शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

म्हसाळ्यात अतिक्र मण; ग्रा.प.निगरगट्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 21:38 IST

शहरानजिकच्या म्हसाळा ग्रामपंचायत परिसरातील वॉर्ड क्र मांक ३ मधील रवीनगरात अतिक्रमण करुन रस्ता अडविण्यात आला आहे. हा रस्ता मोकळा करुन देण्याकरिता ग्रामपंचायतला वारंवार तक्रारी करुनही दुर्लक्ष केले. त्यामुळे नागरिकांनी तहसीलदांना निवेदन दिल्यानंतर तहसीलदारांनी अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले.

ठळक मुद्देनागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष : तहसीलदारांच्या आदेशालाही बगल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरानजिकच्या म्हसाळा ग्रामपंचायत परिसरातील वॉर्ड क्र मांक ३ मधील रवीनगरात अतिक्रमण करुन रस्ता अडविण्यात आला आहे. हा रस्ता मोकळा करुन देण्याकरिता ग्रामपंचायतला वारंवार तक्रारी करुनही दुर्लक्ष केले. त्यामुळे नागरिकांनी तहसीलदांना निवेदन दिल्यानंतर तहसीलदारांनी अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले. तरीही ग्रामपंचायत प्रशासनाने या आदेशालाही बगल दिल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे.वॉर्ड क्रमांक ३ मधील रवीनगरात एका बाजुला काशिकर यांचे शेत आहे तर दुसºया बाजुने खान यांचे घर आहे. यामधून नागरिकांकरिता ११ फुटाचा रस्ता आहे. मात्र या रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आल्याने चारचाकी वाहनेही जाऊ शकत नाही. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रस्त्याच्या मधोमध निंबाचे मोठे झाड असल्याने वाहतुकीला अडथळा ठरत असल्यामुळे अनेकांच्या घराचे बांधकाम रखडले आहे. यासंदर्भात अतिक्रमण हटविण्यासह निंबाचे झाड तोडण्याकरिता नागरिकांनी अनेकदा ग्रामपंचायत प्रशासनाकडे अर्ज केले. परंतु निगलगट्ट ग्रामपंचायत प्रशासनाने अद्यापही लक्ष दिले नाही. त्यामुळे तलसील कार्यालय गाठून तहसीलदारांनी अतिक्रमण हटवून नागरिकांना न्याय देण्याचे आदेश दिले. तरीही अतिक्रमण हटविण्याकरिता पुढाकार घेतला नाही. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाला अतिक्रमणाची इतकी गोडी का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. अनेक महिन्यापासून ही समस्या प्रलंबित असल्यामुळे नागरिकांनी जिल्हाधिकारी यांनाही निवेदन दिले आहे. या निवेदनावर मंगशे गौरकर, प्राची ईश्वर इतवारे, सुनिल मनोहर चव्हाण, योगिता सुनिल चव्हाण, संगीता रमेश बोरकर, संध्या मिलिंद भैसारे, दिलीप सुखदेव उमाळे, बबनराव भगत, दिलीप उपासे, किरण वायगोकार, उमेश इंगळे, किशोर चव्हाण, करुणा चव्हाण यांची स्वाक्षरी आहे.तीन वर्षापासून नागरिक त्रस्तया अतिक्रमणाच्या समस्येसाठी रवीनगरातील नागरिकांची मागील तीन वर्षापासून पायपीट सुरु आहे. ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय व आमदारांनाही निवेदन दिले. त्यांनी ग्रामपंचायतला अतिक्र मण काढण्याबाबत सूचनाही दिल्या. परंतु सरपंच व सचिवांच्या हेकेखोरपणामुळे त्रास सहन करावा लागत आहे. सरपंचाकडून अतिक्रमणधारकांची पाठराखन करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.ग्रामपंचायतचे अतिक्रमण हटविण्याबाबत प्रयत्न सुरु आहे. खान यांनी अतिक्रमण काढायला मंजुरी दिली परंतू काशिकर यांना पत्रव्यवहार केला.पण, त्यांचे अद्याप उत्तर मिळाले नाही. तसेच अतिक्रमण हटविण्यासंदर्भात ग्रामपंचायतला तहसील कार्यालयाकडून कोणतेही पत्र प्राप्त झाले नाही.संदीप पाटील, सरपंच, म्हसाळा

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण