शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

कीडक कापसाच्या नावाखाली कमी भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 23:32 IST

बोंडअळी व विविध रोगांमुळे कपाशीचे उत्पादन कमालीचे घटले. यामुळे शेतकरी संकटात असताना कापसाचे भावही मागील ५-६ दिवसांत कमी झालेत. कापूस किडक असल्याचे कारण देत व्यापारीही केवळ ४ हजार रुपयांनी खरेदी करीत आहेत.

ठळक मुद्देमजुरीही वाढली : पंचनाम्यात अडकली मदत

लोकमत न्यूज नेटवर्कवायगाव (नि.) : बोंडअळी व विविध रोगांमुळे कपाशीचे उत्पादन कमालीचे घटले. यामुळे शेतकरी संकटात असताना कापसाचे भावही मागील ५-६ दिवसांत कमी झालेत. कापूस किडक असल्याचे कारण देत व्यापारीही केवळ ४ हजार रुपयांनी खरेदी करीत आहेत. यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे.राज्य शासनाने मोठा गाजावाजा करून मदतीची घोषणा केली. मात्र ही मदत पंचनाम्यात अडकली असल्याचे वास्तव आहे. कापसावर लाल्या व बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. परिणामी कापसाचे बोंड पूर्णत: सडले. त्यातून कापूस निघालाच नाही. अनेक शेतकऱ्यांनी डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच कपाशी उपडून फेकली. यावर्षी कपाशीचे उत्पादन घटले. एकरी उत्पादनात घट आल्याने कापसाचे भाव तेजीत राहतील, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. डिसेंबरच्या सुरूवातीला कापसाचा भाव ५५०० ते ५६०० रूपये क्विंटल पर्यंत वाढला. जानेवारीच्या महिन्यात चांगल्या कापसाला ५००० ते ५१०० रूपये भाव होता. किडक कापूस ३५०० ते ४००० रूपये दराने व्यापारी खरेदी करीत असल्याने लागवडीचा खर्च निघण्याची आशा मावळली.लागवडीचा खर्च निघण्याची आशा धूसरशेतकरी दुष्काळाने पिडलेला असताना नगदी पीक असलेल्या कपाशीवर बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. शासनाकडून आर्थिक मदत देण्याची घोषणा नागपूर हिवाळी अधिवेशनात करण्यात आली होती. हेक्टरी ३० हजार रूपये मदत देऊ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असले तरी अद्याप कोणतीच कार्यवाही सुरू झालेली नाही. कापसाच्या पिकाला अनुदान जाहीर करावे ही अपेक्षा होती. शासनाने ते कामही सर्वेक्षणाच्या माध्यमातून चालू केले. यात अगोदर विविध अटी घालून शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे. अर्ज भरण्याची अट घातली. यात शेतकऱ्यांची धावपळ झाली व पैसेही खर्च झाले. यावर्षी शेतकऱ्यांना कपाशीसाठी अतिरिक्त खर्च करावा लागला. कपाशी उंच वाढल्याने फवारणीचाही खर्च वाढला. शिवाय वेचणी मजुरांमार्फत करावी लागली. यामुळे शेतकऱ्यांना किलोमागे दिडशे रूपये अतिरिक्त मोजावे लागले होते. सध्या किडक कापसाला चार हजार भाव दिला जातो तर चांगल्या कापसाला ५ हजार भाव मिळत असल्याने शेतकरी व्यथीत झाला आहे.