शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
5
Operation Sindoor Live Updates: आम्हाला दहशतवाद संपवायचाय, तुम्ही धाडस करा, कपिल सिब्बल यांचा मोदींवर निशाणा
6
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
7
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
8
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
10
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
11
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
12
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
13
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
14
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
15
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
16
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
17
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
18
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
19
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
20
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?

सर्वांच्या हितात माझे हित हीच ग्रामजयंती

By admin | Updated: November 16, 2016 00:58 IST

सर्वांच्या भलाईचा विचार घेवून ज्ञान आणि दानातून कार्यरत राहणाऱ्याची समाजाने प्रत्येक वेळेस दखल घेतली आहे.

मोहनलाल अग्रवाल : सर्वधर्मीय ग्रामजयंतीचा समारोपदेवळी : सर्वांच्या भलाईचा विचार घेवून ज्ञान आणि दानातून कार्यरत राहणाऱ्याची समाजाने प्रत्येक वेळेस दखल घेतली आहे. सर्वांच्या हितात माझे हित आहे. हा हेतूच ग्रामजयंती साजरा करणारा आहे. त्यामुळे परस्परामध्ये बंधूभावाची व एकात्मतेची भावना रूजविणे गरजेचे झाले आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक मोहनलाल अग्रवाल यांनी व्यक्त केले. सर्वधर्मिय ग्रामजयंती समाप्ती कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस उपअधीक्षक रवींद्र किल्लेवार, तुकारामदास घोडे महाराज, शास्त्री सोशल फोरमचे ईमरान राही, अनिल नरेडी, पोलीस निरीक्षक चंद्रकांत मदने यांची उपस्थिती होती. संताची शिकवण व त्यांच्या पे्ररणादायी विचारात समाजाची उन्नती आहे. प्रांतवाद व भाषावाद बाजूला सारून सद्भावना रूजविणे गरजेचे झाले आहे, असे मत जिल्हा पोलीस उपअधीक्षक आर. किल्लेवार यांनी व्यक्त केले. सामाजिक कार्यात उल्लेखनीय काम केल्याबद्दल पुलगावचे प्यारेलाल रामटेके यांचा यावेळी शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन दीपक अग्रवाल यांनी तर आभार महेश अग्रवाल यांनी व्यक्त केले. यावेळी प्रा. गणेश मालधुरे, माजी प्राचार्य दयानंद कात्रे, विजय पेटकर, सुरेश तायवाडे, जगदीश गावंडे, विजय पिंपळकर, शाम घोडे, वसंत खोडे, वसंत जगताप, रत्नाकर कल्याणी, येसनखेडे, नेने महाराज आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)