शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कीडक कापसाच्या नावाखाली कमी भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 23:32 IST

बोंडअळी व विविध रोगांमुळे कपाशीचे उत्पादन कमालीचे घटले. यामुळे शेतकरी संकटात असताना कापसाचे भावही मागील ५-६ दिवसांत कमी झालेत. कापूस किडक असल्याचे कारण देत व्यापारीही केवळ ४ हजार रुपयांनी खरेदी करीत आहेत.

ठळक मुद्देमजुरीही वाढली : पंचनाम्यात अडकली मदत

लोकमत न्यूज नेटवर्कवायगाव (नि.) : बोंडअळी व विविध रोगांमुळे कपाशीचे उत्पादन कमालीचे घटले. यामुळे शेतकरी संकटात असताना कापसाचे भावही मागील ५-६ दिवसांत कमी झालेत. कापूस किडक असल्याचे कारण देत व्यापारीही केवळ ४ हजार रुपयांनी खरेदी करीत आहेत. यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे.राज्य शासनाने मोठा गाजावाजा करून मदतीची घोषणा केली. मात्र ही मदत पंचनाम्यात अडकली असल्याचे वास्तव आहे. कापसावर लाल्या व बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. परिणामी कापसाचे बोंड पूर्णत: सडले. त्यातून कापूस निघालाच नाही. अनेक शेतकऱ्यांनी डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच कपाशी उपडून फेकली. यावर्षी कपाशीचे उत्पादन घटले. एकरी उत्पादनात घट आल्याने कापसाचे भाव तेजीत राहतील, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. डिसेंबरच्या सुरूवातीला कापसाचा भाव ५५०० ते ५६०० रूपये क्विंटल पर्यंत वाढला. जानेवारीच्या महिन्यात चांगल्या कापसाला ५००० ते ५१०० रूपये भाव होता. किडक कापूस ३५०० ते ४००० रूपये दराने व्यापारी खरेदी करीत असल्याने लागवडीचा खर्च निघण्याची आशा मावळली.लागवडीचा खर्च निघण्याची आशा धूसरशेतकरी दुष्काळाने पिडलेला असताना नगदी पीक असलेल्या कपाशीवर बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. शासनाकडून आर्थिक मदत देण्याची घोषणा नागपूर हिवाळी अधिवेशनात करण्यात आली होती. हेक्टरी ३० हजार रूपये मदत देऊ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असले तरी अद्याप कोणतीच कार्यवाही सुरू झालेली नाही. कापसाच्या पिकाला अनुदान जाहीर करावे ही अपेक्षा होती. शासनाने ते कामही सर्वेक्षणाच्या माध्यमातून चालू केले. यात अगोदर विविध अटी घालून शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे. अर्ज भरण्याची अट घातली. यात शेतकऱ्यांची धावपळ झाली व पैसेही खर्च झाले. यावर्षी शेतकऱ्यांना कपाशीसाठी अतिरिक्त खर्च करावा लागला. कपाशी उंच वाढल्याने फवारणीचाही खर्च वाढला. शिवाय वेचणी मजुरांमार्फत करावी लागली. यामुळे शेतकऱ्यांना किलोमागे दिडशे रूपये अतिरिक्त मोजावे लागले होते. सध्या किडक कापसाला चार हजार भाव दिला जातो तर चांगल्या कापसाला ५ हजार भाव मिळत असल्याने शेतकरी व्यथीत झाला आहे.