शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
2
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
3
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
4
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
5
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
6
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
7
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
8
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
9
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
10
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
11
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
12
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
13
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
14
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
15
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
16
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
17
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
18
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
19
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
20
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू

देशी जवस तेलाची लज्जतच न्यारी! वर्धा जिल्ह्यातील गिरड प्रसिद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 14:53 IST

तेलस्वराज्य चळवळीच्या माध्यमातून नागरिकांना आणि शासनाला जागृत करण्यासाठी वर्ध्याच्या मगन संग्रहालयाने जवस उत्पादन प्रक्रिया तेल विक्री पुनर्जीवित केले आहे.

ठळक मुद्देजवस उत्पादन प्रक्रिया तेल विक्री पुनर्जीविततेल स्वराज्य चळवळीला गती मगन संग्रहालयाचा उपक्रम

सुधीर खडसे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : एकेकाळी अन्नधान्याच्या कौटुंबिक गरजा शेतीतून पूर्ण व्हायच्या. बाजारातून गूळ आणि मीठ घेतले की, ग्रामीण जनतेचा प्रपंच चालायचा. मात्र, आता सर्वच जीवनोपयोगी वस्तूंविषयी परावलंबी झाले आहेत. सध्या खाद्य तेलात होत असणाऱ्या भेसळीमुळे कोणते तेल खावे, याचा प्रत्येकालाच पेच पडला आहे. तेलस्वराज्य चळवळीच्या माध्यमातून नागरिकांना आणि शासनाला जागृत करण्यासाठी वर्ध्याच्या मगन संग्रहालयाने जवस उत्पादन प्रक्रिया तेल विक्री पुनर्जीवित केले आहे. गिरड येथे नैसर्गिक शेती विकास केंद्रात तेल उत्पादन केले जात आहे. खाद्यपदार्र्थाच्या चवीतून गेलेली देशी तेलाची गोडी पुन्हा परतल्याने जवस तेलाला पसंती मिळत आहे.संपूर्ण विदर्भात अन्नधान्याची एकीकाळी समृद्धी होती. मात्र, कालांतराने एकल पीक पद्धतीमुळे मिश्र शेतीचा ºहास झाला असताना पारंपरिक पीकपद्धती टिकवून ठेण्यासाठी मगन संग्रहालय समितीने चळवळ सुरू केली आहे. नामशेष झालेल्या जवसाची लागवड ते तेल उत्पादन करीत बापूंच्या तेल घाणीला तेलस्वराज्य चळवळीतून उभारी दिली आहे.गिरड येथील मगन संग्रहालयाच्या नैसर्गिक शेती विकास केंद्रात ही बापूंची घाणी सुरू करण्यात आल्याने शेतकऱ्यांचा जवस लागवडीकडे कल वाढला आहे. जवस उत्पादन ते शुद्ध तेलनिर्मिती प्रक्रियेमुळे ग्राहकांकडून पसंती मिळत आहे. यामुळे आता जवस पिकाला ‘अच्छे दिन’ येत आहेत.जिल्ह्यात पूर्वी जवस पेरा क्षेत्र कमालीचे होते. गावोगावी तेल घाण्या असायच्या. मात्र, आता सर्वच जीवनोपयोगी वस्तूंविषयी परावलंबी झाले आहे. गेल्या दशकात कृषी विभागाच्या शासकीय अहवालातील तेल बीज व जवस पेºयाचा आकडा शून्य आहे. मात्र, मगन संग्रहालय समितीच्यावतीने जवस बियाणे संवर्धनाचे काम हाती घेण्यात आल्याने यावर्षी ४० एकरात जवस पेरणी क्षेत्र आहे.बाजारातून मिळणाऱ्या तेलात मोठी भेसळ करण्यात येत असल्याने त्याचे दुष्परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे. तसा शासकीय आरोग्य यंत्रणेचा अहवाल असला तरी महागाईच्या काळात स्वस्त मिळेल तेच तेल नियमित स्वयंपाकात वापरले जात आहे. याचाच विपरीत परिणाम तेल घाणी व्यवसायावर झाल्याने अखेरची घरघर लागली. मात्र, आता नागरिकांना जवस तेलाचे महत्त्व पटू लागल्याने उत्पादनापेक्षा मागणी वाढल्याची माहिती नैसर्गिक शेती विकास केंद्राचे प्रमुख गजानन गारघाटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

तेल स्वराज्य आंदोलनाच्या माध्यमातून खाद्य तेलाच्या धोरणासंदर्भात सरकारकडे रास्त मागण्या केल्या. ताजे शुद्ध तेल काढणाऱ्या घाण्यावर कुठलेही निर्बंध लावू नये, आरोग्याला घातक विदेशी तेलाच्या आयातीवर बंदी घालावी, तेल विकणाºया बहुराष्ट्रीय कंपन्यांना प्रतिबंधित करावे, प्रशासनाकडून विदेशी खाद्य तेलापासून मानवी शरीरावर होणारे घातक परिणामाविषयी जनजागृती करावी. विदेशी तेलावर जी.एम. सोयाबीन, बी.टी. सरकीपासून बनलेले तेल असा स्पष्ट उल्लेख करावा, तेलातील भेसळ व त्याचे प्रमाण स्पष्ट पाकिटावर लिहावे, या तेलामुळे होणारे शारीरिक व मानसिक नुकसान नमूद करावी, आदी मागण्यांसंदर्भात शासनाने सजग राहून नागरिकांच्या जीवनाशी होणारा खेळ थांबवावा, अशी मागणी केलेली आहे.डॉ.विभा गुप्ताअध्यक्ष, मगन संग्रहालय समिती, वर्धा

 

 

टॅग्स :agricultureशेती