शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
5
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
6
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
8
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
9
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
10
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
11
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
12
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
13
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
14
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
15
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
16
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
17
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
18
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
19
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
20
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?

शेताला आले तलावाचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 00:23 IST

देवळी तालुक्यातील चिखली येथील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी अडविण्यात आल्यामुळे लगतच्या शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान होत आहे. महसूल विभागाने शेतातील पाणी वाहून जाण्याचा मार्ग मोकळा करावा, याबाबत देवळी तहसीलदारांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ठळक मुद्देचिखली येथील घटना : पिकांचे नुकसान, तहसीलदारांकडे तक्रार; पाण्याचा मार्ग मोकळा करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : देवळी तालुक्यातील चिखली येथील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी अडविण्यात आल्यामुळे लगतच्या शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान होत आहे. महसूल विभागाने शेतातील पाणी वाहून जाण्याचा मार्ग मोकळा करावा, याबाबत देवळी तहसीलदारांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. कार्यवाहीकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे.देवळी तालुक्यातील चिखली येथील शेतकरी चंद्रशेखर महादेव थूल यांच्या शेतातील पाणी वाहून जाण्याचा मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यांचे मौजा चिखली येथे शेत सर्व्हे क्रमांक ३९७ असून यांच्या शेताच्या खालील बाजूस पूर्व दिशेने तक्रारकर्त्याचे शेत आहे.२०१७ साली शेत दुरुस्ती योजनेअंतर्गत विकासाच्या बांध्या शेतामधून करण्यात आल्या होत्या. त्यामुळे शेतकºयांच्या शेतातील पाणी हे सरळ बांधाने वाहून जात असे. तसेच कालव्यावर पुलाचेदेखील बांधकाम करण्यात आले होते.मात्र, पूर्व दिशेने शेती असलेल्या शेतकºयाने कालव्याच्या पुलावर स्वखर्चाने मुरमाचा भरावा टाकला. परिणामी, पावसाळ्यातील येणारे पाणी वाहून जाण्यात अडथळा निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी शेतातच साचून राहते. यामुळे शेतकºयाच्या शेतातील उभ्या पिकाचे नुकसान होत आहे. तसेच शेती व्यवसायावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आहे. पुलावर टाकलेला भरावा त्वरित हटवावा व शेतात साचलेले पाणी वाहून जाण्याचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी शेतकरी चंद्रशेखर थूल यांनी प्रशासनाकडे केली आहे.पिके धोक्यात; नुकसान भरपाई देणार कोण?सेवाग्राम - शेती जगण्याचे साधन असून वर्षभर शेतात राबून शेती पिकविण्यासाठी शेतकºयांची धडपड सुरू आहे. पावसामुळे पिकांना उभारी मिळाली. मात्र, रस्त्याच्या कामामुळे बांधा बुजविण्यात आल्याने शेती जलमय झाल्याची माहिती चाणकी येथील अरविंद पन्नासे आणि श्रीकांत राऊत यांनी दिली. सेवाग्राम ते हमदापूर, पुढे काढळीपर्यंत रस्त्याचे काम सुरू आहे. यात काही ठिकाणी दोन्ही बाजूने तर काही ठिकाणी एका बाजूने रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शिवनगर ते हमदापूर या दरम्यान तीन ठिकाणी पुलाचे काम करण्यात आल्याने वाहनांकरिता सुविधेचे झालेले आहे. पण, रस्त्याच्या रूंदीकरणात मुरमाचा भराव देण्यात आला. यात चाणकी शिवारात रस्त्याच्या बाध्या चक्क बुजवून रस्ता वाढविण्यात आला. तर राऊत आणि पन्नासे यांच्या शेताजवळील पाटबंधारे विभागाचा ढोला मुरमाने बुजविण्यात आला. पाच दिवस सतत पाऊस झाल्याने पाण्याला पुढे जाण्यास वाटच मिळाली नसल्याने पºहाटी, सोयाबीन पीक असलेल्या शेताला तलावाचे स्वरूप आलेले आहे. पिके धोक्यात आल्याने शेतकरी संतापले आहेत.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती