शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

१९ मार्च १९८६ : राज्यातील पहिल्या शेतकरी आत्महत्येला आज झाले ३९ वर्षे पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 11:08 IST

वर्धा जिल्ह्यात ४० आत्महत्या : दोन महिन्यांतील धगधगीत वास्तव

चैतन्य जोशी लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ३९ वर्षापूर्वी १९ मार्च १९८६ या दिवशी यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील चिलगव्हाणचे रहिवासी साहेबराव करपे या शेतकऱ्याने जगणे असह्य झाल्यामुळे संपूर्ण कुटुंबासह वर्धा जिल्ह्यातील दत्तपूर येथील कुष्ठधामात आत्महत्या केली होती. ही आत्महत्या राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून नोंद झाली होती. या घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेले होते. या घटनेला उद्या, बुधवारी १९ मार्चला ३९ वर्षे पूर्ण होत आहेत.

या घटनेनंतरही राज्यात शेतकरी आत्महत्यांची सुरू झालेली साखळी आजही सुरूच आहे. मागील दोन महिन्यांत वर्धा जिल्ह्यात ४० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे वास्तव आहे. तशी नोंदही प्रशासनाने घेतली आहे. शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर आहे.

सरकारे बदलली पण, शेतकऱ्यांचे हाल थांबले नाहीत. आता परिस्थिती आणखी बिकट बनली आहे. कालपर्यंत शेतकरी आत्महत्या करीत होते. नवीन आकडेवारीवरून आता शेतकऱ्यांची मुले फार मोठ्या संख्येने आत्महत्या करीत आहेत.

शेतकरी आत्महत्यांची कारणे काय?सातत्याने तोट्याच्या शेतीतून शेतकऱ्यांची होणारी आर्थिक कुचंबणा, हे आत्महत्येचे मुख्य कारण मानले जाते. शेतीला सिंचन, विजेचा अभाव, महागडे बियाणे, खते, कीटकनाशके, पेरणीच्या हंगामात पुरेशा कर्ज पुरवठ्याचा अभाव, सावकारी बेहिशेबी कर्जाचा पाश, नैसर्गिक आपत्ती, बाजारात होणारी लूट, कमी भाव ही शेती तोट्यात जाण्याची प्रमुख कारणे आहेत.

जिल्ह्यातील पाच वर्षांतील आकडेवारीवर्ष          आत्महत्या२०२०          १५२२०२१          १६१२०२२          १५४२०२३          १०९२०२४          ११०२०२५          ४०  (फेब्रुवारीपर्यंत)

अर्थव्यवस्थेला तारणारा का मरतो?

  • अर्थसंकल्पापूर्वी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल विधिमंडळात ठेवला. त्यात उद्योग तसेच सेवा या दोन महत्त्वाच्या क्षेत्रांत चालू आर्थिक वर्षात राज्याची पीछेहाट झाल्याचे म्हटले आहे.
  • मात्र, गेल्यावर्षी झालेल्या दमदार पावसाने कृषिक्षेत्राला तारत अर्थव्यवस्थेला आधार दिल्याचे म्हटले. हाच प्रकार कोरोना काळात होता.
  • सर्व बंद असताना शेती सुरू होती. अख्खे जग शेतीने जगवले. जगाला जगविणारा, अर्थव्यवस्थेला तारणारा शेतकरी का मरतो, याचा विचार आता प्राधान्याने करण्याची वेळ आली आहे.
टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याwardha-acवर्धा