शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
3
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
4
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
5
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
6
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
7
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
8
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
9
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
10
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
11
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
12
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
13
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
14
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
15
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
16
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
17
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
18
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
19
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
20
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

म्हसाळ्यात अतिक्र मण; ग्रा.प.निगरगट्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 21:38 IST

शहरानजिकच्या म्हसाळा ग्रामपंचायत परिसरातील वॉर्ड क्र मांक ३ मधील रवीनगरात अतिक्रमण करुन रस्ता अडविण्यात आला आहे. हा रस्ता मोकळा करुन देण्याकरिता ग्रामपंचायतला वारंवार तक्रारी करुनही दुर्लक्ष केले. त्यामुळे नागरिकांनी तहसीलदांना निवेदन दिल्यानंतर तहसीलदारांनी अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले.

ठळक मुद्देनागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष : तहसीलदारांच्या आदेशालाही बगल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरानजिकच्या म्हसाळा ग्रामपंचायत परिसरातील वॉर्ड क्र मांक ३ मधील रवीनगरात अतिक्रमण करुन रस्ता अडविण्यात आला आहे. हा रस्ता मोकळा करुन देण्याकरिता ग्रामपंचायतला वारंवार तक्रारी करुनही दुर्लक्ष केले. त्यामुळे नागरिकांनी तहसीलदांना निवेदन दिल्यानंतर तहसीलदारांनी अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले. तरीही ग्रामपंचायत प्रशासनाने या आदेशालाही बगल दिल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे.वॉर्ड क्रमांक ३ मधील रवीनगरात एका बाजुला काशिकर यांचे शेत आहे तर दुसºया बाजुने खान यांचे घर आहे. यामधून नागरिकांकरिता ११ फुटाचा रस्ता आहे. मात्र या रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आल्याने चारचाकी वाहनेही जाऊ शकत नाही. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रस्त्याच्या मधोमध निंबाचे मोठे झाड असल्याने वाहतुकीला अडथळा ठरत असल्यामुळे अनेकांच्या घराचे बांधकाम रखडले आहे. यासंदर्भात अतिक्रमण हटविण्यासह निंबाचे झाड तोडण्याकरिता नागरिकांनी अनेकदा ग्रामपंचायत प्रशासनाकडे अर्ज केले. परंतु निगलगट्ट ग्रामपंचायत प्रशासनाने अद्यापही लक्ष दिले नाही. त्यामुळे तलसील कार्यालय गाठून तहसीलदारांनी अतिक्रमण हटवून नागरिकांना न्याय देण्याचे आदेश दिले. तरीही अतिक्रमण हटविण्याकरिता पुढाकार घेतला नाही. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाला अतिक्रमणाची इतकी गोडी का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. अनेक महिन्यापासून ही समस्या प्रलंबित असल्यामुळे नागरिकांनी जिल्हाधिकारी यांनाही निवेदन दिले आहे. या निवेदनावर मंगशे गौरकर, प्राची ईश्वर इतवारे, सुनिल मनोहर चव्हाण, योगिता सुनिल चव्हाण, संगीता रमेश बोरकर, संध्या मिलिंद भैसारे, दिलीप सुखदेव उमाळे, बबनराव भगत, दिलीप उपासे, किरण वायगोकार, उमेश इंगळे, किशोर चव्हाण, करुणा चव्हाण यांची स्वाक्षरी आहे.तीन वर्षापासून नागरिक त्रस्तया अतिक्रमणाच्या समस्येसाठी रवीनगरातील नागरिकांची मागील तीन वर्षापासून पायपीट सुरु आहे. ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय व आमदारांनाही निवेदन दिले. त्यांनी ग्रामपंचायतला अतिक्र मण काढण्याबाबत सूचनाही दिल्या. परंतु सरपंच व सचिवांच्या हेकेखोरपणामुळे त्रास सहन करावा लागत आहे. सरपंचाकडून अतिक्रमणधारकांची पाठराखन करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.ग्रामपंचायतचे अतिक्रमण हटविण्याबाबत प्रयत्न सुरु आहे. खान यांनी अतिक्रमण काढायला मंजुरी दिली परंतू काशिकर यांना पत्रव्यवहार केला.पण, त्यांचे अद्याप उत्तर मिळाले नाही. तसेच अतिक्रमण हटविण्यासंदर्भात ग्रामपंचायतला तहसील कार्यालयाकडून कोणतेही पत्र प्राप्त झाले नाही.संदीप पाटील, सरपंच, म्हसाळा

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण