शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

ठोकशाही रोखण्यासाठी महाविकास आघाडीची 'वज्रमूठ' - बाळू धानोरकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 14:12 IST

जिल्ह्यातून पाच हजार कार्यकर्ते जाणार

वर्धा : केंद्रात आणि राज्यातील सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले असून, हुकूमशाही व ठोकशाही पद्धती अवलंबली आहे. यातून सर्वसामान्यांची सोडवणूक करण्यासाठी महाविकास आघाडीने वज्रमूठ बांधली आहे. राज्यभरात सात सभांचे आयोजन करण्यात आले असून, येत्या दि. १६ एप्रिलला नागपुरात महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे. या सभेला वर्धा जिल्ह्यातील काँग्रेसचे पाच हजार पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे, अशी माहिती चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांनी दिली.

स्थानिक इंदिरा सद्भावना भवनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते, ते म्हणाले की, या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षाचे उपनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते अजित पवार, अंबादास दानवे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह नागपूर, चंद्रपूर, भंडारा, वर्धा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यातील आजी-माजी खासदार, आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे.

औरंगाबाद येथून वज्रमूठ सभेची सुरुवात झाली असून, मुंबईमध्ये शेवट होणार आहे. या दोन्ही सभेची जबाबदारी शिवसेनेने घेतली आहे. पुणे व नाशिक येथील जबाबदारी राष्ट्रवादीने तर नागपूर, कोल्हापूर आणि अमरावती येथील जबाबदारी काँग्रेसकडे आहे. महाविकास आघाडीतील सर्वच मित्रपक्ष कामाला लागले असून, प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसचे १ हजार २०० कार्यकर्ते या सभेला उपस्थित होणार आहे, असेही खासदार धानोरकर यांनी सांगितले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर, डॉ. शिरीष गोडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

मोठेपणा दाखवून पक्षाकरिता काम करावे..

घर म्हटलं की भाड्याला भांडे लागतातच. हा तर पक्ष आहे, यामध्ये मतभेद व विचारभेद असणारच. त्यामुळे उणेदुणे काढण्यापेक्षा मनाचा मोठेपणा दाखवून पक्षाकरिता काम करावे. या मतभेदामुळे काँग्रेसपुढे ही वेळ आली आहे. आता तरी दिवस पालटविण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे, असे आवाहनही खासदार धानोरकर यांनी केले.

टॅग्स :Politicsराजकारणwardha-acवर्धाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी