शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
3
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
4
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
5
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
6
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
7
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
8
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
9
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
10
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
11
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
12
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
13
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
14
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
15
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
16
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
17
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
18
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
20
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं

लॉकडाऊनच्या पार्श्वभूूमीवर भरारी पथकाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 05:00 IST

या पथकांनी गुरुवारपर्यंत ५५ प्रकरणात ९ एफआयआर नोंदवून साडेतीन लाखांची दंडवसुली केली आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत एकूण १२ प्रकरणात कारवाई करून ५ हजार ६०० रुपयांचा दंड केला आहे. कोविड १९ विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निगरानी पथकाने कलम १८८ व साथरोग प्रतिबंध कायदा १८९७ अंतर्गत ५५ प्रकरणांत ९ एफआयआर नोंदवून साडेतीन लाखांचा दंड वसूल केला आहे.

ठळक मुद्देशासन निर्देश अवहेलनेची ५५ प्रकरणे : ९ एफआयआर, साडेतीन लाखाची दंड वसुली

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाहा/आर्वी : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. घराबाहेर पडू नका, घरीच राहा , आरोग्याची काळजी घ्या, असे वारंवार शासनाने आवाहन करूनही नागरिक ऐकत नाहीत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नाहीत. मास्क लावत नाही. गर्दी करतात. एवढेच नव्हे, तर लॉकडाऊन असूनही व्यावसायिक दुकाने उघडतात. निर्देशाचे पालन करीत नसल्याने यावर कडक उपाययोजना करून आळा घालण्यासाठी उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांनी भरारी, निगराणी पथके तयार केली.या पथकांनी गुरुवारपर्यंत ५५ प्रकरणात ९ एफआयआर नोंदवून साडेतीन लाखांची दंडवसुली केली आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत एकूण १२ प्रकरणात कारवाई करून ५ हजार ६०० रुपयांचा दंड केला आहे.कोविड १९ विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निगरानी पथकाने कलम १८८ व साथरोग प्रतिबंध कायदा १८९७ अंतर्गत ५५ प्रकरणांत ९ एफआयआर नोंदवून साडेतीन लाखांचा दंड वसूल केला आहे. तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांनी राजापूर बाजारवाडा मिर्झापूर, मायबाई वॉर्ड या परिसरात भेटी देऊन तपासणी केली असता दहा प्रकरणांत १७ हजार ५८० रुपयांचा दंड ठोठवून वसुली केली.नायब तहसीलदार विनायक मगर यांच्या पथकाने कलम १८८, २६९ साथरोग अधिनियम १८९७ कलम ३ अन्वये, एक, एफआयआर नोंदविली, तीन प्रकरणांत ५७ हजार २०० रुपयांचा दंड तर एका प्रकरणात दोन लाखाचा दंड आकारला. जाम, चांदणी, हरदोली या परिसरात भेट देऊन तपासणी केली.नायब तहसीलदार व्ही. पी. हूड यांनी वाढोणा परिसरात तपासणी करून एका प्रकरणात २ हजाराचा दंड केला तर एकूण चार प्रकरणात ५४ हजार २०० रुपयाची दंडवसुली केली. विस्तार अधिकारी शेंडे यांनी खरांगणा परिसरातील पाच प्रकरणात २ हजार ५०० रुपयांचा दंड केला. एकूण सोळा प्रकरणात ८ हजारांची दंड वसुली केली. आर्वी नगरपालिकेचे मुख्याधिकारी विद्याधर अंधारे यांनी पाच प्रकरणात ९०० रुपये दंड तर कलम १८८, २६९ साथरोग अधिनियम १८९७ कलम ३ नुसार ८ एफआयआर आणि १३ प्रकरणात २ हजार ३४० रुपयांची दंड वसुली केली.कोरोना आटोक्यात आणायचा असेल तर घरात राहा आणि बाहेर पडणे गरजेचे असेल तर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, असे सांगितले जात आहे. मात्र, अनेक भागात प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे यासाठी, दंडात्मक कारवाईला सुरवात करण्यात आली आहे.- विद्यासागर चव्हाण, तहसीलदार, आर्वी.

टॅग्स :Tahasildarतहसीलदार