शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
2
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
3
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
4
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
5
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
6
Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!
7
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
8
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
9
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
10
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
11
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
12
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
13
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
14
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
15
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
16
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
17
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
18
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
19
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
20
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी

कीडक कापसाच्या नावाखाली कमी भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 23:32 IST

बोंडअळी व विविध रोगांमुळे कपाशीचे उत्पादन कमालीचे घटले. यामुळे शेतकरी संकटात असताना कापसाचे भावही मागील ५-६ दिवसांत कमी झालेत. कापूस किडक असल्याचे कारण देत व्यापारीही केवळ ४ हजार रुपयांनी खरेदी करीत आहेत.

ठळक मुद्देमजुरीही वाढली : पंचनाम्यात अडकली मदत

लोकमत न्यूज नेटवर्कवायगाव (नि.) : बोंडअळी व विविध रोगांमुळे कपाशीचे उत्पादन कमालीचे घटले. यामुळे शेतकरी संकटात असताना कापसाचे भावही मागील ५-६ दिवसांत कमी झालेत. कापूस किडक असल्याचे कारण देत व्यापारीही केवळ ४ हजार रुपयांनी खरेदी करीत आहेत. यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे.राज्य शासनाने मोठा गाजावाजा करून मदतीची घोषणा केली. मात्र ही मदत पंचनाम्यात अडकली असल्याचे वास्तव आहे. कापसावर लाल्या व बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. परिणामी कापसाचे बोंड पूर्णत: सडले. त्यातून कापूस निघालाच नाही. अनेक शेतकऱ्यांनी डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच कपाशी उपडून फेकली. यावर्षी कपाशीचे उत्पादन घटले. एकरी उत्पादनात घट आल्याने कापसाचे भाव तेजीत राहतील, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. डिसेंबरच्या सुरूवातीला कापसाचा भाव ५५०० ते ५६०० रूपये क्विंटल पर्यंत वाढला. जानेवारीच्या महिन्यात चांगल्या कापसाला ५००० ते ५१०० रूपये भाव होता. किडक कापूस ३५०० ते ४००० रूपये दराने व्यापारी खरेदी करीत असल्याने लागवडीचा खर्च निघण्याची आशा मावळली.लागवडीचा खर्च निघण्याची आशा धूसरशेतकरी दुष्काळाने पिडलेला असताना नगदी पीक असलेल्या कपाशीवर बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. शासनाकडून आर्थिक मदत देण्याची घोषणा नागपूर हिवाळी अधिवेशनात करण्यात आली होती. हेक्टरी ३० हजार रूपये मदत देऊ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असले तरी अद्याप कोणतीच कार्यवाही सुरू झालेली नाही. कापसाच्या पिकाला अनुदान जाहीर करावे ही अपेक्षा होती. शासनाने ते कामही सर्वेक्षणाच्या माध्यमातून चालू केले. यात अगोदर विविध अटी घालून शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे. अर्ज भरण्याची अट घातली. यात शेतकऱ्यांची धावपळ झाली व पैसेही खर्च झाले. यावर्षी शेतकऱ्यांना कपाशीसाठी अतिरिक्त खर्च करावा लागला. कपाशी उंच वाढल्याने फवारणीचाही खर्च वाढला. शिवाय वेचणी मजुरांमार्फत करावी लागली. यामुळे शेतकऱ्यांना किलोमागे दिडशे रूपये अतिरिक्त मोजावे लागले होते. सध्या किडक कापसाला चार हजार भाव दिला जातो तर चांगल्या कापसाला ५ हजार भाव मिळत असल्याने शेतकरी व्यथीत झाला आहे.