शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
3
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
4
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
5
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
6
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
7
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
8
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
9
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
10
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
11
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
12
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
13
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
14
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
15
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
16
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
17
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
19
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
20
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी

नारीशक्ती वंदन कायदा स्वागतार्ह; पण तो महिलांची थट्टा करणाराच, योगेंद्र यादव यांची टीका

By महेश सायखेडे | Updated: October 2, 2023 15:39 IST

आरक्षण २०३८ पर्यंत लागू होणे नाहीच

वर्धा : लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळावे यासाठी मोदी सरकारने आणलेले नारी शक्ती वंदन विधेयक २७ वर्षानंतर आणल्या गेल्याने त्याचे आपण स्वागतच केले. या विधेयकामुळे महिलांना १५ वर्षांसाठी आरक्षण मिळणार असले तरी ते किमान २०३८ पर्यंत तरी लागू होणे शक्य नाही असे चित्र असल्याने हे विधेयक महिलांची थट्टा करणारेच आहे, अशी टीका भारत जोडो अभियानचे राष्ट्रीय संयोजक योगेंद्र यादव यांनी वर्धा येथे पत्रकारांशी संवाद साधताना केली.

योगेंद्र यादव पुढे म्हणाले, लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळावे यासाठी केंद्रातील मोदी सरकारने नारी शक्ती वंदन विधेयक आणले. पण याच विधेयकाचे सूक्ष्म निरीक्षण केल्यावर त्यात प्रामुख्याने तीन त्रुट्या आढळून आल्या आहेत. या विधेयकानुसार महिलांना लोकसभा आणि विधानसभांमध्ये १५ वर्षांसाठी आरक्षण मिळणार असून २०२९ मध्ये हे लागू करण्यात येईल असे केंद्रातील मोदी सरकारकडून सांगण्यात येत आहे. पण २०२३ मध्ये भारतील जनगणनेचे आकडेवारी जाहीर होईल.

शिवाय डी-लिमिटेशनची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करणे याला वेळच लागणार आहे. त्यामुळे आरक्षण लागू व्हायला किमान २०३८ मावळेल. तर आरक्षण कुणाला मिळेल यासह ओबीसी विषयी हे विधेयक मौन आहे. शिवाय आरक्षण कसे देईल, रोटेशन कसे याचीही स्पष्टता नाही असेही यावेळी योगेंद्र यादव यांनी स्पष्ट केले.२०२४ ची निवडणूक लढणार नाही, केवळ कार्यकर्ता जोडणारभारत जोडोत १५० हून अधिक विविध संघटन एकत्र आले. देश व संविधान वाचविण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. पंधरा राज्यात संमेलन व संघटन बांधणी झाली होत आहे. २०२४ च्या निवडणुका आम्ही लढणार नाही. पण कार्यकर्ता जोडून केंद्रातील भाजप-आरएसएसच्या सरकारला हरवण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करू. देश व संविधान वाचविण्यासाठी ते आज गरचेचे आहे. जीतेगा इंडिया या अभियानात सव्वा लाखहून अधिक स्वयंसेवक जूळत प्रशिक्षित झाले आहे. त्यांच्यावर सोपविलेल्या कार्यक्षेत्रात ते मोदी सरकारचे खोटेपण उघड करणार आहे. त्याचा प्रतिकात्मक श्रीगणेशा आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची कर्मभूमी राहिलेल्या वर्धा जिल्ह्यातून होत आहे.

गांधींची विरासत हडपण्याचा प्रयत्न होत आहे. गांधींची हत्या करणारेच विरासत हडपत आहे. मोदीला हरवण्यासाठी इंडिया गठबंधन गठीत झाले आहे. त्यामुळे भाजपमध्ये खळबळही निर्माण झाली असल्याचे पत्रकार परिषदेत भारत जोडो अभियानचे राष्ट्रीय संयोजक योगेंद्र यादव यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रदिप खेलुरकर, अविनाश काकडे, कन्हैया छांगानी, सुधीर पांगुल, सुदाम पवार, प्रवीण काटकर, मजीद कुरेशी आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Yogendra Yadavयोगेंद्र यादवwardha-acवर्धाPoliticsराजकारणWomen Reservationमहिला आरक्षण