शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

ग्रामीण भागातील अनेक रुग्णालयात सुविधाच नाही; डायलिसिस व्यवस्था करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 17:58 IST

Vardha : तालुका पातळीवर सुविधा उपलब्ध करा

लोकमत न्यूज नेटवर्क रोहणा: शहरासह ग्रामीण भागातही किडनीसंदर्भात आजारात मोठी वाढ झाली आहे. परिणामी, अनेकांना डायलिसिस करावे लागते. डायलिसिसची सुविधा केवळ जिल्हापातळीवर असल्याने रुग्णांसह नातेवाइकांची मोठी पायपीट होत आहे. त्यामुळे डायलिसिसची सुविधा तालुकास्थळी असलेल्या रुग्णालयात करण्यात यावी, अशी मागणी पीडित रुग्णांकडून करण्यात आली आहे.

शरीरातील अनावश्यक घटक लघवीद्वारे शरीराबाहेर काढण्याचे काम किडनी हे अवयव करते. मात्र, बदलते हवामान, चैनीच्या वस्तूंचा अधिक वापर, व्यसनाधीनता आणि फास्ट फूड खाण्याने अनेक रोगांची निर्मिती झाली आहे. यात किडनी खराब होण्याचे आजार अनेकांना जडले आहेत. किडनी निकामी झाल्याने या रुग्णांना आठवड्यातून दोनदा डायलिसिस करून कृत्रिमरीत्या शरीरातील अनावश्यक पदार्थ काढून टाकावे लागतात. वर्धा जिल्ह्यात डायलिसिसची व्यवस्था केवळ जिल्हास्थळी आहे. रुग्णाची हेडसाळ थाबण्यासाठी तालुका स्तरावर सुविधा करण्याची मागणी नागरिकाकडून होत आहे. 

रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णांना सहकार्यही नाही किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना वर्धा अथवा सावंगी येथे खासगी वाहनाने घेऊन जावे लागते. तर रोगाने जर्जर झालेल्या रुग्णांना रुग्णालयात भरती ठेवण्याचीदेखील सोय नाही. इतर रुग्णांना लागण अथवा इन्फेक्शन होईल, अशी कारणे देऊन रुग्णास घरी घेऊन जाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे रुग्ण व त्याच्या कुटुंबाचा नाइलाज होतो. यातच रुग्णांना वेळेवर डायलिसिससाठी हजर करण्यात हयगय होऊन विपरित घटना घडल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण परिसरातील रुग्णालयात सुविधा उपलब्ध करण्याची आवश्यकत आहे.

तालुका पातळीवर सुविधा उपलब्ध करा जिल्हास्तरावर रूग्णासाठी अनेक सुविधा आहेत. मात्र, ग्रामीण भागात आजही आरोग्याच्या सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील रूग्ण व त्याच्या नातेवाइकांची मोठी पायपीट होते. सोबचत आर्थिक नुकसान होत आहे. आर्थिक व होणारी पायपीट थाबण्यासाठी शासनाने तालुका पातळीवरील शासकीय दवाखान्यात ही सेवा सुरू करून द्यावी, अशी मागणी अनेक गरीब रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाइकांकडून करण्यात आली आहे.

अनियमिततेने ओढावला मृत्यू रोहना परिसरात सध्या अनिल सुपनर, वंदना बोंद्रे, प्रकाश हादवे, असे तीन किडनी आजाराचे रुग्ण आहेत. वनिता गलाट, सुरेश वाठोडे, प्रकाश शिबंदी, कुमार बुरघाटे, चंदू दाभेकर हे रुग्ण नुकतेच मृत झाले आहेत. यातील अनेक रुग्ण तरुण असून, कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती. अनेक रुग्णांना वरचेवर वर्धा येथे डायलिसिसला नेणे आर्थिकदृष्ट्या शक्य झाले नाही; परिणामी त्यांच्या डायलिसिसमध्ये नियमितता न राहिल्याने दगावल्याची वस्तुस्थिती आहे. यामुळे ही मागणी पुढे येत आहे.

५ रुग्ण डायलिसिसच्या सोयीअभावी मृत पावले तालुका पातळीवर डायलिसिची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे रोहाणा परिसरातील नागरिकांना वर्धा व अन्य ठिकाणी उपचार घेण्यासाठी जावे लागते. आशातच उपाचाराअभावी ५ रूग्णाचा मुत्यू झाला आहे.

"माझ्या किडनी निकामी झाल्या. त्यामुळे डायलिसिससाठी आठवड्यातून दोनदा सावंगी येथे जावे लागते. मी कुटुंबातील कमवता व्यक्ती होतो; पण मीच रुग्ण झाल्याने खासगी वाहनाने दवाखान्यात जाने जिकरीचे झाले आहे. त्यामुळे मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे."- प्रकाश हादवे, वाई, ता. आर्वी

टॅग्स :wardha-acवर्धा