शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

साहेब वाघ दोनदा येऊन गेला; आता काय आम्ही शेतात जाणे सोडायचे का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2022 05:00 IST

पेठ येथील शेतकरी अशोक ठोंबरे यांचा मुलगा लतिष  बैलबंडीवर बसून वन्य प्राण्यांपासून बचावासाठी रब्बीतील गहू पिकांची रखवाली करीत होता. रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास अचानक श्वानांच्या भुंकण्याचा आवाज सुरू झाल्याने शेतकऱ्याने टॉर्च मारून बघितले असता गोठ्यात पट्टेदार वाघाने गायीच्या वासरावर हल्ला चढविल्याचे दिसले. ठोंबरे यांनी आरडाओरड करीत पट्टेदार वाघाला शेतातून पळवून लावले. 

लोकमत न्यूज नेटवर्क तारासावंगा : तारासावंगासह परिसरातील वाडेगाव, चीचकुंभ, पेठ माणिकवाडा व जामगाव शेतशिवारात  पट्टेदार व बिबट्या वाघाचा मुक्त संचार सुरू असून तारासावंगा परिसरात वाघाने  २१ फेब्रुवारी रोजी पेठमधील शेतकरी अशोक ठोंबरे यांच्या मालकीच्या वासरावर हल्ला चढवून  जखमी केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये वाघाची दहशत निर्माण झाली आहे.पेठ येथील शेतकरी अशोक ठोंबरे यांचा मुलगा लतिष  बैलबंडीवर बसून वन्य प्राण्यांपासून बचावासाठी रब्बीतील गहू पिकांची रखवाली करीत होता. रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास अचानक श्वानांच्या भुंकण्याचा आवाज सुरू झाल्याने शेतकऱ्याने टॉर्च मारून बघितले असता गोठ्यात पट्टेदार वाघाने गायीच्या वासरावर हल्ला चढविल्याचे दिसले. ठोंबरे यांनी आरडाओरड करीत पट्टेदार वाघाला शेतातून पळवून लावले. पण, वासरू गंभीर जखमी झाले. याची माहिती वनविभागाला दिली असता अधिकाऱ्यांनी   घटनास्थळ गाठून चौकशी केली. झालेल्या नुकसानीसाठी जखमी झालेल्या वासराच्या औषधोपचाराचे बिल जवळ ठेवा, औषधोपचारासाठी लागलेला खर्च वनविभागाच्या वतीने देण्यात येईल, अशा सूचना दिल्या. मात्र, दुसऱ्या दिवशीही वाघाने त्याच शेतात आल्याने खळबळ उडाली.  घटनेची माहिती वनविभागाला दिली. परंतु वनविभागाने चार ते पाच दिवस तुम्ही घरीच जनावरे बांधा अशी उत्तरे दिल्याने वनविभागही वाघाचा बंदोबस्त करण्यास अपयशी ठरत असेल तर अशात दिवसरात्र रब्बी पिकांच्या रखवालीसाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांनी मदत मागायची तरी कुणाकडे? हा प्रश्न निर्माण झाला  असून बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

शेतकरी, मजुरांच्या अडचणीत भर-  सध्या गहू व चणा आदी पिकांची निगा शेतकरी राखत असताना शेत शिवारातही वाघ मुक्त संचार करीत असल्याने शेतकऱ्यांसह शेतमजुरांच्या अडचणीत भर पडली आहे. -  मागील एका महिन्यांपासून अनेक शेतकऱ्यांच्या जनावरांवर हल्ले होत आहे. रब्बी पिकांच्या हंगामात वाघाच्या हल्ल्यांच्या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. नुकसानग्रस्त पशुपालकांना शासकीय मदत देत वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

बिबट्याने पाडला  कालवडीचा फडशा

-  सेलू (घोराड) : किन्ही शिवारात असलेल्या प्रदीप रामकृष्ण राऊत यांच्या शेतातील गोठ्याबाहेर बांधून असलेल्या कालवडीवर बिबट्याने हल्ला चढवून तिला ठार मारले. ही घटना गुरुवार २४ रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. -  किन्ही जखळा पांदण रस्त्याला लागून असलेल्या राऊत यांच्या शेतासह लगतच्या परिसरात बिबट्याचा वावर आहे. सध्या शेतात रात्रीच्या वेळी शेतकरी जागलीसाठी जात आहेत. अशावेळी बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. 

 

टॅग्स :Tigerवाघ