शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
3
PM Modi Birthday : जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
4
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
5
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
6
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
7
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
8
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
9
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
10
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
11
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
12
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
13
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
14
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
15
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
16
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
18
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
19
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
20
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली

शिथिलता पण, प्रशासनाकडून उपाययोजना कठोरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 05:00 IST

शिथिलता दिल्यानंतर सर्व दुकानेही सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत सुरु आहे. उद्योग व्यवसायलाही चालना मिळाली आहे. निमशासकीय, खासगी व शासकीय कार्यालयातही कर्मचाऱ्यांची उपस्थिती वाढविण्यात आली आहे. परिणामी रस्त्यावर किंवा बाजारपेठेत गर्दी होतांना दिसत आहे. बाहेर जिल्ह्यातून ये-जा करणाऱ्यांचेही प्रमाण वाढल्याने आता उपाययोजनांवर वॉच ठेवण्याचे निर्देश दिले आहे.

ठळक मुद्देपुन्हा दंडात्मक कारवाईला गती : गृह विलगीकरणातून बाहेर पडणाऱ्यास दहा हजाराचा दंड

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात नोकरीनिमित्त, खरेदीसाठी व कामासाठी घराबाहेर पडत आहे. बाहेर जिल्ह्यातून किंवा राज्यातूनही जाणे-येणे करीत असल्याने कोविड-१९ चा संसर्ग वाढण्याची शक्यता असल्यानमुळे प्रतिबंधक उपाययोजनांची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. त्यामुळे पुन्हा दंडात्मक कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.शिथिलता दिल्यानंतर सर्व दुकानेही सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत सुरु आहे. उद्योग व्यवसायलाही चालना मिळाली आहे. निमशासकीय, खासगी व शासकीय कार्यालयातही कर्मचाऱ्यांची उपस्थिती वाढविण्यात आली आहे. परिणामी रस्त्यावर किंवा बाजारपेठेत गर्दी होतांना दिसत आहे. बाहेर जिल्ह्यातून ये-जा करणाऱ्यांचेही प्रमाण वाढल्याने आता उपाययोजनांवर वॉच ठेवण्याचे निर्देश दिले आहे. यामध्ये घराबाहेर पडणाºया व्यक्तीने मास्क घालणे.दुकानांमध्ये सोशल डिस्टंन्सिंग व सॅनिटायझरचा वापर करणे. भाजी बाजारात दुकानदारांमध्ये पुरेसे अंतर ठेवणे तसेच ग्राहकांनीही सोशल डिस्टंन्सिंग व सॅनिटायझरचा वापर करणे.दुकान विहिती वेळेत उघडणे, बंद करणे तसेच दुकानात पर्याप्त सुविधा ठेवून दुकानातील सर्व कर्मचाऱ्यांनी मास्क वापरणे, गृह विलगीकरणातील व्यक्तीने नियमाचे पालन करुन घरातच राहणे, सक्षम अधिकाºयांची परवानगी घेऊन वाहतूक करणे, अनलोडिंग पॉइंटलाच वाहने थाबविणे व सोबतच्या व्यक्तीचा स्थानिक व्यक्तीशी संपर्क न होऊ देणे, या सूचनांचे पालन होते की नाही, याची तपासणी करुन कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे कारवाईला पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे....तर दुकान होणार सात दिवसासाठी सीलमास्क न लावता फिरणाºयाला दोनशे रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. दुकानात गर्दी, पर्याप्त सुविधांचा अभाव तसेच विहित वेळेनंतर दुकान उघडे ठेवले तर पहिल्यांदा दोन दिवस आणि दुसºयांदा आढळून आल्यास सात दिवस दुकानांला सील लावले जाणार आहे.गृह विलगीकरणातील व्यक्ती बाहेर आढळल्यास १० हजार रुपये दंड आकारल्या जाणार आहे. यासोबतच अवैध वाहतूक करणाºया व्यक्तीला १ हजाराचा दंड आणि अवैध वाहतूक करणाऱ्यांचे वाहन जप्त करुन १ हजार रुपये दंड तर वाहनचालकाचा परवाना रद्द केला जाणार आहे.मास्क न वापरणाऱ्या ६० जणांवर दंडात्मक कारवाईजिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईबाबत नव्याने आदेश पारित करताच शहर पोलिसांनी गुरुवारी सकाळी कारवाईचा बडगा उगारला. निर्धारित वेळेपूर्वीच दुकान उघडणाऱ्या दहा दुकानांवर कारवाई करीत दुकाने सील केले. तसेच शहरात मास्क न लावता फिरणाऱ्या ६० जणांना ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यात नेले. त्यांच्या नावाची नोंदणी करुन त्यांच्याकडून प्रत्येकी २०० रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई अशीच सुरु राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांनी सांगितले.

टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या