शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
5
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
6
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
7
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
8
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
9
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
10
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
11
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
12
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
13
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
14
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
15
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
16
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
17
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
19
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
20
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर

महाबीजचा अजब कारभार, पेरणीसाठी दिले टोचलेले बियाणे; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची थट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2022 13:36 IST

चण्याच्या बियाण्याला कीड, उगवणार तरी कसे?

फनिंद्र रघाटाटे

रोहणा (वर्धा) : खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतशिवार खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारणच बदलले. त्यामुळे त्यांना रब्बी हंगामाने सावरता यावे, यासाठी शासनाकडून चणा पेरणीकरिता ५० टक्के अनुदानावर महाबीज कंपनीकडून बियाणे देण्यात आले. मात्र, पेरणीकरिता बॅग उघडल्यावर ते बियाणे टोचलेले, कीड लागलेले आढळून आले. हे बियाणे उगवतील का? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

अतिवृष्टीबाधित क्षेत्रात रब्बी हंगामाकरिता शासनाकडून चणा पेरणीसाठी ३० किलो वजनाच्या बियाण्याची बॅग पन्नास टक्के अनुदानावर दिली जात आहे. ही बॅग शेतकऱ्यांना एक हजार ५०० रुपयांना मिळत आहे. पेरणीकरिता पाणी न लागलेले, दाणेदार, स्वच्छ व कीडविरहित बियाणे असावे लागते; परंतु, हे बियाणे किडीने टोचलेले आहे.

शासनाला जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांना वस्तूच्या स्वरूपात मदत करायची असते तेव्हा सरकारी नियंत्रणातील महाबीज कंपनी तत्पर असते. मात्र, कंपनीकडून पुरविल्या जाणाऱ्या बियाण्यांच्या किमती बाजारभावाच्या तुलनेत दीड ते दुप्पट असतात. त्यावर शासन उपकार म्हणून ५० टक्के अनुदान देते. आतादेखील चणा बियाण्याची ३० किलोची बॅग शेतकऱ्यांना दीड हजार रुपयांत दिली आहे. या बॅगची खुल्या बाजारात किंमत दोन हजार १०० रुपये आहे. यावरून विचार केल्यास हे ५० टक्के अनुदान आहे काय, असा प्रश्नही शेतकरी उपस्थित करीत आहेत.

बियाणे वाटपात दुकानदारांची दादागिरी

शेतकरी नैसर्गिक आपत्ती आणि आर्थिक संकटामुळे आधीच विवंचनेत असतो. त्यातही शासनाकडून योग्य मदत देण्याऐवजी त्याच्या तोंडाला पाने पुसली जातात. महागाचे बियाणे खरेदी करताना त्याचे वजन आणि प्रत पाहण्याचीही उजागिरी नसते. सिलबंद बियाणे घरी नेल्यावरच ते कसे आहे, ते शेतकऱ्याला कळते. दुकानदार शेतकऱ्यांना बॅगवर छापलेले वजन दाखवून मोकळा होतो. उगवण क्षमता विचारल्यास कंपनीला जाऊन विचारा, असा सल्ला दिला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीच्या नावावर दादागिरी सहन करावी लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

माझी मारडा येथे शेती असून, मी नुकत्याच अनुदानावर महाबीज चणा बियाण्याच्या चार बॅग खरेदी केल्या. प्रत्यक्ष पेरणीच्या वेळी त्यातील एका बॅगमधील बियाणे किडलेले आढळले. बियाण्याची बॅग पूर्णतः सिलबंद होती. तरी आतील बियाणे निकृष्ट दर्जाचे होते. नाईलाजास्तवर ते बियाणे पेरावे लागले. आता त्यातील किती बियाणे उगवेल ते देव जाणे.

- दिलीप खरटकर, शेतकरी, मारडा

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीMahabeejमहाबीज