शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

ठोकशाही रोखण्यासाठी महाविकास आघाडीची 'वज्रमूठ' - बाळू धानोरकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 14:12 IST

जिल्ह्यातून पाच हजार कार्यकर्ते जाणार

वर्धा : केंद्रात आणि राज्यातील सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडले असून, हुकूमशाही व ठोकशाही पद्धती अवलंबली आहे. यातून सर्वसामान्यांची सोडवणूक करण्यासाठी महाविकास आघाडीने वज्रमूठ बांधली आहे. राज्यभरात सात सभांचे आयोजन करण्यात आले असून, येत्या दि. १६ एप्रिलला नागपुरात महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे. या सभेला वर्धा जिल्ह्यातील काँग्रेसचे पाच हजार पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे, अशी माहिती चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांनी दिली.

स्थानिक इंदिरा सद्भावना भवनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते, ते म्हणाले की, या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षाचे उपनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते अजित पवार, अंबादास दानवे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह नागपूर, चंद्रपूर, भंडारा, वर्धा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यातील आजी-माजी खासदार, आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे.

औरंगाबाद येथून वज्रमूठ सभेची सुरुवात झाली असून, मुंबईमध्ये शेवट होणार आहे. या दोन्ही सभेची जबाबदारी शिवसेनेने घेतली आहे. पुणे व नाशिक येथील जबाबदारी राष्ट्रवादीने तर नागपूर, कोल्हापूर आणि अमरावती येथील जबाबदारी काँग्रेसकडे आहे. महाविकास आघाडीतील सर्वच मित्रपक्ष कामाला लागले असून, प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसचे १ हजार २०० कार्यकर्ते या सभेला उपस्थित होणार आहे, असेही खासदार धानोरकर यांनी सांगितले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर, डॉ. शिरीष गोडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

मोठेपणा दाखवून पक्षाकरिता काम करावे..

घर म्हटलं की भाड्याला भांडे लागतातच. हा तर पक्ष आहे, यामध्ये मतभेद व विचारभेद असणारच. त्यामुळे उणेदुणे काढण्यापेक्षा मनाचा मोठेपणा दाखवून पक्षाकरिता काम करावे. या मतभेदामुळे काँग्रेसपुढे ही वेळ आली आहे. आता तरी दिवस पालटविण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे, असे आवाहनही खासदार धानोरकर यांनी केले.

टॅग्स :Politicsराजकारणwardha-acवर्धाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी