शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

गांधींचे काँग्रेस विसर्जनाचे स्वप्न साकार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 22:34 IST

महात्मा गांधी हे राष्ट्रपिता आहेत. त्यांनी काँग्रेस विसर्जित करा, असे सांगितले होते. त्यामुळे काँग्रेसचे विसर्जन करून गांधीजींची इच्छा पूर्ण करा, असे आवाहन राज्याचे वित्त नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. आर्वी विधानसभा क्षेत्रातील भारतीय पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : आर्वीत भाजप कार्यकर्ता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : महात्मा गांधी हे राष्ट्रपिता आहेत. त्यांनी काँग्रेस विसर्जित करा, असे सांगितले होते. त्यामुळे काँग्रेसचे विसर्जन करून गांधीजींची इच्छा पूर्ण करा, असे आवाहन राज्याचे वित्त नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. आर्वी विधानसभा क्षेत्रातील भारतीय पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.या मेळाव्याला खा. रामदास तडस, आमदार डॉ. अनिल सोले, माजी आमदार दादाराव केचे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे यांच्यासह मुख्यमंत्र्यांचे ओएसडी सुमित वानखडे, माजी खासदार विजय मुडे उपस्थित होते. या मेळाव्यात माजी आमदार दादाराव केचे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्कसपुर येथील काँग्रेसचे नेते ग्रामपंचायत सदस्य दिगांबर सोलव, अंतोरा येथील अरविंद केचे, गजानन चाफले, हेमराज डाहे, राजकुमार खरे, भालवाडी येथील उपसरपंच तथा युवा सेना प्रमुख सारंग भोसले, सुसुंन्द्रा येथील बिरसा मुंडा कमेटीचे दिलीप कुसराम, रवींद्र उईके, रंजित युवनाते, संजय युवनाते, सचिन कोक्कडे, आशिष नरपाचे, वनराज परतेती, गोवर्धन आत्राम, प्रमोद मसराम, कानेश्वर इरपाचे, तेजस कुसराम, भीमराव कुसराम, ज्ञानेश्वर कुंभरे यांनी भाजपात प्रवेश घेतला. या सर्वांचे ना. मुनगंटीवार यांनी पक्षात स्वागत केले. याप्रसंगी बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, विचार करा...डोळे बंद करा...देशाचे पंतप्रधान कोण होऊ शकेल... पवार साहेब खरेच पंतप्रधान होऊ शकतील... शरद पवार म्हटल्यावर १० सेकंदात गाढ झोप येईल...राहुल गांधी म्हटलं तर तुम्हालाच कसं तरी वाटेल आणि झोपू शकू की नाही असा प्रश्न पडेल. पण, मोदी पंतप्रधान होणार म्हटले तर नव चैतन्य निर्माण होईल.भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष राजेश बकाणे म्हणाले की, आर्वी विधानसभा क्षेत्राचा विकास झपाट्याने होत आहे. विकास हा चार विकास इंजिनामुळे होत आहे. यामध्ये पहिले आणि महत्वाचे इंजिन दादाराव केचे, दुसरे इंजिन सुधीर मुनगंटीवार, तिसरे इंजिन सुमित वानखेडे आणि चौथे इंजिन रामदास तडस हे आहेत. याप्रसंगी लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी सुमित वानखेडे यांचा सभापती शांता कसर यांच्या हस्ते शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. खासदार रामदास तडस यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना कधी नव्हे एवढा निधी वर्धा लोकसभा क्षेत्रात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विदर्भाचा अनुशेष भरून काढण्यासाठी कार्यरत आहेत. आपण सर्व अनुभवत आहोत. माजी आमदार दादाराव केचे यांनी सांगितले की, केंद्र व राज्यातील भारतीय जनता पक्षाचे सरकार समाजातील सर्व घटकांसाठी विविध योजना राबवित नागरीकांचे जीवनमान उंचावित आहे. भारतीय जनता पक्षाचे सरकार भ्रष्टाचार मुक्त भारत निर्माण करण्यासाठी कटीबद्ध आहे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारRamdas Tadasरामदास तडस