शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

अनेक पथदिवे महिन्यांपासून बंदच

By admin | Updated: July 5, 2015 01:24 IST

रात्रीला वाहतूक सुरळीत राहावी तसेच शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडावी यासाठी मुख्य मार्गावर पथदिवे लावण्यात आली.

वर्धा : रात्रीला वाहतूक सुरळीत राहावी तसेच शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडावी यासाठी मुख्य मार्गावर पथदिवे लावण्यात आली. परंतु यातील अर्धेअधिक पथदिवे कित्येक दिवसांपासून बंदच आहे. परंतु तक्रार नसल्याने सदर पथदिव्यांच्या दुरुस्तीकडे नगर परिषदेद्वारे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे वास्तव समोर आले आहे. शिवाजी पुतळा ते बजाज चौक हा शहरातील मुख्य मार्ग आहे. या मार्गावर सहा ते सात लहान लहान चौक आहेत. त्यामुळे या मार्गावर सतत वर्दळ असते. रस्त्यावर वाहतूक सुरळीत व्हावी तसेच रात्रीलाही अडचण येऊ नये यासाठी या मार्गावर दुभाजक बसवून तेथे पथदिवे बसविण्यात आले. सदर पथदिव्यांमुळे रात्रीची वाहतूक सुरळीत होऊन रस्त्यांच्या सौंंदर्यीकरणातही भर पडली. सदर पथदिवे नियमितपणे सायंकाळी सुरू करणे तसेच सकाळी बंद करणे याबरोबरच त्यात काही बिघाड असल्यात तो दुरुस्त करणे पालिकेची जबाबदारी आहे. परंतु अनेक महिन्यांपासून या पथदिव्यांपैकी अर्धे अधिक पथदिवे हे कायम बंदच असतात. त्यामुळे काही चालू असलेल्या पथदिव्यांचाच नागरिकांना आधार असतो. तसेच सुरू असलेले पथदिवेही वारंवार बंद सुरू होत असतात. त्यामुळे शहराच्या सौंदर्यीकरणाचे तीनतेरा वाजले आहे. तसेच यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. अनेक दिवसांपासून सदर पथदिवे बंद असतानाही पालिकेकडून त्याची कोणतीही दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करतानाच आम्ही भरत असलेल्या कराचा उपयोग काय असा प्रश्न उपस्थित करतात.(शहर प्रतिनिधी) वर्धा : रात्रीला वाहतूक सुरळीत राहावी तसेच शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडावी यासाठी मुख्य मार्गावर पथदिवे लावण्यात आली. परंतु यातील अर्धेअधिक पथदिवे कित्येक दिवसांपासून बंदच आहे. परंतु तक्रार नसल्याने सदर पथदिव्यांच्या दुरुस्तीकडे नगर परिषदेद्वारे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे वास्तव समोर आले आहे. शिवाजी पुतळा ते बजाज चौक हा शहरातील मुख्य मार्ग आहे. या मार्गावर सहा ते सात लहान लहान चौक आहेत. त्यामुळे या मार्गावर सतत वर्दळ असते. रस्त्यावर वाहतूक सुरळीत व्हावी तसेच रात्रीलाही अडचण येऊ नये यासाठी या मार्गावर दुभाजक बसवून तेथे पथदिवे बसविण्यात आले. सदर पथदिव्यांमुळे रात्रीची वाहतूक सुरळीत होऊन रस्त्यांच्या सौंंदर्यीकरणातही भर पडली. सदर पथदिवे नियमितपणे सायंकाळी सुरू करणे तसेच सकाळी बंद करणे याबरोबरच त्यात काही बिघाड असल्यात तो दुरुस्त करणे पालिकेची जबाबदारी आहे. परंतु अनेक महिन्यांपासून या पथदिव्यांपैकी अर्धे अधिक पथदिवे हे कायम बंदच असतात. त्यामुळे काही चालू असलेल्या पथदिव्यांचाच नागरिकांना आधार असतो. तसेच सुरू असलेले पथदिवेही वारंवार बंद सुरू होत असतात. त्यामुळे शहराच्या सौंदर्यीकरणाचे तीनतेरा वाजले आहे. तसेच यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. अनेक दिवसांपासून सदर पथदिवे बंद असतानाही पालिकेकडून त्याची कोणतीही दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करतानाच आम्ही भरत असलेल्या कराचा उपयोग काय असा प्रश्न उपस्थित करतात.(शहर प्रतिनिधी)