शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

अर्धवट बांधकामामुळे प्रवासी हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 00:26 IST

येथे अद्ययावत बसस्थानक निर्मितीसाठी तीन कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. तीन महिन्यांपूर्वी भूमिपुजनाचा सोपसकार पूर्ण झाला. त्यानंतर प्रत्यक्ष कामही सुरू झाले.

ठळक मुद्देबसस्थानकाची दैना : भूमिपूजनाला झाले तीन महिने

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : येथे अद्ययावत बसस्थानक निर्मितीसाठी तीन कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. तीन महिन्यांपूर्वी भूमिपुजनाचा सोपसकार पूर्ण झाला. त्यानंतर प्रत्यक्ष कामही सुरू झाले. परंतु, हे काम कासवगतीनेच होत असल्याने शिवाय प्रवाशांसाठी पर्यायी निवाऱ्याची व्यवस्था न करण्यात येताच जुनी इमारत जमिनदोस्त करण्यात आल्याने सध्या प्रवाशांना झाडांचा आधार घ्यावा लागत आहे. याचा सर्वाधिक त्रास महिलांसह विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे.गत ९ एप्रिलला मोठा गाजावाजा करून देवळीच्या नवीन बसस्थानकाचे मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. ३ कोटींच्या निधीतून अद्यायवत व आधुनिक बसस्थानक तयार होईल, असे यावेळी सांगण्यात आले होते. शिवाय येत्या दोन-चार दिवसात नव्या बस स्थानकाचे बांधकामही सुरू करण्यात येईल, असे सांगितले होते. परंतु, प्रत्यक्ष कृती करण्याकडे पाठच दाखविण्यात आली. कंत्राटदाराने बसस्थानकाची जुनी इमारत जमिनदोस्त केली. त्यामुळे सध्या पावसापासून बचाव करण्यासाठी विद्यार्थ्यांसह प्रवाशांना परिसरातील चहा टपरींचा आधार घ्यावा लागत आहे. प्रवाशांची समस्या लक्षात घेता पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे होते. परंतु, दहा बाय दहाचे एक प्लास्टिक टाकून तात्पूर्ता निवारा तयार करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर सदर बस स्थानकात पावसाचे पाणी साचून राहत असून तेथे चिखल तयार झाला आहे. प्रवाशांना चिखल तुडवतच बस मध्ये चढावे लागत आहे. सदर प्रकाराकडे रापमच्या वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.साधी वीट ठेवण्यासाठीही मुहूर्ताचा शोध?भुमिपूजन होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला. परंतु, नवीन बसस्थानकाच्या निर्मितीसाठी आतापर्यंत साधी एक वीटही ठेवण्यात आली नाही. त्यातच सध्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. साधी वीट ठेवण्यासाठी रापमचे अधिकारी व कंत्राटदार कुठला मुहूर्त तर शोधत नाही ना, असा प्रश्न सध्या संतप्त प्रवासी उपस्थित करीत आहेत. त्यामुळे रापमच्या वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याच्या सुचना द्याव्या, अशी मागणी आहे.नवीन बसस्थानकात राहणार या सोयी-सुविधा३ कोटींच्या खर्चातून या स्थानकावर आठ प्लॅटफार्म, मिटिंग हॉल, तीन विश्रामगृह, महिला व पुरुषांसाठी प्रसाधनगृह, दर्शनीय भागात बगीचा, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, कुंपन भिंत, दुकानांची व्यवस्था, पार्सल आॅफीस, स्वतंत्र पोलीस चौकी, वाहनतळ, आधुनिक फॉल सिलींग तसेच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे; पण सध्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असल्याने पर्यायी व्यवस्था गरजेचे आहे. 

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ