकसान होत आहे. तसेच शेती व्यवसायावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आहे. पुलावर टाकलेला भरावा त्वरित हटवावा व शेतात साचलेले पाणी वाहून जाण्याचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी शेतकरी चंद्रशेखर थूल यांनी प्रशासनाकडे केली आहे.पिके धोक्यात; नुकसान भरपाई देणार कोण?सेवाग्राम - शेती जगण्याचे साधन असून वर्षभर शेतात राबून शेती पिकविण्यासाठी शेतकºयांची धडपड सुरू आहे. पावसामुळे पिकांना उभारी मिळाली. मात्र, रस्त्याच्या कामामुळे बांधा बुजविण्यात आल्याने शेती जलमय झाल्याची माहिती चाणकी येथील अरविंद पन्नासे आणि श्रीकांत राऊत यांनी दिली. सेवाग्राम ते हमदापूर, पुढे काढळीपर्यंत रस्त्याचे काम सुरू आहे. यात काही ठिकाणी दोन्ही बाजूने तर काही ठिकाणी एका बाजूने रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शिवनगर ते हमदापूर या दरम्यान तीन ठिकाणी पुलाचे काम करण्यात आल्याने वाहनांकरिता सुविधेचे झालेले आहे. पण, रस्त्याच्या रूंदीकरणात मुरमाचा भराव देण्यात आला. यात चाणकी शिवारात रस्त्याच्या बाध्या चक्क बुजवून रस्ता वाढविण्यात आला. तर राऊत आणि पन्नासे यांच्या शेताजवळील पाटबंधारे विभागाचा ढोला मुरमाने बुजविण्यात आला. पाच दिवस सतत पाऊस झाल्याने पाण्याला पुढे जाण्यास वाटच मिळाली नसल्याने पºहाटी, सोयाबीन पीक असलेल्या शेताला तलावाचे स्वरूप आलेले आहे. पिके धोक्यात आल्याने शेतकरी संतापले आहेत.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती