शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: मतदानाआधीच ३ माजी मुख्यमंत्र्यांनी 'गेम' बदलला; इंडिया आघाडीला धक्का
2
गृहमंत्र्यांचा राजीनामा, २० जणांचा मृत्यू, सोशल मीडियावरील बंदी उठवली; नेपाळमध्ये काय काय घडले?
3
Shantanu Naidu : रतन टाटांचा तरुण सहकारी राहिलेल्या शंतनू नायडूने प्रेमाची कबुली दिली? तिच्यासोबतचे फोटो आले समोर
4
टायगर श्रॉफनं मुंबईमध्ये ₹१५.६० कोटींना विकलं लक्झरी अपार्टमेंट, पाहा डिटेल्स; कितीला खरेदी केलेली प्रॉपर्टी?
5
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
6
"मराठी सिनेसृष्टीने दोन कलाकार गमावले", प्रिया मराठेसोबत लावला फोटो, मरणाची बातमी पाहून मराठी अभिनेता संतापला
7
Post Office ची ही स्कीम करेल मालामाल; दर महिन्याला मिळेल ₹५,५०० चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
8
Asia Cup 2025, AFG vs HK Head to Head Record : 'चमत्कारी' संघासमोर ते चमत्कार दाखवतील का?
9
"आई शप्पथ गळा कापेन...", अली गोनीचा ट्रोलर्सला इशारा; 'त्या' व्हिडीओवरुन झालेला वाद
10
"तू बाहेर चल, तुझं तोंडच फोडतो…’’, ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत वादावादी, वित्तमंत्री आणि फायनान्स अधिकारी भिडले
11
शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २६१ अंकांनी वधारला; Nifty मध्येही तेजी, 'या' स्टॉक्समध्ये मोठी तेजी
12
लवकर भरा आयकर रिटर्न, अन्यथा...; कर विवरणपत्र दाखल करण्यासाठी फक्त आठवडाच शिल्लक
13
Asia Cup 2025: संजू सॅमसन पहिला सामना खेळणार की नाही? टीम इंडियाच्या सरावात चित्र स्पष्ट
14
मुंबईत दहशत माजवण्याचे षडयंत्र? अग्नीवीर जवानाला फसवून लोडेड 'इन्सास रायफल'ची चोरी!
15
Tariff: अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार
16
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
17
अमेरिकेतील दुकानात चोरी करताना पकडली गेली गुजराती महिला? चौकशीवेळी ढसाढसा रडू लागली, त्यानंतर...
18
चार मुलं जन्माला घाला आणि टॅक्स वाचवा; सरकारकडून १६,५६३ कोटी रुपये पॅकेजची घोषणा!
19
तेजस्वी यादव यांची सरकारवर १२ प्रश्नांची सरबत्ती; बेरोजगारीवर मागितली थेट उत्तरे
20
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक

पाणवठ्यांवरील नायलॉन जाळ्यांनी अनेक पक्षी झाले अपंग

By admin | Updated: March 7, 2017 01:17 IST

उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याच्या शोधात अनेक पक्षी पाणी असलेल्या पाणवठ्यांवर येत आहेत;

संकटग्रस्त स्थळांच्या यादीत वाढ : तलावांच्या लिलावात चिंतन गरजेचेवर्धा : उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याच्या शोधात अनेक पक्षी पाणी असलेल्या पाणवठ्यांवर येत आहेत; पण या पाणवठ्यांवर असलेल्या नायलॉन जाळ्यांमुळे त्यांचा जीव धोक्यात आला आहे. या जाळ्यांमुळे अनेक पक्षी अपंग झाल्याचे समोर आले आहे. या जाळ्यांमुळे पक्ष्यांच्या संकटात आणखी वाढ होत असल्याचे पक्षी अभ्यासक वैभव देशमुख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे. जिल्ह्यातील अनेक पाणवठ्यांवर असे दृश्य पाहायला मिळत आहे. या प्रकाराने अनेक पक्ष्यांचा जीव जात असून असंख्य पक्ष्यांना कायमचे अपंगत्व येत असल्याचे निरीक्षण देशमुख यांनी नोंदविले आहे. हजारो किलोमिटरचा प्रवास करून स्थलांतरीत आणि स्थानिक पक्षी यामुळे अपंग झाल्याचे दिसून आले आहे. एका लहानशा पाणथळ्यावर चार पक्ष्यांना पायाने अपंगत्व आल्याचे आढळून आले. पांढऱ्या मानेचा करकोचा, शेकाट्या व पांढऱ्या भुवईचा धोबी या तीन पक्ष्यांचा आकार अगदी वेगवेगळा असला तरी त्यांच्यात एक साम्य आढळून आले. ते म्हणजे तीनही पक्ष्यांच्या पायाला आलेले अपंगत्व! या पक्ष्यांचे बारकाईने निरीक्षण केले असता हे तीनही पक्षी प्रजाती उथळ पाण्यात अथवा पाण्याच्या काठावर खाद्याच्या शोधात असतात. नेमके पाण्याच्या काठावरच बारिक आणि पारदर्शक नायलॉनचे मासोळ्या पकडण्याचे जाळे मोठ्या प्रमाणात अस्ताव्यस्त फेकलेले असतात. भक्ष्याच्या शोधात मग्न पक्षी नकळत यात अडकतात. त्यातून मृत्यू वा अपंगत्व येत असल्याचे देशमुख यांचे म्हणणे आहे.जाळ्यात फसलेला पाय काढण्याचा जितका अधिक प्रयत्न पक्षी करतात, तितके त्यांचे पाय अधिक घट्ट आवळले जातात. यात पक्ष्यांच्या पायाची हाडे तुटतात. रक्ताभिसरण न झाल्याने संपूर्ण पाय निकामी होतात. शिवाय पांढऱ्या भुवईचा धोबी या चिमणीच्या आकाराच्या नुकतेच घरटे सोडून बाहेर पडलेल्या पक्ष्याच्या पायाला नायलॉनचा दोरा घट्ट आवळल्यामुळे गाठ तयार झालेली स्पष्टपणे दिसून येते, असे देशमुख यांनी म्हटले आहे.तलावांचा लिलाव करताना जैवविविधतेला कुठलाही धोका होणार नाही, यांबाबतची नियमावली व कडक निर्बंध घालण्यात यावे, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)