शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

टाकी विक्रीतून बाजारपेठेत कोटींची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 22:17 IST

पाणीटंचाई, आठ ते पंधरा दिवसांआड होणारा अल्प पाणीपुरवठा आणि हातपंप, विंधन विहिरींमधूनही पुरेसे पाणी येत नसल्याने पाणी साठवणुकीकरिता वापरात येणाऱ्या टाक्यांची शहरात प्रचंड मागणी वाढली आहे.

ठळक मुद्देपाणीटंचाईचा परिणाम : तिपटीने वाढली विक्री; जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीत दोन उद्योग

सुहास घनोकार ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पाणीटंचाई, आठ ते पंधरा दिवसांआड होणारा अल्प पाणीपुरवठा आणि हातपंप, विंधन विहिरींमधूनही पुरेसे पाणी येत नसल्याने पाणी साठवणुकीकरिता वापरात येणाऱ्या टाक्यांची शहरात प्रचंड मागणी वाढली आहे. एकट्या मार्चमध्ये ३,५०० टाक्या खरेदी करण्यात आल्याने बाजारपेठेत टाकी विक्री व्यवसायाने कोटींची उड्डाणे घेतल्याचे चित्र आहे. काही वर्षांपेक्षा यावर्षी तिपटीने विक्री वाढल्याची अधिकृत माहिती आहे.अल्प पर्जन्यमानामुळे यंदा जिल्ह्यात जलसंकट गडद झाले आहे. जिल्ह्यातील जलाशयांमध्ये जूनपर्यंत पुरेल एवढाच उपयुक्त जलसाठा आहे. अल्पसा जलसाठा असल्याने शहरात सात दिवसांआड तर लगतच्या ग्रामीण भागात तब्बल पंधरा दिवसांआड पाणीपुरवठा होत असून फार विलंबाने आणि तोही अल्प पाणीपुरवठा होत आहे. यातच शहरातील बहुतांश विहिरींनी तळ गाठला कूपनलिकाही कोरड्या झाल्या आहेत.शहरात आणि ग्रामीण भागात दररोज मोठ्या प्रमाणावर विंधनविहिरी केल्या जात आहेत. मात्र, २०० ते २५० फूट खोदूनही पाणी लागत नाही, अशी स्थिती आहे. गावातील विहिरी आणि शहरालगतच्या भागात शेती असलेल्या नागरिकांना तेथील विहिरीवरून पाणी आणत साठवावे लागत आहे. मात्र, घरची भांडीही अपुरी पडत असल्याने टाकी खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला आहे. गत काही वर्षांच्या तुलनेत शहरात पहिल्यांदाच पाण्याच्या टाकीची विक्रमी विक्री झाली आहे. केवळ मार्च महिन्यांत २५.५० लाख लिटर पाण्याच्या टाकीची विक्री झाली आहे.सेवाग्राम येथील औद्योगिक वसाहतीत टाकी निर्मितीचे दोन कारखाने आहेत. वाहतुकीच्या दृष्टीने शिवाय मालही वेळीच उपलब्ध होत असल्याने येथूनच टाकी खरेदीला वर्ध्यातील व्यावसायिक पसंती देतात. शहरात टाकी विक्री करणारे १० ते १५ व्यावसायिक आहेत. या व्यावसायिकांकडे ३००, ५००, ७५० आणि १ हजार, १ हजार ५०० आणि दोन हजार लिटर पाणी साठविण्याची क्षमता असलेल्या टाकी २ थर, तीन थर प्रमाणे उपलब्ध आहेत.केमिकलच्या ड्रमचाही वापरअनेकांना कंपन्यांच्या टाक्या घेणे परिस्थितीमुळे शक्य होत नसल्याने त्यांच्याकडून केमिकलकरिता वापरल्या जाणाºया प्लास्टिक ड्रमची पाणी साठवणुकीकरिता खरेदी केली जात आहे. हे ड्रम बाजारपेठेतील पटेल चौक, इतवारा बाजार परिसरात २५०, ३०० आणि ४५० रुपयांत उपलब्ध होत असून हा खर्च सर्वसामान्यांना झेपावणारा आहे. या ड्रमचीही मागणी प्रचंड वाढली आहे.पाणीटंचाईमुळे यंदा पाण्याच्या टाक्यांची गत काही वर्षांच्या तुलनेत मोठी मागणी वाढली आहे. यावर्षी केवळ मार्च महिन्यात टाक्यांची तीन पटीने विक्री झाली. पुढे मे महिना आहे. टाक्यांची आणखी मागणी वाढण्याची शक्यता आहे.फिदा हुसेन अलीभाईव्यावसायिक, वर्धा.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई