शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

व्यापाऱ्यांची तूर खरेदी शासनापेक्षा दुप्पट

By admin | Updated: April 28, 2017 02:07 IST

गतवर्षी तुरीचे भाव १० हजारांपर्यंत पोहोचल्याने शेतकऱ्यांनी यंदा पेरा वाढविला; पण शासकीय धोरणामुळे यंदा तुरीला अल्प भावच होता.

शेतकऱ्यांचे ४० ते ५० कोटींचे नुकसान : शासनाची दीड लाख तर खासगी तीन लाख क्विंटल खरेदी वर्धा : गतवर्षी तुरीचे भाव १० हजारांपर्यंत पोहोचल्याने शेतकऱ्यांनी यंदा पेरा वाढविला; पण शासकीय धोरणामुळे यंदा तुरीला अल्प भावच होता. व्यापाऱ्यांनी ३९०० ते ४३०० रुपयांपर्यंत तूर खरेदी केली. परिणामी, शासनाने एफसीआय व नाफेडमार्फत ५०५० या हमीभावाने तूर खरेदीचे धोरण आखले; पण अत्यंत संथगतीने खरेदी केल्याने बंदीपर्यंत केवळ दीड लाख क्विंटल तूर शासनाने खरेदी केली. याउलट व्यापाऱ्यांनी तब्बल तीन लाख क्विंटल तुरीची खरेदी केली. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुमारे ४० ते ५० कोटी रुपयांचे नुकसान झाले. शासनाकडून शेतमालाचे हमीभाव जाहीर केले जातात; पण व्यापाऱ्यांकडून त्यापेक्षा कमी भावात खरेदी केली जाते. परिणामी, शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागते. गतवर्षी भाव वाढल्याने यंदा शेतकऱ्यांनी तुरीचा पेरा वाढविला; पण शासनाच्या नियंत्रणामुळे लगेच भाव पडले. यामुळे शेतकऱ्यांची फटफजिती झाली. व्यापाऱ्यांकडून देण्यात येणाऱ्या भावात शेतीचा खर्चही भरून निघणे कठीण होते. यामुळे शासनाने तुरीची हमीभावात खरेदी करावी, अशी मागणी होऊ लागली. दबाव वाढल्याने शासनानेही तूर खरेदीची ग्वाही दिली. प्रथम शेतकऱ्यांचा शेतमाल संपेपर्यंत खरेदी सुरू राहणार, असे सांगणाऱ्या शासनाने १५ एप्रिलपासूनच तूर खरेदी बंद केली. यानंतर लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांच्या दबावामुळे टोकण दिलेल्या बाजार समितीत असलेल्या मालाची खरेदी करण्यात आली; पण नोंद करून बाजार समितीत जागा नसल्याने शेतकऱ्यांनी घरीच ठेवलेल्या तुरीची खरेदी शासनाने केली नाही. यामुळे नाईलाज म्हणून शेतकऱ्यांना घरी असलेली तूर व्यापाऱ्यांच्या घशात घालावी लागणार असल्याचे चित्र आहे. शासनाच्यावतीने नाफेड आणि एफसीआय या संस्थांनी वर्धा जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये तूर खरेदी केली. अत्यंत संथगतीने ही खरेदी करण्यात आली. यातही अनेकदा वाद निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला होता. हिंगणघाट आणि आर्वी बाजार समितीमध्ये अनेकदा शेतकरी, नाफेडचे ग्रेडर यांच्यात वाद झाले. या सर्व अडथळ्यांतून बंदी येईपर्यंत शासनाने केवळ १ लाख ६२ हजार ६६२ क्विंटल तुरीची खरेदी केली. याउलट व्यापाऱ्यांनी मात्र नाफेड व एफसीआयची खरेदी सुरू असताना ३ लाख १९ हजार २८३ क्विंटल तुरीची खरेदी केली. ही खरेदी शासनापेक्षा दुप्पट असल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. शिवाय बहुतांश शेतकऱ्यांनी तूर बाजारात न आणता नोंद करून घरीच ठेवलेली आहे. या तुरीचा विचार केल्यास शेतकऱ्यांचे तब्बल ५० कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे. शेतकऱ्यांना हे नुकसान शासनाकडून भरून मिळणार काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.(कार्यालय प्रतिनिधी) हिंगणघाट बाजार समितीची शून्य व्याजावर तूर तारण योजना हिंगणघाट : राज्यात तुरीचे भाव पडले असताना बाजार समितीने तूर तारण योजना शून्य व्याज दरावर राबविण्याचा निर्णय घेतला. या योजनेंतर्गत तीन महिन्यांचे गोदाम भाडे शेतकऱ्यांना माफ करण्यात आले. ही अभिनव तारण योजना राज्यात पहिलीच ठरणार आहे. देशांतर्गत तुरीचे भाव आधारभूत किंमतीपेक्षा कमी आहे. नाफेडची खरेदी बंदी झाली. अशास्थितीत पडत्या भावात शेतकऱ्यांना तूर विकावी लागू नये म्हणून बाजार समितीने ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. बाजार हस्तक्षेप योजना राबविणार - तडस वर्धा : तूर खरेदी प्रश्नावर चर्चा करीत समारात्मक तोडगा काढण्यासाठी खासदार रामदास तडस यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय अन्नपुरवठा राज्यमंत्री सी.आर. चौधरी यांची सोमवारी भेट घेतली. यावेळी उर्वरित शेतकऱ्यांच्या तूर खरेदीसाठी बाजार हस्तक्षेप योजना राबविणार असून अध्यादेश निर्गमित केल्याची माहिती देण्यात आली. केंद्रीय अन्नपुरवठा राज्यमंत्र्यांनुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्यात सविस्तर चर्चा झाली. महाराष्ट्र राज्याद्वारे सर्व संबंधित प्रश्न गंभीरतेने केंद्र शासनाने पटलावर घेतला आहे. खा तडस यांनी शेतकऱ्यांच्या तुरीची समस्या अनेक वृत्तपत्रांच्या कात्रणे व निवेदनासह सादर करीत समस्या मार्गी लावण्याची विनंती केली. यावर्षी तूर पिकाचे विक्रमी उत्पादन झाले असून २२ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. संपूर्ण देशात ११ लाख टन तूर खरेदी झाली असून महाराष्ट्रात ४ लाख टन तूर खरेदी करण्यात आली. इतर राज्याशी तुलना केल्यास कोणत्याही राज्यात १.५ लाख टनापेक्षा अधिक तूर खरेदी झाली नाही, अशी माहिती चर्चेत दिली.