शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

हिंदी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी काढला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 06:00 IST

जेएनयूचे विद्यार्थी जवळपास दोन महिन्यांपासून फी वाढीच्या विरोधात लोकशाही पद्धती संघर्ष करित आहेत. मात्र, त्यांच्यावर काही बाहेरील गुंडांनी मुखवटा घालून भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात विद्यार्थी, संशोधनकर्ते आणि प्राध्यापकांना गंभीर दुखापत झाली. एकीकडे गुंड विद्यापीठ परिसरात घुसून हल्ला करतात तर दुसरीकडे प्रशासन शांत दिसत आहे. त्यामुळे हा हल्ला नियोजित असल्याचा आरोपही यावेळी विद्यार्थ्यांकडून करण्यात आला.

ठळक मुद्देजेएनयुमधील हल्ल्याचा निषेध : कठोर कारवाई करा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जेएनयूमधील विद्यार्थी आणि संशोधकांवर झालेल्या भ्याड हल्ल्यात ३५ पेक्षा जास्त विद्यार्थी व संशोधनकर्ते जखमी झाले. या हल्ल्याच्या निषेधार्थ आणि जेएनयुमधील विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ येथील हिंदी विश्व विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसरात मोर्चा काढला. जोरदार घोषणाबाजी करीत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.जेएनयूचे विद्यार्थी जवळपास दोन महिन्यांपासून फी वाढीच्या विरोधात लोकशाही पद्धती संघर्ष करित आहेत. मात्र, त्यांच्यावर काही बाहेरील गुंडांनी मुखवटा घालून भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात विद्यार्थी, संशोधनकर्ते आणि प्राध्यापकांना गंभीर दुखापत झाली. एकीकडे गुंड विद्यापीठ परिसरात घुसून हल्ला करतात तर दुसरीकडे प्रशासन शांत दिसत आहे. त्यामुळे हा हल्ला नियोजित असल्याचा आरोपही यावेळी विद्यार्थ्यांकडून करण्यात आला. या हल्ल्याच्या निषेधार्थ गांधी विद्यापीठातील विद्यार्थी आणि हिंदी विद्यापीठाच्या संशोधकांनी हिंदी विश्व विद्यापीठाच्या मुख्यव्दारापर्यंत मोर्चा काढला. या दरम्यान उपस्थितांनी केंद्र सरकार शैक्षणिक संस्था उद्धवस्त करुन खाजगीकरणावर जोर देत आहे. जामिया मिलिया, एएमयू आणि जेएनयूच्या विद्यार्थ्यांवर हल्ले करुन बदनामी करण्याचा प्रयत्न बऱ्याच काळापासून चालू आहे. यावेळी विद्यार्थ्यांचे नेतृत्व करणारे चंदन सरोज, रविचंद्र, अजय राऊत यांनी मार्गदर्शन केले. या मोर्चानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थितांचे आभार इस्तेखार अहमद यांनी मानले. या मोर्चादरम्यान विद्यापीठ परिसरात विद्यार्थी व संशोधनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या मोर्चामध्ये विश्व हिंदी विद्यापीठातील विद्यार्थी व संशोधनकर्ते मोठ्या संख्येने सहभगी होते. या मोर्चादरम्यान हिंदी विश्व विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन त्याव्दारे या घटनेचा निषेध केला. व हल्लेखोरांवर कारवार्इंची मागणी केली.सेवाग्राम आश्रमाबाहेर सर्व सेवा संघ करणार ३० ला सत्याग्रहसेवाग्राम- जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयात ५ जानेवारीला शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर ५० जणांनी प्राणघातक हल्ला केला. यात विद्यार्थी संघाच्या अध्यक्षा आय.सी.घोष गंभीर जखमी झाल्या. हल्लेखोर लाठी,रॉड घेऊन विद्यापीठ परिसरात शिरले त्यांनी तीन तास गोंधळ घातला. याची माहिती पोलिसांना दिल्यावरही पोलीस वेळेवर पोहोचली नसल्याने यामध्ये पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. या घटनेचा निषेध म्हणून अखिल भारतीय सर्व सेवा संघांचे अध्यक्ष महादेव विद्रोही यांनी महात्मा गांधीजींच्या शहिद दिनी ३० जानेवारीला सेवाग्राम आश्रम समोर उपवास सत्याग्रह करणार असल्याचे जाहीर केले आहे. हल्याच्या अगोदर व्हॉट्स अ‍ॅपवरील मेसेज मध्ये वी.सी.आपला माणूस असल्याचे म्हटले. यावरून हल्ला सुनियोजित असल्याचे स्पष्ट होते. ज्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही मान्य नाही, अशांचा या हल्ल्यात हात आहे. या लोकांची कार्यपद्धती फासिवाद आहे. यातून अनेकांना हिटलर व मुसोलिनी पासून प्रेरणा मिळते. अशाच विचांराच्या लोकांनी गांधीजींची गोळ्या घालून हत्या केली.गांधी विचार यामुळे संपेल असा समज होता. पण गांधी विचार मात्र सर्वत्र पसरत असल्याचे सांगून हिंसाचाराचा तेच आश्रय घेतात ज्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही. या हिंसाचारात तेच लोकं सहभागी आहेत असेही विद्रोही यांनी पत्रकातून म्हटले आहे. सर्व सेवा संघाने या घटनेचा विरोध, नागरिकता संशोधन, एन.आर.सी.आणि एन.पी.आर.चा विरोध करण्यासाठी बापूंच्या बलिदानदिनी सकाळपासून सायंकाळी ५.१७ वाजतापर्यंत उपवास करणार आहे. त्यानंतर सर्व धर्म प्रार्थनेने या सत्याग्रहाचा समारोप होणार आहे.

टॅग्स :hindiहिंदीuniversityविद्यापीठ