शहरं
Join us  
Trending Stories
1
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
2
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
3
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
4
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकूण काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
5
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
6
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
7
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
8
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
9
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
10
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
11
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
12
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार
13
स्वातंत्र्य दिनाच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा आणि द्या देशभक्तीच्या शुभेच्छा!
14
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
15
₹७५ वरून ₹५०० च्या पार ट्रेड करतोय हा शेअर, अचानक गुंतवणुकदारांचं स्वारस्य वाढलं, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
17
जगातील सगळ्यात लहान ५ मोबाइल फोन; अगदी माचिसच्या डबीतही लपवून ठेवू शकता!
18
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
19
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
20
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण

म्हसाळ्यात अतिक्र मण; ग्रा.प.निगरगट्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 21:38 IST

शहरानजिकच्या म्हसाळा ग्रामपंचायत परिसरातील वॉर्ड क्र मांक ३ मधील रवीनगरात अतिक्रमण करुन रस्ता अडविण्यात आला आहे. हा रस्ता मोकळा करुन देण्याकरिता ग्रामपंचायतला वारंवार तक्रारी करुनही दुर्लक्ष केले. त्यामुळे नागरिकांनी तहसीलदांना निवेदन दिल्यानंतर तहसीलदारांनी अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले.

ठळक मुद्देनागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष : तहसीलदारांच्या आदेशालाही बगल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरानजिकच्या म्हसाळा ग्रामपंचायत परिसरातील वॉर्ड क्र मांक ३ मधील रवीनगरात अतिक्रमण करुन रस्ता अडविण्यात आला आहे. हा रस्ता मोकळा करुन देण्याकरिता ग्रामपंचायतला वारंवार तक्रारी करुनही दुर्लक्ष केले. त्यामुळे नागरिकांनी तहसीलदांना निवेदन दिल्यानंतर तहसीलदारांनी अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले. तरीही ग्रामपंचायत प्रशासनाने या आदेशालाही बगल दिल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे.वॉर्ड क्रमांक ३ मधील रवीनगरात एका बाजुला काशिकर यांचे शेत आहे तर दुसºया बाजुने खान यांचे घर आहे. यामधून नागरिकांकरिता ११ फुटाचा रस्ता आहे. मात्र या रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आल्याने चारचाकी वाहनेही जाऊ शकत नाही. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या रस्त्याच्या मधोमध निंबाचे मोठे झाड असल्याने वाहतुकीला अडथळा ठरत असल्यामुळे अनेकांच्या घराचे बांधकाम रखडले आहे. यासंदर्भात अतिक्रमण हटविण्यासह निंबाचे झाड तोडण्याकरिता नागरिकांनी अनेकदा ग्रामपंचायत प्रशासनाकडे अर्ज केले. परंतु निगलगट्ट ग्रामपंचायत प्रशासनाने अद्यापही लक्ष दिले नाही. त्यामुळे तलसील कार्यालय गाठून तहसीलदारांनी अतिक्रमण हटवून नागरिकांना न्याय देण्याचे आदेश दिले. तरीही अतिक्रमण हटविण्याकरिता पुढाकार घेतला नाही. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाला अतिक्रमणाची इतकी गोडी का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. अनेक महिन्यापासून ही समस्या प्रलंबित असल्यामुळे नागरिकांनी जिल्हाधिकारी यांनाही निवेदन दिले आहे. या निवेदनावर मंगशे गौरकर, प्राची ईश्वर इतवारे, सुनिल मनोहर चव्हाण, योगिता सुनिल चव्हाण, संगीता रमेश बोरकर, संध्या मिलिंद भैसारे, दिलीप सुखदेव उमाळे, बबनराव भगत, दिलीप उपासे, किरण वायगोकार, उमेश इंगळे, किशोर चव्हाण, करुणा चव्हाण यांची स्वाक्षरी आहे.तीन वर्षापासून नागरिक त्रस्तया अतिक्रमणाच्या समस्येसाठी रवीनगरातील नागरिकांची मागील तीन वर्षापासून पायपीट सुरु आहे. ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय व आमदारांनाही निवेदन दिले. त्यांनी ग्रामपंचायतला अतिक्र मण काढण्याबाबत सूचनाही दिल्या. परंतु सरपंच व सचिवांच्या हेकेखोरपणामुळे त्रास सहन करावा लागत आहे. सरपंचाकडून अतिक्रमणधारकांची पाठराखन करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.ग्रामपंचायतचे अतिक्रमण हटविण्याबाबत प्रयत्न सुरु आहे. खान यांनी अतिक्रमण काढायला मंजुरी दिली परंतू काशिकर यांना पत्रव्यवहार केला.पण, त्यांचे अद्याप उत्तर मिळाले नाही. तसेच अतिक्रमण हटविण्यासंदर्भात ग्रामपंचायतला तहसील कार्यालयाकडून कोणतेही पत्र प्राप्त झाले नाही.संदीप पाटील, सरपंच, म्हसाळा

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण