शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

निम्न वर्धा प्रकल्प शासनास मिळून देणार प्रत्येक वर्षी 2400 लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 05:00 IST

निम्न वर्धा प्रकल्पाचे बांधकाम २०१० मध्ये पूर्ण झाले. पण त्यावरील कालव्याचे काम व आर्वी उपसा सिंचन योजना ही पूर्णत्वास गेलेले नाही. सध्या ही दोन्ही कामे युद्धपातळीवर पूर्ण केली जात आहे. या प्रकल्पाची संपूर्ण कामे पूर्ण झाल्यावर याचा सर्वाधिक लाभ शेतकऱ्यांना तसेच जिल्ह्यातील उद्योगांना होणार आहे. असे असले तरी या जलाशयातील ५५.७३७ दलघमी पाणी बिगर सिंचनाासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

ठळक मुद्देशुभवार्ता : आर्वी तालुक्यातील जलाशय ठरतोय शेतकरी अन् उद्योगांसाठी उपयुक्त

n  महेश सायखेडे    लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आर्वी तालुक्यातील धनोडी येथील निम्न वर्धा प्रकल्प सध्या शेतकऱ्यांसह जिल्ह्यातील उद्योगांसाठी उपयुक्त ठरत आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यावर हा प्रकल्प शासनाला प्रत्येक वर्षी तब्बल २,४०० लाखांचा महसूल मिळून देणार आहे. इतका मोठा महसूल मिळून देणारा हा जिल्ह्यातील एकमेव जलाशय राहणार असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.निम्न वर्धा प्रकल्पाचे बांधकाम २०१० मध्ये पूर्ण झाले. पण त्यावरील कालव्याचे काम व आर्वी उपसा सिंचन योजना ही पूर्णत्वास गेलेले नाही. सध्या ही दोन्ही कामे युद्धपातळीवर पूर्ण केली जात आहे. या प्रकल्पाची संपूर्ण कामे पूर्ण झाल्यावर याचा सर्वाधिक लाभ शेतकऱ्यांना तसेच जिल्ह्यातील उद्योगांना होणार आहे. असे असले तरी या जलाशयातील ५५.७३७ दलघमी पाणी बिगर सिंचनाासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

हवालदिल शेतकरीही आता सुखावणारया प्रकल्पाच्या पाण्यापासून एकूण ६३,३३३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून जून २०२० पर्यंत एकूण ४५,००० हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. जून २०२१ पर्यंत ९५ टक्के सिंचन क्षमता प्रत्येक्षात शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे.  विशेष म्हणजे त्यापासून शासनाला सुमारे ४०० लाखांचा महसूल मिळणार आहे. एकूणच निम्न वर्धा हा प्रकल्प वर्धेकरांसाठी ‘ड्रिम प्रोजेक्ट’ असून सिंचन व बिगर सिंचन मिळून या प्रकल्पाच्या माध्यमातून शासनाला प्रत्येक वर्षी २,४०० लाखांचे उत्पन्न मिळणार आहे.दरवर्षी मिळतोय १०० लाखांचा महसूलया तिन्ही प्रकल्पाची एकूण जल साठवण क्षमता २४१.२९७ दलघमी असून त्यापैकी ५५.७३७ दलघमी पाणी बिगर सिचंनाकरिता (घरगुती व औद्योगिक) वापराकरिता आरक्षित आहे. यातुन आजमितीस दरवर्षी सरासरी १०० लाख रुपयांचे उत्पन्न शासनाला मिळत आहे. औद्यागिक वापर पूर्ण सुरू झाल्यास प्रत्येक वर्षी दोन हजार लाखांचा महसूल शासनाला मिळणार आहे.जल साठवण क्षमता २४१.२९७ दलघमीनिम्न वर्धा धरण, पुलगाव बॅरेज व खर्डा बॅरेज या तिन्ही प्रकल्पांची एकूण पाणी साठवण क्षमता २४१.२९७ दलघमी असल्याचे सांगण्यात आले.प्रकल्पाचे तीन टप्पेनिम्न वर्धा प्रकल्पाचे महत्त्वाचे तीन टप्पे आहेत. यात पहिला निम्न वर्धा धरण, दुसरा पुलगाव बॅरेज तर तिसरा खर्डा बॅरेज आहे.

गावांचे झाले पुनर्वसनआर्वी तालुक्यातील धनोडी येथील निम्न वर्धा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या गावांचे पूनर्वसन २०१९ मध्ये पूर्ण झाले आहे. शिवाय यंदाच्या वर्षी हा जलाशय १०० टक्के भरला आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठीही शेतकऱ्यांना दिले जाणार असून त्याबाबतचे नियोजन सध्या केले जात आहे.

२९८५.४४ कोटींचा झाला खर्चया प्रकल्पाची प्रलंबीत असलेली विविध कामे सध्या युद्धपातळीवर पूर्ण केली जात आहे. असे असले तरी आतापर्यंत या प्रकल्पासाठी तब्बल २९८५.४४ कोटींचा निधी खर्च करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प