शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

ग्रामीण भागातील अनेक रुग्णालयात सुविधाच नाही; डायलिसिस व्यवस्था करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 17:58 IST

Vardha : तालुका पातळीवर सुविधा उपलब्ध करा

लोकमत न्यूज नेटवर्क रोहणा: शहरासह ग्रामीण भागातही किडनीसंदर्भात आजारात मोठी वाढ झाली आहे. परिणामी, अनेकांना डायलिसिस करावे लागते. डायलिसिसची सुविधा केवळ जिल्हापातळीवर असल्याने रुग्णांसह नातेवाइकांची मोठी पायपीट होत आहे. त्यामुळे डायलिसिसची सुविधा तालुकास्थळी असलेल्या रुग्णालयात करण्यात यावी, अशी मागणी पीडित रुग्णांकडून करण्यात आली आहे.

शरीरातील अनावश्यक घटक लघवीद्वारे शरीराबाहेर काढण्याचे काम किडनी हे अवयव करते. मात्र, बदलते हवामान, चैनीच्या वस्तूंचा अधिक वापर, व्यसनाधीनता आणि फास्ट फूड खाण्याने अनेक रोगांची निर्मिती झाली आहे. यात किडनी खराब होण्याचे आजार अनेकांना जडले आहेत. किडनी निकामी झाल्याने या रुग्णांना आठवड्यातून दोनदा डायलिसिस करून कृत्रिमरीत्या शरीरातील अनावश्यक पदार्थ काढून टाकावे लागतात. वर्धा जिल्ह्यात डायलिसिसची व्यवस्था केवळ जिल्हास्थळी आहे. रुग्णाची हेडसाळ थाबण्यासाठी तालुका स्तरावर सुविधा करण्याची मागणी नागरिकाकडून होत आहे. 

रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णांना सहकार्यही नाही किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना वर्धा अथवा सावंगी येथे खासगी वाहनाने घेऊन जावे लागते. तर रोगाने जर्जर झालेल्या रुग्णांना रुग्णालयात भरती ठेवण्याचीदेखील सोय नाही. इतर रुग्णांना लागण अथवा इन्फेक्शन होईल, अशी कारणे देऊन रुग्णास घरी घेऊन जाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे रुग्ण व त्याच्या कुटुंबाचा नाइलाज होतो. यातच रुग्णांना वेळेवर डायलिसिससाठी हजर करण्यात हयगय होऊन विपरित घटना घडल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण परिसरातील रुग्णालयात सुविधा उपलब्ध करण्याची आवश्यकत आहे.

तालुका पातळीवर सुविधा उपलब्ध करा जिल्हास्तरावर रूग्णासाठी अनेक सुविधा आहेत. मात्र, ग्रामीण भागात आजही आरोग्याच्या सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील रूग्ण व त्याच्या नातेवाइकांची मोठी पायपीट होते. सोबचत आर्थिक नुकसान होत आहे. आर्थिक व होणारी पायपीट थाबण्यासाठी शासनाने तालुका पातळीवरील शासकीय दवाखान्यात ही सेवा सुरू करून द्यावी, अशी मागणी अनेक गरीब रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाइकांकडून करण्यात आली आहे.

अनियमिततेने ओढावला मृत्यू रोहना परिसरात सध्या अनिल सुपनर, वंदना बोंद्रे, प्रकाश हादवे, असे तीन किडनी आजाराचे रुग्ण आहेत. वनिता गलाट, सुरेश वाठोडे, प्रकाश शिबंदी, कुमार बुरघाटे, चंदू दाभेकर हे रुग्ण नुकतेच मृत झाले आहेत. यातील अनेक रुग्ण तरुण असून, कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती. अनेक रुग्णांना वरचेवर वर्धा येथे डायलिसिसला नेणे आर्थिकदृष्ट्या शक्य झाले नाही; परिणामी त्यांच्या डायलिसिसमध्ये नियमितता न राहिल्याने दगावल्याची वस्तुस्थिती आहे. यामुळे ही मागणी पुढे येत आहे.

५ रुग्ण डायलिसिसच्या सोयीअभावी मृत पावले तालुका पातळीवर डायलिसिची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे रोहाणा परिसरातील नागरिकांना वर्धा व अन्य ठिकाणी उपचार घेण्यासाठी जावे लागते. आशातच उपाचाराअभावी ५ रूग्णाचा मुत्यू झाला आहे.

"माझ्या किडनी निकामी झाल्या. त्यामुळे डायलिसिससाठी आठवड्यातून दोनदा सावंगी येथे जावे लागते. मी कुटुंबातील कमवता व्यक्ती होतो; पण मीच रुग्ण झाल्याने खासगी वाहनाने दवाखान्यात जाने जिकरीचे झाले आहे. त्यामुळे मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे."- प्रकाश हादवे, वाई, ता. आर्वी

टॅग्स :wardha-acवर्धा