शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

लॉकडाऊनच्या पार्श्वभूूमीवर भरारी पथकाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 05:00 IST

या पथकांनी गुरुवारपर्यंत ५५ प्रकरणात ९ एफआयआर नोंदवून साडेतीन लाखांची दंडवसुली केली आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत एकूण १२ प्रकरणात कारवाई करून ५ हजार ६०० रुपयांचा दंड केला आहे. कोविड १९ विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निगरानी पथकाने कलम १८८ व साथरोग प्रतिबंध कायदा १८९७ अंतर्गत ५५ प्रकरणांत ९ एफआयआर नोंदवून साडेतीन लाखांचा दंड वसूल केला आहे.

ठळक मुद्देशासन निर्देश अवहेलनेची ५५ प्रकरणे : ९ एफआयआर, साडेतीन लाखाची दंड वसुली

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाहा/आर्वी : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. घराबाहेर पडू नका, घरीच राहा , आरोग्याची काळजी घ्या, असे वारंवार शासनाने आवाहन करूनही नागरिक ऐकत नाहीत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत नाहीत. मास्क लावत नाही. गर्दी करतात. एवढेच नव्हे, तर लॉकडाऊन असूनही व्यावसायिक दुकाने उघडतात. निर्देशाचे पालन करीत नसल्याने यावर कडक उपाययोजना करून आळा घालण्यासाठी उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांनी भरारी, निगराणी पथके तयार केली.या पथकांनी गुरुवारपर्यंत ५५ प्रकरणात ९ एफआयआर नोंदवून साडेतीन लाखांची दंडवसुली केली आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत एकूण १२ प्रकरणात कारवाई करून ५ हजार ६०० रुपयांचा दंड केला आहे.कोविड १९ विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निगरानी पथकाने कलम १८८ व साथरोग प्रतिबंध कायदा १८९७ अंतर्गत ५५ प्रकरणांत ९ एफआयआर नोंदवून साडेतीन लाखांचा दंड वसूल केला आहे. तहसीलदार विद्यासागर चव्हाण यांनी राजापूर बाजारवाडा मिर्झापूर, मायबाई वॉर्ड या परिसरात भेटी देऊन तपासणी केली असता दहा प्रकरणांत १७ हजार ५८० रुपयांचा दंड ठोठवून वसुली केली.नायब तहसीलदार विनायक मगर यांच्या पथकाने कलम १८८, २६९ साथरोग अधिनियम १८९७ कलम ३ अन्वये, एक, एफआयआर नोंदविली, तीन प्रकरणांत ५७ हजार २०० रुपयांचा दंड तर एका प्रकरणात दोन लाखाचा दंड आकारला. जाम, चांदणी, हरदोली या परिसरात भेट देऊन तपासणी केली.नायब तहसीलदार व्ही. पी. हूड यांनी वाढोणा परिसरात तपासणी करून एका प्रकरणात २ हजाराचा दंड केला तर एकूण चार प्रकरणात ५४ हजार २०० रुपयाची दंडवसुली केली. विस्तार अधिकारी शेंडे यांनी खरांगणा परिसरातील पाच प्रकरणात २ हजार ५०० रुपयांचा दंड केला. एकूण सोळा प्रकरणात ८ हजारांची दंड वसुली केली. आर्वी नगरपालिकेचे मुख्याधिकारी विद्याधर अंधारे यांनी पाच प्रकरणात ९०० रुपये दंड तर कलम १८८, २६९ साथरोग अधिनियम १८९७ कलम ३ नुसार ८ एफआयआर आणि १३ प्रकरणात २ हजार ३४० रुपयांची दंड वसुली केली.कोरोना आटोक्यात आणायचा असेल तर घरात राहा आणि बाहेर पडणे गरजेचे असेल तर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, असे सांगितले जात आहे. मात्र, अनेक भागात प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे यासाठी, दंडात्मक कारवाईला सुरवात करण्यात आली आहे.- विद्यासागर चव्हाण, तहसीलदार, आर्वी.

टॅग्स :Tahasildarतहसीलदार