शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

टाकी विक्रीतून बाजारपेठेत कोटींची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 22:17 IST

पाणीटंचाई, आठ ते पंधरा दिवसांआड होणारा अल्प पाणीपुरवठा आणि हातपंप, विंधन विहिरींमधूनही पुरेसे पाणी येत नसल्याने पाणी साठवणुकीकरिता वापरात येणाऱ्या टाक्यांची शहरात प्रचंड मागणी वाढली आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाईचा परिणाम : तिपटीने वाढली विक्री; जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीत दोन उद्योग

सुहास घनोकार ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पाणीटंचाई, आठ ते पंधरा दिवसांआड होणारा अल्प पाणीपुरवठा आणि हातपंप, विंधन विहिरींमधूनही पुरेसे पाणी येत नसल्याने पाणी साठवणुकीकरिता वापरात येणाऱ्या टाक्यांची शहरात प्रचंड मागणी वाढली आहे. एकट्या मार्चमध्ये ३,५०० टाक्या खरेदी करण्यात आल्याने बाजारपेठेत टाकी विक्री व्यवसायाने कोटींची उड्डाणे घेतल्याचे चित्र आहे. काही वर्षांपेक्षा यावर्षी तिपटीने विक्री वाढल्याची अधिकृत माहिती आहे.अल्प पर्जन्यमानामुळे यंदा जिल्ह्यात जलसंकट गडद झाले आहे. जिल्ह्यातील जलाशयांमध्ये जूनपर्यंत पुरेल एवढाच उपयुक्त जलसाठा आहे. अल्पसा जलसाठा असल्याने शहरात सात दिवसांआड तर लगतच्या ग्रामीण भागात तब्बल पंधरा दिवसांआड पाणीपुरवठा होत असून फार विलंबाने आणि तोही अल्प पाणीपुरवठा होत आहे. यातच शहरातील बहुतांश विहिरींनी तळ गाठला कूपनलिकाही कोरड्या झाल्या आहेत.शहरात आणि ग्रामीण भागात दररोज मोठ्या प्रमाणावर विंधनविहिरी केल्या जात आहेत. मात्र, २०० ते २५० फूट खोदूनही पाणी लागत नाही, अशी स्थिती आहे. गावातील विहिरी आणि शहरालगतच्या भागात शेती असलेल्या नागरिकांना तेथील विहिरीवरून पाणी आणत साठवावे लागत आहे. मात्र, घरची भांडीही अपुरी पडत असल्याने टाकी खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला आहे. गत काही वर्षांच्या तुलनेत शहरात पहिल्यांदाच पाण्याच्या टाकीची विक्रमी विक्री झाली आहे. केवळ मार्च महिन्यांत २५.५० लाख लिटर पाण्याच्या टाकीची विक्री झाली आहे.सेवाग्राम येथील औद्योगिक वसाहतीत टाकी निर्मितीचे दोन कारखाने आहेत. वाहतुकीच्या दृष्टीने शिवाय मालही वेळीच उपलब्ध होत असल्याने येथूनच टाकी खरेदीला वर्ध्यातील व्यावसायिक पसंती देतात. शहरात टाकी विक्री करणारे १० ते १५ व्यावसायिक आहेत. या व्यावसायिकांकडे ३००, ५००, ७५० आणि १ हजार, १ हजार ५०० आणि दोन हजार लिटर पाणी साठविण्याची क्षमता असलेल्या टाकी २ थर, तीन थर प्रमाणे उपलब्ध आहेत.केमिकलच्या ड्रमचाही वापरअनेकांना कंपन्यांच्या टाक्या घेणे परिस्थितीमुळे शक्य होत नसल्याने त्यांच्याकडून केमिकलकरिता वापरल्या जाणाºया प्लास्टिक ड्रमची पाणी साठवणुकीकरिता खरेदी केली जात आहे. हे ड्रम बाजारपेठेतील पटेल चौक, इतवारा बाजार परिसरात २५०, ३०० आणि ४५० रुपयांत उपलब्ध होत असून हा खर्च सर्वसामान्यांना झेपावणारा आहे. या ड्रमचीही मागणी प्रचंड वाढली आहे.पाणीटंचाईमुळे यंदा पाण्याच्या टाक्यांची गत काही वर्षांच्या तुलनेत मोठी मागणी वाढली आहे. यावर्षी केवळ मार्च महिन्यात टाक्यांची तीन पटीने विक्री झाली. पुढे मे महिना आहे. टाक्यांची आणखी मागणी वाढण्याची शक्यता आहे.फिदा हुसेन अलीभाईव्यावसायिक, वर्धा.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई