शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

ठोकशाही रोखण्यासाठी महाविकास आघाडीची 'वज्रमूठ' - बाळू धानोरकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 14:12 IST

जिल्ह्यातून पाच हजार कार्यकर्ते जाणार

वर्धा : केंद्रात आणि राज्यातील सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले असून, हुकूमशाही व ठोकशाही पद्धती अवलंबली आहे. यातून सर्वसामान्यांची सोडवणूक करण्यासाठी महाविकास आघाडीने वज्रमूठ बांधली आहे. राज्यभरात सात सभांचे आयोजन करण्यात आले असून, येत्या दि. १६ एप्रिलला नागपुरात महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे. या सभेला वर्धा जिल्ह्यातील काँग्रेसचे पाच हजार पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे, अशी माहिती चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांनी दिली.

स्थानिक इंदिरा सद्भावना भवनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते, ते म्हणाले की, या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षाचे उपनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते अजित पवार, अंबादास दानवे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह नागपूर, चंद्रपूर, भंडारा, वर्धा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यातील आजी-माजी खासदार, आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे.

औरंगाबाद येथून वज्रमूठ सभेची सुरुवात झाली असून, मुंबईमध्ये शेवट होणार आहे. या दोन्ही सभेची जबाबदारी शिवसेनेने घेतली आहे. पुणे व नाशिक येथील जबाबदारी राष्ट्रवादीने तर नागपूर, कोल्हापूर आणि अमरावती येथील जबाबदारी काँग्रेसकडे आहे. महाविकास आघाडीतील सर्वच मित्रपक्ष कामाला लागले असून, प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसचे १ हजार २०० कार्यकर्ते या सभेला उपस्थित होणार आहे, असेही खासदार धानोरकर यांनी सांगितले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर, डॉ. शिरीष गोडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

मोठेपणा दाखवून पक्षाकरिता काम करावे..

घर म्हटलं की भाड्याला भांडे लागतातच. हा तर पक्ष आहे, यामध्ये मतभेद व विचारभेद असणारच. त्यामुळे उणेदुणे काढण्यापेक्षा मनाचा मोठेपणा दाखवून पक्षाकरिता काम करावे. या मतभेदामुळे काँग्रेसपुढे ही वेळ आली आहे. आता तरी दिवस पालटविण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे, असे आवाहनही खासदार धानोरकर यांनी केले.

टॅग्स :Politicsराजकारणwardha-acवर्धाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी