शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

निम्न वर्धा, बोर अन् लाल नालाचे दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 05:00 IST

समुद्रपूर तालुक्याती लाल नाला प्रकल्प १०० टक्के भरला असून, तालुक्यात उसंत घेत पाऊस सुरू आहे. त्यामुळे या जलाशयात येणारा पाण्याचा ओढा लक्षात घेत तसेच धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने या प्रकल्पाचे पाच दरवाजे १० सेंमीने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकल्पातून नदीपात्रात ३२.०२ क्युमेक पाण्याचा विसर्ग होत असून नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील २४ तासांत जिल्ह्यात १४९.५१ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली असून सततच्या पावसामुळे जलाशयांमधील पाणीपातळीत वाढ झाल्याने आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा, सेलू तालुक्यातील बोर धरण तसेच समुद्रपूर तालुक्यातील लाल नाला प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. तीन जलाशयातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मागील २४ तासांत वर्धा तालुक्यात २६.६२ मिमी, सेलू तालुक्यात २८.०० मिमी, देवळी तालुक्यात १६.६०, हिंगणघाट तालुक्यात २२.०० मिमी, समुद्रपूर तालुक्यात ३८.७४ मिमी, आर्वी तालुक्यात १४.१० मिमी तर कारंजा (घा.) तालुक्यात ३.४५ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत ७३६५.७० मिमी पाऊस पडतो, तर यंदाच्या वर्षी आतापर्यंत जिल्ह्यात ७१२८.६७ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे.

समुद्रपूर तालुक्यातील लाल नाला प्रकल्पाच्या पाच दरवाजातून ३२.०२ क्युमेक पाण्याचा विसर्ग- समुद्रपूर तालुक्याती लाल नाला प्रकल्प १०० टक्के भरला असून, तालुक्यात उसंत घेत पाऊस सुरू आहे. त्यामुळे या जलाशयात येणारा पाण्याचा ओढा लक्षात घेत तसेच धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने या प्रकल्पाचे पाच दरवाजे १० सेंमीने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकल्पातून नदीपात्रात ३२.०२ क्युमेक पाण्याचा विसर्ग होत असून नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सावधान : वणा नदी पात्रात होतोय पाण्याचा विसर्ग- हिंगणघाट : तालुक्यातील वडगाव या प्रकल्पाचे तीन तर नांद प्रकल्पाचे सात दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे वणा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असून नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांमधील नागरिकांनी दक्ष राहण्याच्या सूचना कार्यकारी अभियंता राजेश ढुमणे यांनी दिल्या आहेत. मंगळवारी सकाळी वडगाव धरणाचे तीन दरवाजे आणि नांद धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आले आहेत. या धरणांमधून होणाऱ्या पाण्याचा विसर्ग थेट वणा नदीच्या पात्रात होत असून नागपूर, उमरेड भागात उसंत घेत पाऊस सुरू असल्याने या दोन्ही जलाशयात पाण्याचा वेग वाढणार आहे. हे दोन्ही जलाशय १०० टक्के भरली असून सध्या जलाशयाचे दरवाजे उघडण्यात आल्याने वणा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे वणा नदीच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सेलू तालुक्यातील बोर प्रकल्पातून १३६.११ क्युमेक पाण्याचा विसर्ग- सेलू तालुक्यातील बोर प्रकल्प ९६.४७ टक्के भरला असून या प्रकल्पाचे सात दरवाजे २५ सेंमीने उघडण्यात आले आहेत. सध्या या जलाशयातून १३६.११ क्युमेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने सेलू तालुक्यातील बोरी, हिंगणी, मोई, किन्ही, घोराड, बेलगाव, सेलू, ब्राह्मणी, कोटंबा, मडका, चानकी, कोपरा, देऊळगाव, गोहदा बुजुर्ग, आर्वी, धामणगाव, धानोली, सुकळी, जयपूर, खडका, पिंपळगाव तर समुद्रपूर तालुक्यातील आष्टा, जेजुरी, बाळापूर, देरडा, खुणी, नांद्रा, सावंगी या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नदी काठावरील गावांनी अशी घ्यावी काळजी...

- कोणत्याही परिस्थितीत पुराच्या पाण्यात प्रवेश करू नये.- नदीपात्राच्या कडेला अथवा धोक्याच्या ठिकाणी वास्तव्यास असल्यास तत्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे.- मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये.- जुन्या मोडकळीस आलेल्या घरात तसेच इमारतीत आश्रय घेऊ नये.- नदी किंवा नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्यास जीव मुठीत घेऊन पूल ओलांडू नये.- धोकादायक ठिकाणी अथवा दरड कोसळणाऱ्या ठिकाणी थांबू नये.- प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकाेरपणे पालन करावे.

 

टॅग्स :RainपाऊसDamधरण