शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
2
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
3
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
4
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
5
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
6
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
7
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
8
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
9
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
10
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
11
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
12
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
13
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
14
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
15
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
16
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
17
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
18
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
19
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
20
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून योग्य उपाययोजना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 00:22 IST

आणेवारी काढतांना प्रशासनाने वस्तुनिष्ठ पाहणी करणे आवश्यक होती परंतु आणेवारी वस्तुनिष्ठ न काढल्यामुळे दुष्काळ जाहीर करतांना वर्धा जिल्हातील फक्त काही भागामध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे.

ठळक मुद्देरामदास तडस : मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन केली मागणी, कर्जमाफी व बोंडअळी अनुदानाबाबत चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आणेवारी काढतांना प्रशासनाने वस्तुनिष्ठ पाहणी करणे आवश्यक होती परंतु आणेवारी वस्तुनिष्ठ न काढल्यामुळे दुष्काळ जाहीर करतांना वर्धा जिल्हातील फक्त काही भागामध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे. करिता जिल्हातील दुष्काळी परीस्थिती पाहता संपुर्ण जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून केली आहे.राज्य शासनाने छत्रपतीशिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा निर्णय घेऊन कर्जदार शेतकऱ्यांच्या जीवनातील दु:खाचा भार हलका करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये वर्धा जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे. परंतु काही शेतकऱ्यांचे ग्रीन लिस्ट नाव आहे. परंतु अद्याप पर्यंत या शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही शेतकऱ्यांना त्वरित लाभ देण्याकरिता उपाययोजना करण्यात याव्या, मागील वर्षी बोंडअळी अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालेले होते. त्याबाबत शासनाने नुकसान भरपाई दिलेली असून शेवटचा हफ्ता सुद्धा प्राप्त झाला आहे. परंतु काही शेतकऱ्यांना यादीमध्ये नाव असूनसुद्धा अद्याप काही शेतकºयांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झालेली नाही. तसेच महाराष्ट्र शासनाच्यावतीने महाराष्ट्रातील १५१ तालुक्यामध्ये यापूर्वीच दुष्काळ घोषीत झालेला असून ६ नोव्हेंबर २०१८ च्या शासन निर्णयानुसार वर्धा जिल्हयातील समुद्रपूर, कारंजा व आष्टी या तालुक्या सोबतच आर्वी, वाठोडा, वाढोणा, खरांगणा, विरुळ, रोहणा, आंजी (मोठी), वायगांव (निपानी), झडसी, विजयगोपाल, भिडी, अंदोरी, अल्लीपूर महसुल मंडळामध्ये दुष्काळ घोषीत करुन या भागातील जनतेला दिलासा दिलेला आहे. परंतु कमी झालेल्या पर्जन्यमान, अत्यल्प व पावसाळी पाण्यामध्ये खंड झाल्याने संपुर्ण वर्धा जिल्हयातील इतरही महसुल मंडळामध्ये दुष्काळी परिस्थीती आहे.वर्धा जिल्हा आत्महत्याग्रस्त जिल्हयापैकी एक असून पाणी टंचाईमुळे परिस्थिती आणखीच बिकट होऊ शकते परिणामी सामान्य नागरिक व शेतकरी संकटात सापडलेला आहे. पाणी टंचाईमुळे पिण्याच्या पाण्याचे संकट उभे राहणार आहे याकरिता त्वरीत उपयोजना करण्याकरिता जिल्हा प्रशासनाला योग्य निर्देश द्यावे, अशी ही मागणी खासदार तडस यांनी केली आहे.यावेळी केंद्र सरकारच्या चमुकडून दुष्काळी भागाची पाहणी लवकरच होणार आहे, याविषयी राज्य सरकार आपल्या मागणीवर नक्कीच सकारात्मक विचार करेल व सकारत्मक निर्णय होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी खासदार तडस यांना दिल्याचे सांगण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदचे माजी शिक्षण सभापती मिलींद भेडे व पंकज तडस यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्री