शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
5
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
6
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
7
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
8
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
9
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
10
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
12
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
13
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
14
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
15
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
18
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
19
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
20
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...

वर्ध्यात लक्षणे नसलेले कोरोना रुग्ण सर्वाधिक; आयसीयुतील रुग्ण खाटा फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 07:00 IST

सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय आणि सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयाच्या आयसीयुतील रुग्णखाटा दिवसेंदिवस झपाट्याने भरल्या जात आहे.

ठळक मुद्दे४०० कोविड बाधितांवर दोन कोरोना रुग्णालयांमध्ये होताहेत उपचार

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. अशातच वर्धेकरांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय आणि सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयाच्या आयसीयुतील रुग्णखाटा दिवसेंदिवस झपाट्याने भरल्या जात आहे. सध्यास्थितीत या दोन्ही कोविड रुग्णालात एकूण ४०० कोरोना बाधित उपचार घेत असून यात निम्म्या पेक्षा अधिक रुग्ण लक्षणविरहित आहेत. असे असले तरी झपाट्याने कोरोना वाढत असल्याने वर्धेकरांनीही आता गाफिल न राहता दक्ष राहून स्वत:ची आणि स्वत:च्या कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे.

प्राप्त माहितीनुसार, सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात सध्या २१२ कोविड बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी २७ रुग्ण गंभीर असून २२ रुग्णांमध्ये कोरोनाची किरकोळ लक्षणे आहेत. तर १६८ कोविड बाधित लक्षणविरहित असल्याचे सांगण्यात आले. तर सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात सध्यास्थितीत १८८ कोविड बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी ३८ रुग्ण गंभीर असून १९ कोरोना बाधितांना किरकोळ लक्षणे आहेत. तसेच १३१ कोविड बाधित लक्षणविरहित आहेत.

या सर्व कोविड बाधितांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी विशेष प्रयत्न करीत आहेत. असे असले तरी वर्धेकरांनी कोरोना संकटात आपली जबाबदारी वेळीच ओळखून खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन काटेकोरपणे करणे ही काळाची गरज ठरू पाहत आहे.

लक्षणविरहीत रुग्णांमुळे डॉक्टरांवर वाढला ताणअ‍ॅक्टिव्ह कोविड बाधितांपैकी निम्म्यापेक्षा जास्त कोविड बाधित लक्षणविरहित आहेत. अशा लक्षणविरहित रुग्णांना गृह अलगीकरणात ठेवण्याबाबतचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. पण त्या निर्णयावर प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने सध्या कोविड योद्धा म्हणून काम करणाºया वैद्यकीय अधिकाºयांवर गंभीर व किरकोळ कोविड बाधित रुग्णांवर उपचार करताना कामाचा मोठा ताण येत असल्याचे वैद्यकीय अधिकाºयांकडून सांगण्यात आले.सेवाग्राम आणि सावंगी (मेघे) येथील कोविड रुग्णालयाच्या आयसीयुमध्ये रुग्णखाटांचा तुटवडा आहे ही बाब खरी आहे. असे असले तरी जिल्ह्याची कोरोना स्थिती सध्या नियंत्रणात आहे. वर्धेकरांनी गाफिल राहिल्यास कोरोनाचा प्रसार आणखी झपाट्याने होईल. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहून जिल्हा प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे.- डॉ. अनुपम हिवलेकर, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस