शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
4
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
5
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
6
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
7
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
8
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
9
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
10
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
11
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
12
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
13
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
14
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
15
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
16
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
17
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
18
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
19
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
20
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी

शिवसेनेच्या आनंदावर मनसेचे विरजण

By admin | Updated: June 9, 2014 23:46 IST

इंग्रजांच्या राजवटीपासून असेलल्या कापसाच्या बाजारपेठेत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उलथापालथीचे राजकारण सुरु झाले आहे. राष्ट्रवादीत राजू तिमांडे आणि अँड. सुधीर कोठारी यांच्यात तिकीटासाठी

राजेश भोजेकर - वर्धाइंग्रजांच्या राजवटीपासून असेलल्या  कापसाच्या बाजारपेठेत राजकीय घडामोडींना वेग आला आहे.  उलथापालथीचे राजकारण सुरु झाले आहे. राष्ट्रवादीत राजू तिमांडे आणि अँड. सुधीर कोठारी यांच्यात तिकीटासाठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. समीर कुणावार यांची अपक्ष खेळी. यातच मनसेचे अतुल वांदिले यांची युवा ब्रिगेड या सार्‍यांचे बाण चुकवून विद्यमान आ. अशोक शिंदे शिवसेनेचा धनुष्य कसा पेलतात, याकडे हिंगणघाटवासीयांचे लक्ष लागून आहे. सद्य:स्थितीत शिवसेनेचा गड मानला जात असलेल्या या क्षेत्रात नागरिकांनी राजू तिमांडे यांच्या रुपात २00४ मध्ये राष्ट्रवादीला संधी दिली होती. या संधीचे सोने मात्र त्यांना करता आले नाही. १९९५ आणि १९९९ च्या निवडणुकीत जनतेने डोक्यावर घेतलेले शिंदेचे नेतृत्व पुन्हा मान्य केले. १९९५ मध्ये राज्यात काँग्रेसविरोधी लाट आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा झंझावात, स्थानिक पातळीवरील सामाजिक अस्थिरता याचा  पूर्ण लाभ अशोक शिंदे यांना मिळाला. यातच काँग्रेसचे सुनील राऊत, बसपाचे सिद्धार्थ पाटील आणि अपक्ष त्र्यंबकराव घोरपडे यांच्यात झालेले मतांचे विभाजनही सेनेच्या पथ्यावर पडले. १९९९ मध्ये राजू तिमांडे यांनी अपक्ष लढून काट्याची टक्कर दिली मात्र रिपाइंची मते विभागल्या गेली. याचाही फायदा शिवसेनेलाच मिळाला. २00४ मध्ये येथे परिवर्तनाच्या लाटेवर स्वार होऊन राष्ट्रवादी काँग्रेसकडून दुसर्‍यांदा निवडणूक रिंगणात उतरलेले राजू तिमांडे यांनी ही जागा जिंकली. २00९ च्या निवडणुकीत अपक्षाच्या रुपाने समीर कुणावार नावाच्या वादळाने त्यांना चक्क तिसर्‍या स्थानावर फेकले. या निवडणुकीत शिंदे यांनी केवळ १६0१ इतक्या अल्प माताधिक्याने विजय नोंदविला. शिंदे यांनी १५ वर्षे आमदारकी उपभोगली. मात्र त्यांच्या काळात एकही उल्लेखनीय काम न झाल्याचा लाभ उचलत मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी समांतर पातळीवर विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावांमध्ये प्रत्यक्ष पक्ष बांधणी केली आहे. येत्या काही दिवसात हिंगणघाट क्षेत्रातील मुलभुत प्रश्नांना घेऊन  ते मोठय़ा आंदोलनाच्या तयारीत आहे. तरुणांनाही जवळ केले आहे. मोदी लाटेमुळे आलबेल समजत असजलेल्या शिवसेनेच्या आनंदात मनसेच्या हालचाली विरजण टाकते की काय, अशी भिती सेनेच्या गोटात आहे. लोकसभा निवडणुकीत या मतदार संघातून भाजपला ६0 हजारांचे मताधिक्य मिळाले. त्यात समीर कुणावार यांचाही खारीचा वाटा आहे. २00९ च्या निवडणुकीत  ४९  हजार ८६४ मते घेऊन राजकीय विशेलषकांना बुचकाळ्यात टाकणारे  कुणावार आगामी निवडणुकीसाठीही सज्ज  आहेत. आधीच राज्यात काँग्रेस-राकाँ आघाडीसाठी वातावरण अनुकुल नसताना कुणावार यांची उमेदवारी शिंदे यांच्यासाठी दुष्काळात तेरावा महिना ठरणारी शक्यता आहे. राष्ट्रवादीकडून लढण्यासाठी राजू तिमांडे पूर्ण ताकदीनिशी तयारीत असले तरी पं.स. सभापती अँड. सुधीर कोठारी यांच्याही राकाँच्या उमेदवारीसाठी हालचाली सुरू आहे. पक्षश्रेष्ठी तिमांडेंना पुन्हा संधी देते वा अँड. कोठारींच्या रुपाने नवा चेहरा रिंगणात उतरविले, याकडे जनतेचे लक्ष लागून आहे. हिंगणघाटात युवा मतदारांची संख्या मोठी आहे. जनतेला विकासाची कास हवी आहे. धडपड नेतृत्वाची गरज आहे. या तीन गोष्टी जिकडे दिसेल तिकडे येथील जनता वळतील, असे एकंदर चित्र आहे. जातीच समीकरण विचारात घेतल्यास राजू तिमांडे, अतुल वांदिले हे तेली समाजाचे प्रतिनिधित्त्व करणारे आहेत, तर अशोक शिंदे हे कुणबी समाजातील आहेत. समीर कुणावार हे इतरमध्ये मोडतात. यावरुन तेली समाजातील मतांचे विभाजन अटळ असले तरी दलित समाजाची मते येथे निर्णायक ठरणारी आहेत.