शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

निम्न वर्धा, बोर अन् लाल नालाचे दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 05:00 IST

समुद्रपूर तालुक्याती लाल नाला प्रकल्प १०० टक्के भरला असून, तालुक्यात उसंत घेत पाऊस सुरू आहे. त्यामुळे या जलाशयात येणारा पाण्याचा ओढा लक्षात घेत तसेच धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने या प्रकल्पाचे पाच दरवाजे १० सेंमीने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकल्पातून नदीपात्रात ३२.०२ क्युमेक पाण्याचा विसर्ग होत असून नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील २४ तासांत जिल्ह्यात १४९.५१ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली असून सततच्या पावसामुळे जलाशयांमधील पाणीपातळीत वाढ झाल्याने आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा, सेलू तालुक्यातील बोर धरण तसेच समुद्रपूर तालुक्यातील लाल नाला प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. तीन जलाशयातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मागील २४ तासांत वर्धा तालुक्यात २६.६२ मिमी, सेलू तालुक्यात २८.०० मिमी, देवळी तालुक्यात १६.६०, हिंगणघाट तालुक्यात २२.०० मिमी, समुद्रपूर तालुक्यात ३८.७४ मिमी, आर्वी तालुक्यात १४.१० मिमी तर कारंजा (घा.) तालुक्यात ३.४५ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे. जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत ७३६५.७० मिमी पाऊस पडतो, तर यंदाच्या वर्षी आतापर्यंत जिल्ह्यात ७१२८.६७ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे.

समुद्रपूर तालुक्यातील लाल नाला प्रकल्पाच्या पाच दरवाजातून ३२.०२ क्युमेक पाण्याचा विसर्ग- समुद्रपूर तालुक्याती लाल नाला प्रकल्प १०० टक्के भरला असून, तालुक्यात उसंत घेत पाऊस सुरू आहे. त्यामुळे या जलाशयात येणारा पाण्याचा ओढा लक्षात घेत तसेच धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने या प्रकल्पाचे पाच दरवाजे १० सेंमीने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकल्पातून नदीपात्रात ३२.०२ क्युमेक पाण्याचा विसर्ग होत असून नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सावधान : वणा नदी पात्रात होतोय पाण्याचा विसर्ग- हिंगणघाट : तालुक्यातील वडगाव या प्रकल्पाचे तीन तर नांद प्रकल्पाचे सात दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे वणा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असून नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांमधील नागरिकांनी दक्ष राहण्याच्या सूचना कार्यकारी अभियंता राजेश ढुमणे यांनी दिल्या आहेत. मंगळवारी सकाळी वडगाव धरणाचे तीन दरवाजे आणि नांद धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आले आहेत. या धरणांमधून होणाऱ्या पाण्याचा विसर्ग थेट वणा नदीच्या पात्रात होत असून नागपूर, उमरेड भागात उसंत घेत पाऊस सुरू असल्याने या दोन्ही जलाशयात पाण्याचा वेग वाढणार आहे. हे दोन्ही जलाशय १०० टक्के भरली असून सध्या जलाशयाचे दरवाजे उघडण्यात आल्याने वणा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे वणा नदीच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

सेलू तालुक्यातील बोर प्रकल्पातून १३६.११ क्युमेक पाण्याचा विसर्ग- सेलू तालुक्यातील बोर प्रकल्प ९६.४७ टक्के भरला असून या प्रकल्पाचे सात दरवाजे २५ सेंमीने उघडण्यात आले आहेत. सध्या या जलाशयातून १३६.११ क्युमेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने सेलू तालुक्यातील बोरी, हिंगणी, मोई, किन्ही, घोराड, बेलगाव, सेलू, ब्राह्मणी, कोटंबा, मडका, चानकी, कोपरा, देऊळगाव, गोहदा बुजुर्ग, आर्वी, धामणगाव, धानोली, सुकळी, जयपूर, खडका, पिंपळगाव तर समुद्रपूर तालुक्यातील आष्टा, जेजुरी, बाळापूर, देरडा, खुणी, नांद्रा, सावंगी या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नदी काठावरील गावांनी अशी घ्यावी काळजी...

- कोणत्याही परिस्थितीत पुराच्या पाण्यात प्रवेश करू नये.- नदीपात्राच्या कडेला अथवा धोक्याच्या ठिकाणी वास्तव्यास असल्यास तत्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे.- मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये.- जुन्या मोडकळीस आलेल्या घरात तसेच इमारतीत आश्रय घेऊ नये.- नदी किंवा नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्यास जीव मुठीत घेऊन पूल ओलांडू नये.- धोकादायक ठिकाणी अथवा दरड कोसळणाऱ्या ठिकाणी थांबू नये.- प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे काटेकाेरपणे पालन करावे.

 

टॅग्स :RainपाऊसDamधरण