शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

बोरव्याघ्र प्रकल्पात मध्यप्रदेशातील २२ मजुरांवर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 05:00 IST

बोर व्याघ्र प्रकल्पात दोन कंत्राटदारांच्या माध्यमातून २२ मजुरांना कामासाठी आणण्यात आले होते. सुरक्षा भींत बांधण्यासाठी शिवणी जिल्ह्यातून आलेले सात मजूर मागील एक महिन्यांपासून काम करीत आहे. तर दुसºया कंत्राटदाराने बालाघाट जिल्ह्यातून १५ मजूर बंधाºयाच्या कामासाठी दोन महिन्यापासून आणले होते.

ठळक मुद्देकंत्राटदार, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : प्रशासनाने दखल घेण्याची गरज, पैसे संपल्याने मजुरांवर आली उपासमारीची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कबोरधरण : येथील बोरव्याघ्र प्रकल्पातील सुरक्षाभींतीच्या आणि बंधाºयाच्या कामावर कंत्राटदाराच्या माध्यमातून मध्यप्रदेशातून आलेल्या २२ मजुरांवर उपासमारीची वेळ आली असून त्यांच्याकडे पैसे नसल्याने आर्थिक संकट ओढावले आहे. प्रशासनाने याची दखल घेण्याची मागणी मजुरांकडून करण्यात येत आहे.बोर व्याघ्र प्रकल्पात दोन कंत्राटदारांच्या माध्यमातून २२ मजुरांना कामासाठी आणण्यात आले होते. सुरक्षा भींत बांधण्यासाठी शिवणी जिल्ह्यातून आलेले सात मजूर मागील एक महिन्यांपासून काम करीत आहे. तर दुसºया कंत्राटदाराने बालाघाट जिल्ह्यातून १५ मजूर बंधाºयाच्या कामासाठी दोन महिन्यापासून आणले होते.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू झाल्याने सदर कामे थांबविण्यात आली. दोन्ही कंत्राटदार कामे बंद होताच पसार झाले. पण, त्या २२ मजुरांजवळ पैसे नसल्याने त्यांची उपासमार होत आहे. बोरीचे सरपंच विशाल भांगे यांनी बोरव्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी नीलेश गावंडे यांच्याशी चर्चा करून सेलूचे तहसीलदार महेंद्र सोनोने यांना माहिती देण्यात आली. पण, त्यांच्याकडूनही मजुरांच्या आर्थिक संकटाबाबतची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे सरपंच विशाल भांगे, पोलीस पाटील, विकास कोकाटे, गोविंदा पेटकर यांनी पैसे गोळा करून स्व:खर्चाने त्यासर्व मजुरांना धान्यसाठा देण्याचे ठरविले आहे. तसेच त्यांच्या दोन दिवसांच्या जेवणाची व्यवस्था देखील त्यांनी केली आहे. पण, दोन दिवसानंतर त्या मजुरांचे काय होणार, त्यांना जेवण मिळेल की नाही, याकडे प्रशासन लक्ष देतील का, त्यांच्या निवासाची व्यवस्था करतील का, असा प्रश्न गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.साहेब आम्हाला मदत मिळेल का हो...‘लॉकडाउन‘ : अडकलेल्या १४ मजुरांचा प्रशासनाकडे टाहोसेवाग्राम : सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या कामावरील बिहार आणि उडिसा येथील १४ व्यक्ती अडकून असल्याने त्यांना कोणतीही मदत अद्यापपर्यंत मिळाली नसल्याने आम्हला मदत मिळेल का, अशी आर्त हाक त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.लॉकडाऊन असल्याने जेथे आहे तिथेच थांबा, असा इशारा प्रशासनाने कामगारांसह नोकरदारांना दिला आहे. यात मात्र, परप्रांतीय मजुरांचा समावेश असल्याने आणि काम बंद असल्याने त्यांना गावी कसे जावे, याबाबत मोठी अडचण निर्माण झाली आहे. सेवाग्राम आश्रमापुढे सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत कामावर असलेले ११ बिहार आणि तीन उडिसा येथील मजूर अडकले आहे. कंत्राटदार देखील त्यांच्या मदतीला आला नसल्याने त्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. गावाला जाण्याची ओढ त्यांना सतावित असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.सध्यातरी त्यासर्व मजुरांना कुठेही जाता येणार नाही. आहे त्याच ठिकाणी त्यांना राहावे लागेल. अडचण असल्यास त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था करता येईल.- कांचन पांडे, पोलीस निरीक्षक सेवाग्राम.सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत सुरु असलेल्या कामावर आम्ही आलो होतो. पण, आता गावी जाण्यासाठी पैसे नाही आणि आम्ही येथेच अडकल्याने मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहे. गावी जाण्यासाठी आमची व्यवस्था करून द्यावी.- रामप्रतापराय, बेगुलसराय बिहार.

टॅग्स :Bor Tiger Projectबोर व्याघ्र प्रकल्पCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस