शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

टंचाईच्या काळात मिनरल वॉटरचा धंदा फोफावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 00:24 IST

जिल्ह्यात अल्प पर्जन्यमानामुळे पाणी टंचाईची समस्या तीव्र झाली आहे. अनेक ठिकाणी पाच ते सात दिवसानंतर पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरीक पिण्यासाठी पाणी (मिनरल वॉटर) विकत घेत आहे. त्यामुळे शहरात मिनरल वॉटरच्या नावावर पाणी विकणाऱ्यांचे उदंड पीक आले आहे.

ठळक मुद्देशुद्धतेवरही प्रश्नचिन्ह : पाण्याच्या किंमतीत भरमसाठ वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात अल्प पर्जन्यमानामुळे पाणी टंचाईची समस्या तीव्र झाली आहे. अनेक ठिकाणी पाच ते सात दिवसानंतर पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरीक पिण्यासाठी पाणी (मिनरल वॉटर) विकत घेत आहे. त्यामुळे शहरात मिनरल वॉटरच्या नावावर पाणी विकणाऱ्यांचे उदंड पीक आले आहे. पहाटेपासूनच पाण्याचे कॅन भरलेले आॅटो शहरात व ग्रामीण भागात फिरताना दिसून येत आहे. एकट्या वर्धा शहर व परिसरातील ११ गावांमध्ये पाचशेवर अधिक मिनरल वॉटर विकणारे दुकानदारी थाटून आहेत. यातील अनेकांकडे अन्न औषध प्रशासनाकडून परवानाही नाही. नागरिकांना विहिरी व बोरवेलचे पाणी काढून थंड करून ते विकण्याचा गोरस धंदा जोरात सुरू आहे. पुर्वी साधारणत: १५ ते २० रूपयाला विकली जाणारी पाण्याची कॅन आज ३० ते ४० रूपयावर गेली आहे. घ्यायची असेल तर घ्या, असा दम ग्राहकांना दिला जात आहे. घरपोच पाणी पुरवठ्याचा हा धंदा ग्रामीण भागातही जोरात आहे.कुणाचेही नियंत्रण नाहीमिनरल वॉटर विकणाऱ्या कंपनीत मनुष्यबळाचा वापरच केला जात नाही. आॅटोमेशन मशीनद्वारे आपोआप पाणी शुध्द करून ते कॅनमध्ये भरले जाते. यात मनुष्याचे हात, डोके आदीचे केस पडणार नाही, याची दक्षता घ्यावी लागते. तसेच अन्न, औषध प्रशासनाकडून पाण्याचे नमूने वारंवार तपासून घ्यावे लागतात. त्यांची परवानगी हा व्यवसाय उघडण्यासाठी घ्यावी लागते. मात्र वर्धा शहरात या सर्व निकषाचे पालन करणारे मोजकेच पाणी विक्री करणारे आहे. बाकी इतरत्र सर्वत्र मिळेल ते पाणी ग्राहकांना थंड करून विकण्याचा धंदा सुरू आहे. यावर जिल्हा प्रशासनासह अन्न औषध प्रशासनाचेही नियंत्रण राहिलेले नाही.पाणी विक्रेत्यांनी परिसर घेतले वाटूनया मिनरल वॉटर विकणाऱ्या विक्रेत्यांनी आपआपले परिसर वाटून घेतले आहे. त्यामुळे इतरांच्या भागात दुसरे विक्रेते जात नाही. ग्राहकांना नाईलाजास्तव महागाचे पाणी खरेदी करावेच लागते. या कामासाठी ठेवण्यात आलेले तरूण नवे ग्राहक शोधण्याचे काम करीत असतात. काहींची तर पाणी फॅक्टरी त्यांच्या इतर व्यवसायाच्याच दुकानात थाटण्यात आली आहे. तेथूनच पाण्याचा पुरवठा केला जातो. ग्रामपंचायत प्रशासनाकडेही अशा व्यवसायिकांच्या नोंदी नाही.

टॅग्स :Mineral Waterमिनरल वॉटरwater shortageपाणीटंचाई