शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळल्या
2
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
3
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
4
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
5
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
6
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
7
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
8
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
9
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
10
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
11
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
12
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली
13
“मला काही बोला, पण माझ्या मुलीचा काय दोष?”; ट्रोलिंगमुळे इंदुरीकर महाराज आता कीर्तन सोडणार?
14
IND vs SA: मोहम्मद शमी Team India मध्ये का नाही? कर्णधार गिलने २ जणांची नावं घेत दिलं उत्तर
15
तुम्हीही 'डिजिटल गोल्ड' खरेदी करता का? आता सेबीचा इशारा, गुंतवणूकदारांनी काय करावं?
16
IND vs SA: " ईडन गार्डन्स माझ्यासाठी दुसरे घर!" कोलकाता कसोटीपूर्वी शुभमन गिल झाला भावूक!
17
बिल्डिंग नंबर १७, खोली क्रमांक १३; अल फलाह विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्येच बनवला 'टेरर अड्डा'
18
"दिग्गज अभिनेत्याचा तमाशा बनवला आहे...", करण जोहर भडकला; म्हणाला, 'हा अपमान...'
19
Video: कपलच्या रोमॅन्टिक फोटोशूटमध्ये 2 सेकंदासाठी आला 'तो' व्यक्ती; व्हिडिओ प्रचंड व्हायरल...
20
i20, इकोस्पोर्ट्स आणि आता Brezza कार सापडली: दिल्ली हादरवण्याचं संपूर्ण प्लॅनिंग आखलं होतं

समृद्धी महामार्गावरील अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या न्यायासाठी मूक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2023 13:58 IST

अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, अपघातातील मृतकांच्या कुटुंबियांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलं आहे.

१ जुलै २०२३ रोजी झालेल्या समृद्धी महामार्गावरील अपघातात २५ निष्पाप जीवांचा बळी गेला होता. या अपघाताला १६५ दिवसांचा कालावधी लोटल्यावरही शासनाने पीडितांच्या निवेदनाची दखल न घेतल्याने व दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याने पीडित परिवारांनी ७ डिसेंबर २०२३ पासून जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा येथे बेमुदत साखळी उपोषण सुरू केले.

या दरम्यान राज्यपाल रमेश बैस, विधानसभा विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार, मंत्री सुधीर मुनगंटीवार, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे, राष्ट्रवादी नेते रोहित पवार, खासदार रामदास तडस, माजी आमदार अमर काळे, वाशिम जिल्हा आमदार लखन मलिक इत्यादी अनेक नेत्यांना पीडितांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. परंतु जिल्हाधिकारी कार्यालय जवळील साखळी उपोषणाला १२ दिवस लोटूनही अद्यापही लिखित स्वरूपात  मागण्या मंजूर न झाल्याने पीडित परिवाराच्या वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून "मूक मोर्चा" चे आयोजन करण्यात आले आहे. सदर मोर्चा पूर्णपणे निष्पक्षीय असून अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, अपघातातील मृतकांच्या कुटुंबियांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलं आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग