शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
3
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
4
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
5
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
6
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
7
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
8
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
9
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
10
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
11
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
12
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
13
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
14
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
15
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
16
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
17
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
18
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
19
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
20
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा

हिंदी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी काढला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 06:00 IST

जेएनयूचे विद्यार्थी जवळपास दोन महिन्यांपासून फी वाढीच्या विरोधात लोकशाही पद्धती संघर्ष करित आहेत. मात्र, त्यांच्यावर काही बाहेरील गुंडांनी मुखवटा घालून भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात विद्यार्थी, संशोधनकर्ते आणि प्राध्यापकांना गंभीर दुखापत झाली. एकीकडे गुंड विद्यापीठ परिसरात घुसून हल्ला करतात तर दुसरीकडे प्रशासन शांत दिसत आहे. त्यामुळे हा हल्ला नियोजित असल्याचा आरोपही यावेळी विद्यार्थ्यांकडून करण्यात आला.

ठळक मुद्देजेएनयुमधील हल्ल्याचा निषेध : कठोर कारवाई करा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जेएनयूमधील विद्यार्थी आणि संशोधकांवर झालेल्या भ्याड हल्ल्यात ३५ पेक्षा जास्त विद्यार्थी व संशोधनकर्ते जखमी झाले. या हल्ल्याच्या निषेधार्थ आणि जेएनयुमधील विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ येथील हिंदी विश्व विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसरात मोर्चा काढला. जोरदार घोषणाबाजी करीत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.जेएनयूचे विद्यार्थी जवळपास दोन महिन्यांपासून फी वाढीच्या विरोधात लोकशाही पद्धती संघर्ष करित आहेत. मात्र, त्यांच्यावर काही बाहेरील गुंडांनी मुखवटा घालून भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात विद्यार्थी, संशोधनकर्ते आणि प्राध्यापकांना गंभीर दुखापत झाली. एकीकडे गुंड विद्यापीठ परिसरात घुसून हल्ला करतात तर दुसरीकडे प्रशासन शांत दिसत आहे. त्यामुळे हा हल्ला नियोजित असल्याचा आरोपही यावेळी विद्यार्थ्यांकडून करण्यात आला. या हल्ल्याच्या निषेधार्थ गांधी विद्यापीठातील विद्यार्थी आणि हिंदी विद्यापीठाच्या संशोधकांनी हिंदी विश्व विद्यापीठाच्या मुख्यव्दारापर्यंत मोर्चा काढला. या दरम्यान उपस्थितांनी केंद्र सरकार शैक्षणिक संस्था उद्धवस्त करुन खाजगीकरणावर जोर देत आहे. जामिया मिलिया, एएमयू आणि जेएनयूच्या विद्यार्थ्यांवर हल्ले करुन बदनामी करण्याचा प्रयत्न बऱ्याच काळापासून चालू आहे. यावेळी विद्यार्थ्यांचे नेतृत्व करणारे चंदन सरोज, रविचंद्र, अजय राऊत यांनी मार्गदर्शन केले. या मोर्चानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थितांचे आभार इस्तेखार अहमद यांनी मानले. या मोर्चादरम्यान विद्यापीठ परिसरात विद्यार्थी व संशोधनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या मोर्चामध्ये विश्व हिंदी विद्यापीठातील विद्यार्थी व संशोधनकर्ते मोठ्या संख्येने सहभगी होते. या मोर्चादरम्यान हिंदी विश्व विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन त्याव्दारे या घटनेचा निषेध केला. व हल्लेखोरांवर कारवार्इंची मागणी केली.सेवाग्राम आश्रमाबाहेर सर्व सेवा संघ करणार ३० ला सत्याग्रहसेवाग्राम- जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयात ५ जानेवारीला शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर ५० जणांनी प्राणघातक हल्ला केला. यात विद्यार्थी संघाच्या अध्यक्षा आय.सी.घोष गंभीर जखमी झाल्या. हल्लेखोर लाठी,रॉड घेऊन विद्यापीठ परिसरात शिरले त्यांनी तीन तास गोंधळ घातला. याची माहिती पोलिसांना दिल्यावरही पोलीस वेळेवर पोहोचली नसल्याने यामध्ये पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. या घटनेचा निषेध म्हणून अखिल भारतीय सर्व सेवा संघांचे अध्यक्ष महादेव विद्रोही यांनी महात्मा गांधीजींच्या शहिद दिनी ३० जानेवारीला सेवाग्राम आश्रम समोर उपवास सत्याग्रह करणार असल्याचे जाहीर केले आहे. हल्याच्या अगोदर व्हॉट्स अ‍ॅपवरील मेसेज मध्ये वी.सी.आपला माणूस असल्याचे म्हटले. यावरून हल्ला सुनियोजित असल्याचे स्पष्ट होते. ज्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही मान्य नाही, अशांचा या हल्ल्यात हात आहे. या लोकांची कार्यपद्धती फासिवाद आहे. यातून अनेकांना हिटलर व मुसोलिनी पासून प्रेरणा मिळते. अशाच विचांराच्या लोकांनी गांधीजींची गोळ्या घालून हत्या केली.गांधी विचार यामुळे संपेल असा समज होता. पण गांधी विचार मात्र सर्वत्र पसरत असल्याचे सांगून हिंसाचाराचा तेच आश्रय घेतात ज्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही. या हिंसाचारात तेच लोकं सहभागी आहेत असेही विद्रोही यांनी पत्रकातून म्हटले आहे. सर्व सेवा संघाने या घटनेचा विरोध, नागरिकता संशोधन, एन.आर.सी.आणि एन.पी.आर.चा विरोध करण्यासाठी बापूंच्या बलिदानदिनी सकाळपासून सायंकाळी ५.१७ वाजतापर्यंत उपवास करणार आहे. त्यानंतर सर्व धर्म प्रार्थनेने या सत्याग्रहाचा समारोप होणार आहे.

टॅग्स :hindiहिंदीuniversityविद्यापीठ