शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
4
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
5
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
11
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
12
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
13
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
14
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
15
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
16
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
17
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
18
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
19
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
20
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग

शिवसेनेच्या आनंदावर मनसेचे विरजण

By admin | Updated: June 9, 2014 23:46 IST

इंग्रजांच्या राजवटीपासून असेलल्या कापसाच्या बाजारपेठेत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उलथापालथीचे राजकारण सुरु झाले आहे. राष्ट्रवादीत राजू तिमांडे आणि अँड. सुधीर कोठारी यांच्यात तिकीटासाठी

राजेश भोजेकर - वर्धाइंग्रजांच्या राजवटीपासून असेलल्या  कापसाच्या बाजारपेठेत राजकीय घडामोडींना वेग आला आहे.  उलथापालथीचे राजकारण सुरु झाले आहे. राष्ट्रवादीत राजू तिमांडे आणि अँड. सुधीर कोठारी यांच्यात तिकीटासाठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. समीर कुणावार यांची अपक्ष खेळी. यातच मनसेचे अतुल वांदिले यांची युवा ब्रिगेड या सार्‍यांचे बाण चुकवून विद्यमान आ. अशोक शिंदे शिवसेनेचा धनुष्य कसा पेलतात, याकडे हिंगणघाटवासीयांचे लक्ष लागून आहे. सद्य:स्थितीत शिवसेनेचा गड मानला जात असलेल्या या क्षेत्रात नागरिकांनी राजू तिमांडे यांच्या रुपात २00४ मध्ये राष्ट्रवादीला संधी दिली होती. या संधीचे सोने मात्र त्यांना करता आले नाही. १९९५ आणि १९९९ च्या निवडणुकीत जनतेने डोक्यावर घेतलेले शिंदेचे नेतृत्व पुन्हा मान्य केले. १९९५ मध्ये राज्यात काँग्रेसविरोधी लाट आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा झंझावात, स्थानिक पातळीवरील सामाजिक अस्थिरता याचा  पूर्ण लाभ अशोक शिंदे यांना मिळाला. यातच काँग्रेसचे सुनील राऊत, बसपाचे सिद्धार्थ पाटील आणि अपक्ष त्र्यंबकराव घोरपडे यांच्यात झालेले मतांचे विभाजनही सेनेच्या पथ्यावर पडले. १९९९ मध्ये राजू तिमांडे यांनी अपक्ष लढून काट्याची टक्कर दिली मात्र रिपाइंची मते विभागल्या गेली. याचाही फायदा शिवसेनेलाच मिळाला. २00४ मध्ये येथे परिवर्तनाच्या लाटेवर स्वार होऊन राष्ट्रवादी काँग्रेसकडून दुसर्‍यांदा निवडणूक रिंगणात उतरलेले राजू तिमांडे यांनी ही जागा जिंकली. २00९ च्या निवडणुकीत अपक्षाच्या रुपाने समीर कुणावार नावाच्या वादळाने त्यांना चक्क तिसर्‍या स्थानावर फेकले. या निवडणुकीत शिंदे यांनी केवळ १६0१ इतक्या अल्प माताधिक्याने विजय नोंदविला. शिंदे यांनी १५ वर्षे आमदारकी उपभोगली. मात्र त्यांच्या काळात एकही उल्लेखनीय काम न झाल्याचा लाभ उचलत मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी समांतर पातळीवर विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावांमध्ये प्रत्यक्ष पक्ष बांधणी केली आहे. येत्या काही दिवसात हिंगणघाट क्षेत्रातील मुलभुत प्रश्नांना घेऊन  ते मोठय़ा आंदोलनाच्या तयारीत आहे. तरुणांनाही जवळ केले आहे. मोदी लाटेमुळे आलबेल समजत असजलेल्या शिवसेनेच्या आनंदात मनसेच्या हालचाली विरजण टाकते की काय, अशी भिती सेनेच्या गोटात आहे. लोकसभा निवडणुकीत या मतदार संघातून भाजपला ६0 हजारांचे मताधिक्य मिळाले. त्यात समीर कुणावार यांचाही खारीचा वाटा आहे. २00९ च्या निवडणुकीत  ४९  हजार ८६४ मते घेऊन राजकीय विशेलषकांना बुचकाळ्यात टाकणारे  कुणावार आगामी निवडणुकीसाठीही सज्ज  आहेत. आधीच राज्यात काँग्रेस-राकाँ आघाडीसाठी वातावरण अनुकुल नसताना कुणावार यांची उमेदवारी शिंदे यांच्यासाठी दुष्काळात तेरावा महिना ठरणारी शक्यता आहे. राष्ट्रवादीकडून लढण्यासाठी राजू तिमांडे पूर्ण ताकदीनिशी तयारीत असले तरी पं.स. सभापती अँड. सुधीर कोठारी यांच्याही राकाँच्या उमेदवारीसाठी हालचाली सुरू आहे. पक्षश्रेष्ठी तिमांडेंना पुन्हा संधी देते वा अँड. कोठारींच्या रुपाने नवा चेहरा रिंगणात उतरविले, याकडे जनतेचे लक्ष लागून आहे. हिंगणघाटात युवा मतदारांची संख्या मोठी आहे. जनतेला विकासाची कास हवी आहे. धडपड नेतृत्वाची गरज आहे. या तीन गोष्टी जिकडे दिसेल तिकडे येथील जनता वळतील, असे एकंदर चित्र आहे. जातीच समीकरण विचारात घेतल्यास राजू तिमांडे, अतुल वांदिले हे तेली समाजाचे प्रतिनिधित्त्व करणारे आहेत, तर अशोक शिंदे हे कुणबी समाजातील आहेत. समीर कुणावार हे इतरमध्ये मोडतात. यावरुन तेली समाजातील मतांचे विभाजन अटळ असले तरी दलित समाजाची मते येथे निर्णायक ठरणारी आहेत.