शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यात लक्षणे नसलेले कोरोना रुग्ण सर्वाधिक; आयसीयुतील रुग्ण खाटा फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 07:00 IST

सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय आणि सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयाच्या आयसीयुतील रुग्णखाटा दिवसेंदिवस झपाट्याने भरल्या जात आहे.

ठळक मुद्दे४०० कोविड बाधितांवर दोन कोरोना रुग्णालयांमध्ये होताहेत उपचार

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. अशातच वर्धेकरांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय आणि सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयाच्या आयसीयुतील रुग्णखाटा दिवसेंदिवस झपाट्याने भरल्या जात आहे. सध्यास्थितीत या दोन्ही कोविड रुग्णालात एकूण ४०० कोरोना बाधित उपचार घेत असून यात निम्म्या पेक्षा अधिक रुग्ण लक्षणविरहित आहेत. असे असले तरी झपाट्याने कोरोना वाढत असल्याने वर्धेकरांनीही आता गाफिल न राहता दक्ष राहून स्वत:ची आणि स्वत:च्या कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे.

प्राप्त माहितीनुसार, सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात सध्या २१२ कोविड बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी २७ रुग्ण गंभीर असून २२ रुग्णांमध्ये कोरोनाची किरकोळ लक्षणे आहेत. तर १६८ कोविड बाधित लक्षणविरहित असल्याचे सांगण्यात आले. तर सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात सध्यास्थितीत १८८ कोविड बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी ३८ रुग्ण गंभीर असून १९ कोरोना बाधितांना किरकोळ लक्षणे आहेत. तसेच १३१ कोविड बाधित लक्षणविरहित आहेत.

या सर्व कोविड बाधितांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी विशेष प्रयत्न करीत आहेत. असे असले तरी वर्धेकरांनी कोरोना संकटात आपली जबाबदारी वेळीच ओळखून खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन काटेकोरपणे करणे ही काळाची गरज ठरू पाहत आहे.

लक्षणविरहीत रुग्णांमुळे डॉक्टरांवर वाढला ताणअ‍ॅक्टिव्ह कोविड बाधितांपैकी निम्म्यापेक्षा जास्त कोविड बाधित लक्षणविरहित आहेत. अशा लक्षणविरहित रुग्णांना गृह अलगीकरणात ठेवण्याबाबतचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. पण त्या निर्णयावर प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने सध्या कोविड योद्धा म्हणून काम करणाºया वैद्यकीय अधिकाºयांवर गंभीर व किरकोळ कोविड बाधित रुग्णांवर उपचार करताना कामाचा मोठा ताण येत असल्याचे वैद्यकीय अधिकाºयांकडून सांगण्यात आले.सेवाग्राम आणि सावंगी (मेघे) येथील कोविड रुग्णालयाच्या आयसीयुमध्ये रुग्णखाटांचा तुटवडा आहे ही बाब खरी आहे. असे असले तरी जिल्ह्याची कोरोना स्थिती सध्या नियंत्रणात आहे. वर्धेकरांनी गाफिल राहिल्यास कोरोनाचा प्रसार आणखी झपाट्याने होईल. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहून जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे.- डॉ. अनुपम हिवलेकर, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस