शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

नगराध्यक्षांनी जाणली ‘धाम’ प्रकल्पाची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 23:38 IST

शहरातील नागरिकांना सध्या पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. अशातच महाकाळी येथील धाम प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा संपल्याने आणि याच जलाशयातील मृत जलसाठ्याची उचल करण्याच्या दृष्टीने करावयाच्या असलेल्या उपाययोजनांची माहिती नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी प्रत्यक्ष महाकाळी गाठून जाणून घेतली.

ठळक मुद्देमृत जलसाठ्याची होणार उचल : उपयुक्त जलसाठा संपला, जलसंकटावर मात करण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील नागरिकांना सध्या पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. अशातच महाकाळी येथील धाम प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा संपल्याने आणि याच जलाशयातील मृत जलसाठ्याची उचल करण्याच्या दृष्टीने करावयाच्या असलेल्या उपाययोजनांची माहिती नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी प्रत्यक्ष महाकाळी गाठून जाणून घेतली.महाकाळी येथील धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्याची पवनार व येळाकेळी येथील धाम नदीच्या पात्रातून उचल करून वर्धा शहरातील नागरिकांना वर्धा न.प. प्रशासन तर वर्धा शहराशेजारी १३ गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा करते. परंतु, मागील वर्षी झालेल्या अल्प पर्जन्यमानामुळे हिवाळ्याच्या दिवसातच धाम प्रकल्पातील उपयुक्त जलसाठ्याचे नियोजन जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून वर्धा पाटबंधारे विभागाने केले. तेव्हापासून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत धाम प्रकल्पातून वेळोवेळी उपयुक्त जलसाठा सोडण्यात आला. परंतु, तो आता संपल्याने नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या निकाली काढण्यासाठी मृत जलसाठ्याची उचल केली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी गुरूवारी महाकाली येथील धाम प्रकल्पाला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली.शिवाय मृत जलसाठ्याची उचल करण्यासाठी काय उपाययोजना आहेत, याची माहिती जाणून घेतली. याप्रसंगी नगरसेवक गोपी त्रिवेदी, नगरसेवक सोनल ठाकरे, नगरसेवक कैलास राखडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय दैने, वर्धा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, वर्धा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस. बी. काळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता वाघ, झलके, महावितरणचे अधीक्षक अभियंता वानखेडे, मजिप्राचे उमाडे, मिलिंद बंडीवार, न.प. पाणी पुरवठा विभागाचे अभियंता नंदनवार, कुंभारे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पwater shortageपाणीटंचाई