शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
3
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
4
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
5
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
6
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
7
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
8
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
9
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
10
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
11
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
12
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
13
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
14
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
15
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
16
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
17
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
18
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
19
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
20
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
Daily Top 2Weekly Top 5

बोरव्याघ्र प्रकल्पात मध्यप्रदेशातील २२ मजुरांवर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 05:00 IST

बोर व्याघ्र प्रकल्पात दोन कंत्राटदारांच्या माध्यमातून २२ मजुरांना कामासाठी आणण्यात आले होते. सुरक्षा भींत बांधण्यासाठी शिवणी जिल्ह्यातून आलेले सात मजूर मागील एक महिन्यांपासून काम करीत आहे. तर दुसºया कंत्राटदाराने बालाघाट जिल्ह्यातून १५ मजूर बंधाºयाच्या कामासाठी दोन महिन्यापासून आणले होते.

ठळक मुद्देकंत्राटदार, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : प्रशासनाने दखल घेण्याची गरज, पैसे संपल्याने मजुरांवर आली उपासमारीची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्कबोरधरण : येथील बोरव्याघ्र प्रकल्पातील सुरक्षाभींतीच्या आणि बंधाºयाच्या कामावर कंत्राटदाराच्या माध्यमातून मध्यप्रदेशातून आलेल्या २२ मजुरांवर उपासमारीची वेळ आली असून त्यांच्याकडे पैसे नसल्याने आर्थिक संकट ओढावले आहे. प्रशासनाने याची दखल घेण्याची मागणी मजुरांकडून करण्यात येत आहे.बोर व्याघ्र प्रकल्पात दोन कंत्राटदारांच्या माध्यमातून २२ मजुरांना कामासाठी आणण्यात आले होते. सुरक्षा भींत बांधण्यासाठी शिवणी जिल्ह्यातून आलेले सात मजूर मागील एक महिन्यांपासून काम करीत आहे. तर दुसºया कंत्राटदाराने बालाघाट जिल्ह्यातून १५ मजूर बंधाºयाच्या कामासाठी दोन महिन्यापासून आणले होते.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू झाल्याने सदर कामे थांबविण्यात आली. दोन्ही कंत्राटदार कामे बंद होताच पसार झाले. पण, त्या २२ मजुरांजवळ पैसे नसल्याने त्यांची उपासमार होत आहे. बोरीचे सरपंच विशाल भांगे यांनी बोरव्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी नीलेश गावंडे यांच्याशी चर्चा करून सेलूचे तहसीलदार महेंद्र सोनोने यांना माहिती देण्यात आली. पण, त्यांच्याकडूनही मजुरांच्या आर्थिक संकटाबाबतची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे सरपंच विशाल भांगे, पोलीस पाटील, विकास कोकाटे, गोविंदा पेटकर यांनी पैसे गोळा करून स्व:खर्चाने त्यासर्व मजुरांना धान्यसाठा देण्याचे ठरविले आहे. तसेच त्यांच्या दोन दिवसांच्या जेवणाची व्यवस्था देखील त्यांनी केली आहे. पण, दोन दिवसानंतर त्या मजुरांचे काय होणार, त्यांना जेवण मिळेल की नाही, याकडे प्रशासन लक्ष देतील का, त्यांच्या निवासाची व्यवस्था करतील का, असा प्रश्न गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.साहेब आम्हाला मदत मिळेल का हो...‘लॉकडाउन‘ : अडकलेल्या १४ मजुरांचा प्रशासनाकडे टाहोसेवाग्राम : सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या कामावरील बिहार आणि उडिसा येथील १४ व्यक्ती अडकून असल्याने त्यांना कोणतीही मदत अद्यापपर्यंत मिळाली नसल्याने आम्हला मदत मिळेल का, अशी आर्त हाक त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.लॉकडाऊन असल्याने जेथे आहे तिथेच थांबा, असा इशारा प्रशासनाने कामगारांसह नोकरदारांना दिला आहे. यात मात्र, परप्रांतीय मजुरांचा समावेश असल्याने आणि काम बंद असल्याने त्यांना गावी कसे जावे, याबाबत मोठी अडचण निर्माण झाली आहे. सेवाग्राम आश्रमापुढे सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत कामावर असलेले ११ बिहार आणि तीन उडिसा येथील मजूर अडकले आहे. कंत्राटदार देखील त्यांच्या मदतीला आला नसल्याने त्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. गावाला जाण्याची ओढ त्यांना सतावित असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.सध्यातरी त्यासर्व मजुरांना कुठेही जाता येणार नाही. आहे त्याच ठिकाणी त्यांना राहावे लागेल. अडचण असल्यास त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था करता येईल.- कांचन पांडे, पोलीस निरीक्षक सेवाग्राम.सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत सुरु असलेल्या कामावर आम्ही आलो होतो. पण, आता गावी जाण्यासाठी पैसे नाही आणि आम्ही येथेच अडकल्याने मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहे. गावी जाण्यासाठी आमची व्यवस्था करून द्यावी.- रामप्रतापराय, बेगुलसराय बिहार.

टॅग्स :Bor Tiger Projectबोर व्याघ्र प्रकल्पCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस