शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
2
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
3
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
4
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
5
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?
6
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
7
Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!
8
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
9
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
10
"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी
11
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्यधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
12
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
13
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
14
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
15
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
16
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा
17
मुंबईविरुद्ध सामन्यात चेन्नईचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात का उतरले? जाणून घ्या कारण
18
लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला, दरीत कोसळली गाडी; ६ जणांचा मृत्यू, वधू-वर गंभीर जखमी
19
Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टींचे दिसणे म्हणजे वर्षाखेरीपर्यंत संसाराला लागणार याची चिन्हं!
20
डॉ. वळसंगकर प्रकरणाला नवं वळण? आरोपी मनीषा हिला होती वळसंगकर कुटुंबातील वादाबाबत त्या गोष्टींची माहिती 

महाबीजचा अजब कारभार, पेरणीसाठी दिले टोचलेले बियाणे; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची थट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2022 13:36 IST

चण्याच्या बियाण्याला कीड, उगवणार तरी कसे?

फनिंद्र रघाटाटे

रोहणा (वर्धा) : खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतशिवार खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारणच बदलले. त्यामुळे त्यांना रब्बी हंगामाने सावरता यावे, यासाठी शासनाकडून चणा पेरणीकरिता ५० टक्के अनुदानावर महाबीज कंपनीकडून बियाणे देण्यात आले. मात्र, पेरणीकरिता बॅग उघडल्यावर ते बियाणे टोचलेले, कीड लागलेले आढळून आले. हे बियाणे उगवतील का? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

अतिवृष्टीबाधित क्षेत्रात रब्बी हंगामाकरिता शासनाकडून चणा पेरणीसाठी ३० किलो वजनाच्या बियाण्याची बॅग पन्नास टक्के अनुदानावर दिली जात आहे. ही बॅग शेतकऱ्यांना एक हजार ५०० रुपयांना मिळत आहे. पेरणीकरिता पाणी न लागलेले, दाणेदार, स्वच्छ व कीडविरहित बियाणे असावे लागते; परंतु, हे बियाणे किडीने टोचलेले आहे.

शासनाला जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांना वस्तूच्या स्वरूपात मदत करायची असते तेव्हा सरकारी नियंत्रणातील महाबीज कंपनी तत्पर असते. मात्र, कंपनीकडून पुरविल्या जाणाऱ्या बियाण्यांच्या किमती बाजारभावाच्या तुलनेत दीड ते दुप्पट असतात. त्यावर शासन उपकार म्हणून ५० टक्के अनुदान देते. आतादेखील चणा बियाण्याची ३० किलोची बॅग शेतकऱ्यांना दीड हजार रुपयांत दिली आहे. या बॅगची खुल्या बाजारात किंमत दोन हजार १०० रुपये आहे. यावरून विचार केल्यास हे ५० टक्के अनुदान आहे काय, असा प्रश्नही शेतकरी उपस्थित करीत आहेत.

बियाणे वाटपात दुकानदारांची दादागिरी

शेतकरी नैसर्गिक आपत्ती आणि आर्थिक संकटामुळे आधीच विवंचनेत असतो. त्यातही शासनाकडून योग्य मदत देण्याऐवजी त्याच्या तोंडाला पाने पुसली जातात. महागाचे बियाणे खरेदी करताना त्याचे वजन आणि प्रत पाहण्याचीही उजागिरी नसते. सिलबंद बियाणे घरी नेल्यावरच ते कसे आहे, ते शेतकऱ्याला कळते. दुकानदार शेतकऱ्यांना बॅगवर छापलेले वजन दाखवून मोकळा होतो. उगवण क्षमता विचारल्यास कंपनीला जाऊन विचारा, असा सल्ला दिला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीच्या नावावर दादागिरी सहन करावी लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

माझी मारडा येथे शेती असून, मी नुकत्याच अनुदानावर महाबीज चणा बियाण्याच्या चार बॅग खरेदी केल्या. प्रत्यक्ष पेरणीच्या वेळी त्यातील एका बॅगमधील बियाणे किडलेले आढळले. बियाण्याची बॅग पूर्णतः सिलबंद होती. तरी आतील बियाणे निकृष्ट दर्जाचे होते. नाईलाजास्तवर ते बियाणे पेरावे लागले. आता त्यातील किती बियाणे उगवेल ते देव जाणे.

- दिलीप खरटकर, शेतकरी, मारडा

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीMahabeejमहाबीज