शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

महाबीजचा अजब कारभार, पेरणीसाठी दिले टोचलेले बियाणे; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची थट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2022 13:36 IST

चण्याच्या बियाण्याला कीड, उगवणार तरी कसे?

फनिंद्र रघाटाटे

रोहणा (वर्धा) : खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतशिवार खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारणच बदलले. त्यामुळे त्यांना रब्बी हंगामाने सावरता यावे, यासाठी शासनाकडून चणा पेरणीकरिता ५० टक्के अनुदानावर महाबीज कंपनीकडून बियाणे देण्यात आले. मात्र, पेरणीकरिता बॅग उघडल्यावर ते बियाणे टोचलेले, कीड लागलेले आढळून आले. हे बियाणे उगवतील का? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

अतिवृष्टीबाधित क्षेत्रात रब्बी हंगामाकरिता शासनाकडून चणा पेरणीसाठी ३० किलो वजनाच्या बियाण्याची बॅग पन्नास टक्के अनुदानावर दिली जात आहे. ही बॅग शेतकऱ्यांना एक हजार ५०० रुपयांना मिळत आहे. पेरणीकरिता पाणी न लागलेले, दाणेदार, स्वच्छ व कीडविरहित बियाणे असावे लागते; परंतु, हे बियाणे किडीने टोचलेले आहे.

शासनाला जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांना वस्तूच्या स्वरूपात मदत करायची असते तेव्हा सरकारी नियंत्रणातील महाबीज कंपनी तत्पर असते. मात्र, कंपनीकडून पुरविल्या जाणाऱ्या बियाण्यांच्या किमती बाजारभावाच्या तुलनेत दीड ते दुप्पट असतात. त्यावर शासन उपकार म्हणून ५० टक्के अनुदान देते. आतादेखील चणा बियाण्याची ३० किलोची बॅग शेतकऱ्यांना दीड हजार रुपयांत दिली आहे. या बॅगची खुल्या बाजारात किंमत दोन हजार १०० रुपये आहे. यावरून विचार केल्यास हे ५० टक्के अनुदान आहे काय, असा प्रश्नही शेतकरी उपस्थित करीत आहेत.

बियाणे वाटपात दुकानदारांची दादागिरी

शेतकरी नैसर्गिक आपत्ती आणि आर्थिक संकटामुळे आधीच विवंचनेत असतो. त्यातही शासनाकडून योग्य मदत देण्याऐवजी त्याच्या तोंडाला पाने पुसली जातात. महागाचे बियाणे खरेदी करताना त्याचे वजन आणि प्रत पाहण्याचीही उजागिरी नसते. सिलबंद बियाणे घरी नेल्यावरच ते कसे आहे, ते शेतकऱ्याला कळते. दुकानदार शेतकऱ्यांना बॅगवर छापलेले वजन दाखवून मोकळा होतो. उगवण क्षमता विचारल्यास कंपनीला जाऊन विचारा, असा सल्ला दिला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीच्या नावावर दादागिरी सहन करावी लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

माझी मारडा येथे शेती असून, मी नुकत्याच अनुदानावर महाबीज चणा बियाण्याच्या चार बॅग खरेदी केल्या. प्रत्यक्ष पेरणीच्या वेळी त्यातील एका बॅगमधील बियाणे किडलेले आढळले. बियाण्याची बॅग पूर्णतः सिलबंद होती. तरी आतील बियाणे निकृष्ट दर्जाचे होते. नाईलाजास्तवर ते बियाणे पेरावे लागले. आता त्यातील किती बियाणे उगवेल ते देव जाणे.

- दिलीप खरटकर, शेतकरी, मारडा

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीMahabeejमहाबीज