शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
2
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
3
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
4
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
5
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
6
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
7
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
8
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
9
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
10
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
11
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
12
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
13
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
14
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
15
इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
16
Lionel Messi: सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
17
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
18
शोएब मलिकचं तिसरं लग्नही मोडण्याच्या मार्गावर? सना जावेदसोबतच्या नात्यात दुरावा 
19
"आम्ही थांबणार नाही..", दुसऱ्या बाळाच्या जन्माआधीच भारती सिंग करतेय तिसऱ्या बाळाचं प्लानिंग? पती हर्ष म्हणाला...
20
Stock Market Holidays: पुढच्या वर्षी १५ दिवस बंद राहणार शेअर बाजार, पाहा NSE मध्ये सुट्ट्या कधी, पाहा लिस्ट
Daily Top 2Weekly Top 5

नारीशक्ती वंदन कायदा स्वागतार्ह; पण तो महिलांची थट्टा करणाराच, योगेंद्र यादव यांची टीका

By महेश सायखेडे | Updated: October 2, 2023 15:39 IST

आरक्षण २०३८ पर्यंत लागू होणे नाहीच

वर्धा : लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळावे यासाठी मोदी सरकारने आणलेले नारी शक्ती वंदन विधेयक २७ वर्षानंतर आणल्या गेल्याने त्याचे आपण स्वागतच केले. या विधेयकामुळे महिलांना १५ वर्षांसाठी आरक्षण मिळणार असले तरी ते किमान २०३८ पर्यंत तरी लागू होणे शक्य नाही असे चित्र असल्याने हे विधेयक महिलांची थट्टा करणारेच आहे, अशी टीका भारत जोडो अभियानचे राष्ट्रीय संयोजक योगेंद्र यादव यांनी वर्धा येथे पत्रकारांशी संवाद साधताना केली.

योगेंद्र यादव पुढे म्हणाले, लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळावे यासाठी केंद्रातील मोदी सरकारने नारी शक्ती वंदन विधेयक आणले. पण याच विधेयकाचे सूक्ष्म निरीक्षण केल्यावर त्यात प्रामुख्याने तीन त्रुट्या आढळून आल्या आहेत. या विधेयकानुसार महिलांना लोकसभा आणि विधानसभांमध्ये १५ वर्षांसाठी आरक्षण मिळणार असून २०२९ मध्ये हे लागू करण्यात येईल असे केंद्रातील मोदी सरकारकडून सांगण्यात येत आहे. पण २०२३ मध्ये भारतील जनगणनेचे आकडेवारी जाहीर होईल.

शिवाय डी-लिमिटेशनची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करणे याला वेळच लागणार आहे. त्यामुळे आरक्षण लागू व्हायला किमान २०३८ मावळेल. तर आरक्षण कुणाला मिळेल यासह ओबीसी विषयी हे विधेयक मौन आहे. शिवाय आरक्षण कसे देईल, रोटेशन कसे याचीही स्पष्टता नाही असेही यावेळी योगेंद्र यादव यांनी स्पष्ट केले.२०२४ ची निवडणूक लढणार नाही, केवळ कार्यकर्ता जोडणारभारत जोडोत १५० हून अधिक विविध संघटन एकत्र आले. देश व संविधान वाचविण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. पंधरा राज्यात संमेलन व संघटन बांधणी झाली होत आहे. २०२४ च्या निवडणुका आम्ही लढणार नाही. पण कार्यकर्ता जोडून केंद्रातील भाजप-आरएसएसच्या सरकारला हरवण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करू. देश व संविधान वाचविण्यासाठी ते आज गरचेचे आहे. जीतेगा इंडिया या अभियानात सव्वा लाखहून अधिक स्वयंसेवक जूळत प्रशिक्षित झाले आहे. त्यांच्यावर सोपविलेल्या कार्यक्षेत्रात ते मोदी सरकारचे खोटेपण उघड करणार आहे. त्याचा प्रतिकात्मक श्रीगणेशा आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची कर्मभूमी राहिलेल्या वर्धा जिल्ह्यातून होत आहे.

गांधींची विरासत हडपण्याचा प्रयत्न होत आहे. गांधींची हत्या करणारेच विरासत हडपत आहे. मोदीला हरवण्यासाठी इंडिया गठबंधन गठीत झाले आहे. त्यामुळे भाजपमध्ये खळबळही निर्माण झाली असल्याचे पत्रकार परिषदेत भारत जोडो अभियानचे राष्ट्रीय संयोजक योगेंद्र यादव यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रदिप खेलुरकर, अविनाश काकडे, कन्हैया छांगानी, सुधीर पांगुल, सुदाम पवार, प्रवीण काटकर, मजीद कुरेशी आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Yogendra Yadavयोगेंद्र यादवwardha-acवर्धाPoliticsराजकारणWomen Reservationमहिला आरक्षण