शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने अनुदान न दिल्याने महाबीजचे सोयाबीन महागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 05:01 IST

कृषी विभागाच्या नियोजनानुसार जिल्ह्यामध्ये मागील हंगामात १ लाख ७ हजार २२७ हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली होती. मात्र, यावर्षी यामध्ये वाढ झाली असून १ लाख ३९ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना माफक दरात सोयाबीनचे बियाणे उपलब्ध होणे अपेक्षित आहे. पण, गतवर्षी सोयाबीनला पावसाचा फटका बसल्याने आधीच सोयाबीनच्या बियाण्यांचा तुटवडा आहे.

ठळक मुद्देबियाण्याचे दीडपट वाढविले दर : शेतकऱ्यांच्या अडचणीत भर

अमोल सोटे।लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) (वर्धा) : यावर्षी कापसाला मिळणारा अत्यल्प भाव आणि विक्रीकरिता होत असलेला त्रास पाहून शेतकऱ्यांनी सोयाबीनचे क्षेत्र वाढविले आहे. अशातच शेतकऱ्यांच्या विश्वासाचे प्रतीक असलेल्या महाबीजने अनुदान न मिळाल्याचे कारण पुढे करीत सोयाबीन बियाण्याच्या दरात दीडपट वाढ केली आहे. याचाच फायदा घेत खासगी कंपनीनेही दर वाढविल्याने शेतकऱ्यांची चांगलीच अडचण झाली आहे.कृषी विभागाच्या नियोजनानुसार जिल्ह्यामध्ये मागील हंगामात १ लाख ७ हजार २२७ हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली होती. मात्र, यावर्षी यामध्ये वाढ झाली असून १ लाख ३९ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना माफक दरात सोयाबीनचे बियाणे उपलब्ध होणे अपेक्षित आहे. पण, गतवर्षी सोयाबीनला पावसाचा फटका बसल्याने आधीच सोयाबीनच्या बियाण्यांचा तुटवडा आहे. अशा परिस्थितीत प्रमाणिकरण व विश्वासार्हता असलेल्या महाबीजनेही सोयाबीन बियाण्यांच्या दरात भरमसाठ वाढ करून शेतकऱ्यांना अडचणीत टाकले आहे. मागीलवर्षी महाबीज सोयाबीनच्या ९३०५ या वाणाच्या बियाण्याची ३० किलोची बॅग १ हजार ४५० रुपयांची होती. यावर्षी त्यामध्ये ८९० रुपयांनी वाढ केली असून २ हजार ३४० रुपयांत घ्यावी लागत आहे. तर ९५६० या वाणाच्या बियाण्याची ४० किलोची बॅग मागीलवर्षी १ हजार ८५० रुपयांची होती. यावर्षी त्यामध्ये तब्बल १ हजार ४३० रुपयांची वाढ करण्यात आल्याने शेतकऱ्यांना ३ हजार २८० रुपयांत खरेदी करावी लागत आहे. महाबीजच्या बियाण्यांची किंमत वाढल्याचा फायदा घेत इतर खासगी कंपनीनेही बियाण्याचे दर वाढविल्याने यावर्षी सोयाबीन उत्पादकांची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.शेतकºयांचे कृषिमंत्र्यांना निवेदनवर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील गावातील शेतकरी अमरावती, नागपूर, यवतमाळ येथून बियाण्यांची खरेदी करतात. मात्र, लॉकडाऊन असल्यामुळे आता तालुक्यातूनच बियाणे खरेदी करावे लागणार आहे. त्यामुळे कृषी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी वाढणार आहे. बियाण्यांची दरवाढ म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार चालविला आहे. यावर्षी आष्टी तालुक्यात १२ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होण्याचा अंदाज असून शेतकरी कितीही भाववाढ झाली तरी पर्याय नसल्याने बियाणे खरेदी करणार आहे. त्यामुळे शासनाने महाबीजला तत्काळ अुनदान दिले तर शेतकऱ्यांना मोठा आधार मिळेल. त्यामुळे तत्काळ अनुुदान द्यावे, अशी मागणी शेतकरी डॉ. नरेंद्र देशमुख, रवींद्र जाणे यांनी कृषिमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.शासनाकडून महाबीजला अद्यापपर्यंत अनुदान मिळाले नाही. म्हणून पूर्ण दराने सोयाबीनचे बियाणे विकणे सुरू आहे. यावर्षी ३० किलोच्या बॅगवर ६ रुपये तर ४० किलोच्या बॅगवर १० रुपये प्रतिकिलो वाढ केली आहे. शासनाने अनुदान दिले नसल्यामुळेच हा प्रश्न बिकट झाला आहे.- अजय फुलझेले, जिल्हा व्यवस्थापक, महाबीज, वर्धा.

टॅग्स :agricultureशेती