शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

निम्न वर्धा प्रकल्प शासनास मिळून देणार प्रत्येक वर्षी 2400 लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 05:00 IST

निम्न वर्धा प्रकल्पाचे बांधकाम २०१० मध्ये पूर्ण झाले. पण त्यावरील कालव्याचे काम व आर्वी उपसा सिंचन योजना ही पूर्णत्वास गेलेले नाही. सध्या ही दोन्ही कामे युद्धपातळीवर पूर्ण केली जात आहे. या प्रकल्पाची संपूर्ण कामे पूर्ण झाल्यावर याचा सर्वाधिक लाभ शेतकऱ्यांना तसेच जिल्ह्यातील उद्योगांना होणार आहे. असे असले तरी या जलाशयातील ५५.७३७ दलघमी पाणी बिगर सिंचनाासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

ठळक मुद्देशुभवार्ता : आर्वी तालुक्यातील जलाशय ठरतोय शेतकरी अन् उद्योगांसाठी उपयुक्त

n  महेश सायखेडे    लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आर्वी तालुक्यातील धनोडी येथील निम्न वर्धा प्रकल्प सध्या शेतकऱ्यांसह जिल्ह्यातील उद्योगांसाठी उपयुक्त ठरत आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यावर हा प्रकल्प शासनाला प्रत्येक वर्षी तब्बल २,४०० लाखांचा महसूल मिळून देणार आहे. इतका मोठा महसूल मिळून देणारा हा जिल्ह्यातील एकमेव जलाशय राहणार असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.निम्न वर्धा प्रकल्पाचे बांधकाम २०१० मध्ये पूर्ण झाले. पण त्यावरील कालव्याचे काम व आर्वी उपसा सिंचन योजना ही पूर्णत्वास गेलेले नाही. सध्या ही दोन्ही कामे युद्धपातळीवर पूर्ण केली जात आहे. या प्रकल्पाची संपूर्ण कामे पूर्ण झाल्यावर याचा सर्वाधिक लाभ शेतकऱ्यांना तसेच जिल्ह्यातील उद्योगांना होणार आहे. असे असले तरी या जलाशयातील ५५.७३७ दलघमी पाणी बिगर सिंचनाासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

हवालदिल शेतकरीही आता सुखावणारया प्रकल्पाच्या पाण्यापासून एकूण ६३,३३३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून जून २०२० पर्यंत एकूण ४५,००० हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. जून २०२१ पर्यंत ९५ टक्के सिंचन क्षमता प्रत्येक्षात शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे.  विशेष म्हणजे त्यापासून शासनाला सुमारे ४०० लाखांचा महसूल मिळणार आहे. एकूणच निम्न वर्धा हा प्रकल्प वर्धेकरांसाठी ‘ड्रिम प्रोजेक्ट’ असून सिंचन व बिगर सिंचन मिळून या प्रकल्पाच्या माध्यमातून शासनाला प्रत्येक वर्षी २,४०० लाखांचे उत्पन्न मिळणार आहे.दरवर्षी मिळतोय १०० लाखांचा महसूलया तिन्ही प्रकल्पाची एकूण जल साठवण क्षमता २४१.२९७ दलघमी असून त्यापैकी ५५.७३७ दलघमी पाणी बिगर सिचंनाकरिता (घरगुती व औद्योगिक) वापराकरिता आरक्षित आहे. यातुन आजमितीस दरवर्षी सरासरी १०० लाख रुपयांचे उत्पन्न शासनाला मिळत आहे. औद्यागिक वापर पूर्ण सुरू झाल्यास प्रत्येक वर्षी दोन हजार लाखांचा महसूल शासनाला मिळणार आहे.जल साठवण क्षमता २४१.२९७ दलघमीनिम्न वर्धा धरण, पुलगाव बॅरेज व खर्डा बॅरेज या तिन्ही प्रकल्पांची एकूण पाणी साठवण क्षमता २४१.२९७ दलघमी असल्याचे सांगण्यात आले.प्रकल्पाचे तीन टप्पेनिम्न वर्धा प्रकल्पाचे महत्त्वाचे तीन टप्पे आहेत. यात पहिला निम्न वर्धा धरण, दुसरा पुलगाव बॅरेज तर तिसरा खर्डा बॅरेज आहे.

गावांचे झाले पुनर्वसनआर्वी तालुक्यातील धनोडी येथील निम्न वर्धा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या गावांचे पूनर्वसन २०१९ मध्ये पूर्ण झाले आहे. शिवाय यंदाच्या वर्षी हा जलाशय १०० टक्के भरला आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठीही शेतकऱ्यांना दिले जाणार असून त्याबाबतचे नियोजन सध्या केले जात आहे.

२९८५.४४ कोटींचा झाला खर्चया प्रकल्पाची प्रलंबीत असलेली विविध कामे सध्या युद्धपातळीवर पूर्ण केली जात आहे. असे असले तरी आतापर्यंत या प्रकल्पासाठी तब्बल २९८५.४४ कोटींचा निधी खर्च करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प