शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

हिंदी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी काढला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 06:00 IST

जेएनयूचे विद्यार्थी जवळपास दोन महिन्यांपासून फी वाढीच्या विरोधात लोकशाही पद्धती संघर्ष करित आहेत. मात्र, त्यांच्यावर काही बाहेरील गुंडांनी मुखवटा घालून भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात विद्यार्थी, संशोधनकर्ते आणि प्राध्यापकांना गंभीर दुखापत झाली. एकीकडे गुंड विद्यापीठ परिसरात घुसून हल्ला करतात तर दुसरीकडे प्रशासन शांत दिसत आहे. त्यामुळे हा हल्ला नियोजित असल्याचा आरोपही यावेळी विद्यार्थ्यांकडून करण्यात आला.

ठळक मुद्देजेएनयुमधील हल्ल्याचा निषेध : कठोर कारवाई करा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जेएनयूमधील विद्यार्थी आणि संशोधकांवर झालेल्या भ्याड हल्ल्यात ३५ पेक्षा जास्त विद्यार्थी व संशोधनकर्ते जखमी झाले. या हल्ल्याच्या निषेधार्थ आणि जेएनयुमधील विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ येथील हिंदी विश्व विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसरात मोर्चा काढला. जोरदार घोषणाबाजी करीत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.जेएनयूचे विद्यार्थी जवळपास दोन महिन्यांपासून फी वाढीच्या विरोधात लोकशाही पद्धती संघर्ष करित आहेत. मात्र, त्यांच्यावर काही बाहेरील गुंडांनी मुखवटा घालून भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात विद्यार्थी, संशोधनकर्ते आणि प्राध्यापकांना गंभीर दुखापत झाली. एकीकडे गुंड विद्यापीठ परिसरात घुसून हल्ला करतात तर दुसरीकडे प्रशासन शांत दिसत आहे. त्यामुळे हा हल्ला नियोजित असल्याचा आरोपही यावेळी विद्यार्थ्यांकडून करण्यात आला. या हल्ल्याच्या निषेधार्थ गांधी विद्यापीठातील विद्यार्थी आणि हिंदी विद्यापीठाच्या संशोधकांनी हिंदी विश्व विद्यापीठाच्या मुख्यव्दारापर्यंत मोर्चा काढला. या दरम्यान उपस्थितांनी केंद्र सरकार शैक्षणिक संस्था उद्धवस्त करुन खाजगीकरणावर जोर देत आहे. जामिया मिलिया, एएमयू आणि जेएनयूच्या विद्यार्थ्यांवर हल्ले करुन बदनामी करण्याचा प्रयत्न बऱ्याच काळापासून चालू आहे. यावेळी विद्यार्थ्यांचे नेतृत्व करणारे चंदन सरोज, रविचंद्र, अजय राऊत यांनी मार्गदर्शन केले. या मोर्चानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थितांचे आभार इस्तेखार अहमद यांनी मानले. या मोर्चादरम्यान विद्यापीठ परिसरात विद्यार्थी व संशोधनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या मोर्चामध्ये विश्व हिंदी विद्यापीठातील विद्यार्थी व संशोधनकर्ते मोठ्या संख्येने सहभगी होते. या मोर्चादरम्यान हिंदी विश्व विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन त्याव्दारे या घटनेचा निषेध केला. व हल्लेखोरांवर कारवार्इंची मागणी केली.सेवाग्राम आश्रमाबाहेर सर्व सेवा संघ करणार ३० ला सत्याग्रहसेवाग्राम- जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयात ५ जानेवारीला शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर ५० जणांनी प्राणघातक हल्ला केला. यात विद्यार्थी संघाच्या अध्यक्षा आय.सी.घोष गंभीर जखमी झाल्या. हल्लेखोर लाठी,रॉड घेऊन विद्यापीठ परिसरात शिरले त्यांनी तीन तास गोंधळ घातला. याची माहिती पोलिसांना दिल्यावरही पोलीस वेळेवर पोहोचली नसल्याने यामध्ये पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. या घटनेचा निषेध म्हणून अखिल भारतीय सर्व सेवा संघांचे अध्यक्ष महादेव विद्रोही यांनी महात्मा गांधीजींच्या शहिद दिनी ३० जानेवारीला सेवाग्राम आश्रम समोर उपवास सत्याग्रह करणार असल्याचे जाहीर केले आहे. हल्याच्या अगोदर व्हॉट्स अ‍ॅपवरील मेसेज मध्ये वी.सी.आपला माणूस असल्याचे म्हटले. यावरून हल्ला सुनियोजित असल्याचे स्पष्ट होते. ज्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही मान्य नाही, अशांचा या हल्ल्यात हात आहे. या लोकांची कार्यपद्धती फासिवाद आहे. यातून अनेकांना हिटलर व मुसोलिनी पासून प्रेरणा मिळते. अशाच विचांराच्या लोकांनी गांधीजींची गोळ्या घालून हत्या केली.गांधी विचार यामुळे संपेल असा समज होता. पण गांधी विचार मात्र सर्वत्र पसरत असल्याचे सांगून हिंसाचाराचा तेच आश्रय घेतात ज्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही. या हिंसाचारात तेच लोकं सहभागी आहेत असेही विद्रोही यांनी पत्रकातून म्हटले आहे. सर्व सेवा संघाने या घटनेचा विरोध, नागरिकता संशोधन, एन.आर.सी.आणि एन.पी.आर.चा विरोध करण्यासाठी बापूंच्या बलिदानदिनी सकाळपासून सायंकाळी ५.१७ वाजतापर्यंत उपवास करणार आहे. त्यानंतर सर्व धर्म प्रार्थनेने या सत्याग्रहाचा समारोप होणार आहे.

टॅग्स :hindiहिंदीuniversityविद्यापीठ