शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
3
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
6
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
7
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
8
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
9
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
10
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
11
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
12
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
13
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
14
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
15
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
16
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
17
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
18
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
19
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
20
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं

बोंडअळीचे पंचनामे १० दिवसात करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 10:04 PM

यंदाच्या खरीपात बी.टी. वाणावर बोंडअळीने आक्रमण केल्याने कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

ठळक मुद्देमोबाईल अ‍ॅपच्या सहाय्याने होणार पडताळणी

आॅनलाईन लोकमतआर्वी : यंदाच्या खरीपात बी.टी. वाणावर बोंडअळीने आक्रमण केल्याने कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर महसूल व वनविभागाचे उपसचिव सु.ह. उमराणीकर यांनी आदेश काढून दहा दिवसात या बोंडअळीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे.पंचनामे करण्याकरिता आवश्यक कालावधी कमी असल्याने फोटो जीपीएस मोबाईल अ‍ॅपच्या सहाय्याने काढण्याचे आदेशात नमूद केले आहे. या पद्धतीने पंचनामे होणार असल्याने यात किती नुकसानग्रस्त शेतकरी पात्र ठरतात हे महत्त्वाचे ठरणार आहे.कपाशीवरील बोंडअळीच्या हल्ल्याचा थेट परिणाम कपाशी उत्पादनावर झाला. यात झालेल्या नुकसानीची पडताळणी मोबाईल अ‍ॅपद्वारे करण्यात येणार असल्याने या संबंधीत विभागाच्या कर्मचाºयांना हा अ‍ॅप आधी त्यांच्या मोबाईलवर डाऊनलोड करावा लागणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांच्या नुकसानीची नोंद होणार आहे.यातही महसूल विभागाच्या सातबारात संबंधीत शेतकऱ्यांच्या कपाशी पिकाची नोंद सातबारात असणे गरजेचे असल्याचे आदेशात नमूद आहे. यात सातबारे ‘अपडेट’ नसतील तर त्या शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई मिळणार अथवा नाही असा प्रश्न आहे. पंचनाम्यात नुकसानीची टक्केवारी ३३ च्यावर असने आवश्यक आहे. यात आर्वी उपविभागात तीनही तालुके ३३ टक्क्यांच्या वर असल्याचे कृषी विभागाने नमूद केले आहे. अनेक शेतकऱ्यांनी कपाशीवर नांगर फिरविल्याने त्यांचा सर्व्हे होणार कसा होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.अनेकांनी फिरविले नांगरबोंडअळीच्या हल्ल्यामुळे त्रस्त झालेल्या अनेक शेतकºयांनी त्यांच्या शेतातील कपाशीवर नांगर चालविला आहे. यामुळे या शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात आल्यास त्यांना याचा फायदा होईल अथवा नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.