शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
4
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
5
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
6
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
7
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
8
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
9
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
10
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
11
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
12
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
13
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
14
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
15
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
16
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
17
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
18
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
19
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
20
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून योग्य उपाययोजना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 00:22 IST

आणेवारी काढतांना प्रशासनाने वस्तुनिष्ठ पाहणी करणे आवश्यक होती परंतु आणेवारी वस्तुनिष्ठ न काढल्यामुळे दुष्काळ जाहीर करतांना वर्धा जिल्हातील फक्त काही भागामध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे.

ठळक मुद्देरामदास तडस : मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन केली मागणी, कर्जमाफी व बोंडअळी अनुदानाबाबत चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आणेवारी काढतांना प्रशासनाने वस्तुनिष्ठ पाहणी करणे आवश्यक होती परंतु आणेवारी वस्तुनिष्ठ न काढल्यामुळे दुष्काळ जाहीर करतांना वर्धा जिल्हातील फक्त काही भागामध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे. करिता जिल्हातील दुष्काळी परीस्थिती पाहता संपुर्ण जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून केली आहे.राज्य शासनाने छत्रपतीशिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा निर्णय घेऊन कर्जदार शेतकऱ्यांच्या जीवनातील दु:खाचा भार हलका करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये वर्धा जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे. परंतु काही शेतकऱ्यांचे ग्रीन लिस्ट नाव आहे. परंतु अद्याप पर्यंत या शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही शेतकऱ्यांना त्वरित लाभ देण्याकरिता उपाययोजना करण्यात याव्या, मागील वर्षी बोंडअळी अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते. त्याबाबत शासनाने नुकसान भरपाई दिलेली असून शेवटचा हफ्ता सुद्धा प्राप्त झाला आहे. परंतु काही शेतकऱ्यांना यादीमध्ये नाव असूनसुद्धा अद्याप काही शेतकºयांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झालेली नाही. तसेच महाराष्ट्र शासनाच्यावतीने महाराष्ट्रातील १५१ तालुक्यामध्ये यापूर्वीच दुष्काळ घोषीत झालेला असून ६ नोव्हेंबर २०१८ च्या शासन निर्णयानुसार वर्धा जिल्हयातील समुद्रपूर, कारंजा व आष्टी या तालुक्या सोबतच आर्वी, वाठोडा, वाढोणा, खरांगणा, विरुळ, रोहणा, आंजी (मोठी), वायगांव (निपानी), झडसी, विजयगोपाल, भिडी, अंदोरी, अल्लीपूर महसुल मंडळामध्ये दुष्काळ घोषीत करुन या भागातील जनतेला दिलासा दिलेला आहे. परंतु कमी झालेल्या पर्जन्यमान, अत्यल्प व पावसाळी पाण्यामध्ये खंड झाल्याने संपुर्ण वर्धा जिल्हयातील इतरही महसुल मंडळामध्ये दुष्काळी परिस्थीती आहे.वर्धा जिल्हा आत्महत्याग्रस्त जिल्हयापैकी एक असून पाणी टंचाईमुळे परिस्थिती आणखीच बिकट होऊ शकते परिणामी सामान्य नागरिक व शेतकरी संकटात सापडलेला आहे. पाणी टंचाईमुळे पिण्याच्या पाण्याचे संकट उभे राहणार आहे याकरिता त्वरीत उपयोजना करण्याकरिता जिल्हा प्रशासनाला योग्य निर्देश द्यावे, अशी ही मागणी खासदार तडस यांनी केली आहे.यावेळी केंद्र सरकारच्या चमुकडून दुष्काळी भागाची पाहणी लवकरच होणार आहे, याविषयी राज्य सरकार आपल्या मागणीवर नक्कीच सकारात्मक विचार करेल व सकारत्मक निर्णय होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी खासदार तडस यांना दिल्याचे सांगण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदचे माजी शिक्षण सभापती मिलींद भेडे व पंकज तडस यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्री