शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

वर्ध्यातील मोदींच्या सभेचे मैदान ‘मोकळे’च!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 05:57 IST

मुंबई : भाजप-शिवसेना युतीच्या प्रचारार्थ वर्धा येथे झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे मैदान मोकळेच होते, अशी टीका काँग्रेस ...

मुंबई : भाजप-शिवसेना युतीच्या प्रचारार्थ वर्धा येथे झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे मैदान मोकळेच होते, अशी टीका काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली आहे. तर भर उन्हात शरद पवार यांनी पाच हजाराची सभा घेऊ दाखवावी, असे आव्हान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले आहे.

वर्धा येथील मोदींच्या सभेला गर्दीच नव्हती. अर्ध्या खुर्च्या रिकाम्या होत्या. मात्र तरीही मोदींनी सभेला विराट संबोधून जनतेला एप्रिल फूल केले. भाजप सरकारचा कारभार हेही एप्रिलफूल असून गेली पाच वर्षे जनतेला केवळ भूलथापा दिल्याची टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, सभेला गर्दी नसल्याचे पाहून हिरमोड झालेल्या मोदींनी शरद पवार यांच्यावर टीका करून आपला त्रागा व्यक्त केला. मोदींच्या जुमले बाजीला जनता कंटाळली असल्याने त्यांनी सभेकडे पाठ फिरवली, अशी टीका त्यांनी केली.

पंतप्रधान मोदी यांच्या वर्धा येथील सभेला गर्दी नसल्याची टीका विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही केली आहे. भाजपने त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ४४ अंश तापमानात पाच हजार माणसांची सभा घेऊन दाखवावी असे आव्हान शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले. पळ काढणारे चौकीदार असतात या अशोक चव्हाण यांच्या टीकेला उत्तर देताना, आदर्शसारखा घोटाळा करुन दरोडा टाकणाऱ्यांना पंतप्रधानांना चोर म्हणताना काही वाटत नाही का? असा सवाल केला.‘हे सरकार घट्ट आहे’गुळाच्या ढेपेच्या मुंगळ्याप्रमाणे मुख्यमंत्री सत्तेला चिकटून बसले आहेत, असे बोलणाऱ्या छगन भुजबळ यांना प्रत्युत्तर देताना तावडे म्हणाले की, महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीचे सरकार हे पूर्ण बहुमताचे सरकार आहे व हे सरकार घट्ट आहे. त्यामुळे आम्हाला सत्तेला चिकटून राहण्याची गरज नाही. जनतेनेच आमच्यावर संपूर्ण विश्वास टाकल्यामुळे आम्ही महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करत आहोत. 

टॅग्स :wardha-pcवर्धाNarendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक