शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

‘डेंग्यू’ व ‘स्वाईन फ्लू’ आजारांबाबत जनजागृती करा

By admin | Updated: October 16, 2015 03:00 IST

सध्या डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू आजाराने मोठ्या प्रमाणात रुग्ण बाधित होत आहेत. डेंग्यू हा आजार एडिस इजिप्टाय या डासांपासून होतो. तो विषाणूमुळे होणारा आजार आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी : नवदुर्गा उत्सव मंडळांना फलक, बॅनर लावण्याच्या सूचनावर्धा : सध्या डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू आजाराने मोठ्या प्रमाणात रुग्ण बाधित होत आहेत. डेंग्यू हा आजार एडिस इजिप्टाय या डासांपासून होतो. तो विषाणूमुळे होणारा आजार आहे. डेंग्यू तापाच्या रुग्णाला उपचारास विलंब झाला तर मृत्यू ओढविण्याची शक्यता असते. यामुळे नागरिकांनी वेळीच उपचार घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व नवदुर्गा उत्सव मंडळांनी सामाजिक बांधिलकी म्हणून डेंग्यू व स्वाईन फ्ल्यू या आजारांची जनजागृती होईल, असे बॅनर, पोस्टर्स लावावे. हस्तपत्रिका छापून जनजागृती कराव्या, अशा सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी.जी. चव्हाण यांनी दिल्यात.जिल्ह्यात सध्या डेंग्यू व स्वाईन फ्लू आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे जरजागृती गरजेची झाली आहे. या आजाराची लक्षणे दिसताच नजीकच्या रुग्णालयात उपचार घेतले पाहिजे. डासांच्या अळ्या नष्ट करा, पाण्याची भांडी आठवड्यातून एकदा घासून कोरडी करा. पाण्याचे डबके साचू देऊ नका. मच्छरदाणीचा वापर करावा, डेंग्यू आजारावर प्रतिबंधात्मक उपाय हाच एकमेव पर्याय असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. स्वाईन फ्लू हा आजार एच.१, एन.१ या विषाणूमुळे होतो. याची लक्षणे ताप, घसादुखी वा घशाला खवखव होणे, नाक गळणे, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी, क्वचित प्रसंगी उलटी व जुलाब होणे आदी आहेत. लहान बालके, ६५ वर्षांवरील व्यक्ती, गरोदर महिला, हृदयविकार व मूत्रपिंडाचे आजार, मधुमेह, उच्चरक्तदाब आदी आजार असलेल्या व्यक्ती या आजारासाठी अतिजोखमीचे ठरतात. त्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. स्वाईन फ्ल्यूची लागण टाळण्यासाठी वारंवार साबणाने व स्वच्छ पाण्याने हात धुवावे. पौष्टीक व सकस आहार घ्यावा. गरम पाण्यात मीठ व हळद टाकून गुळण्या कराव्यात. भरपूर पाणी प्यावे, पुरेशी झोप व विश्रांती घ्यावी. शिंकताना वा खोकलताना नाका तोंडावर रूमाल धरावा. या आजारांपासून दूर राहण्यासाठी धुम्रपान करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, खोकला, सर्दी व ताप असताना गर्दीच्या ठिकाणी जाणे तसेच डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय औषध घेणे टाळावे, असे आवाहनही डॉ. चव्हाण यांनी केले आहे. नवरात्री उत्सवात लंगरकरिता उपयोगात आणलेले प्लास्टिक द्रोण, प्लेट नष्ट कराव्या व परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्यात.(कार्यालय प्रतिनिधी)