शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

वर्धेच्या दक्षिणेकडे बायपास मार्गाचा प्रस्ताव लोकसभेत

By admin | Updated: April 28, 2016 01:54 IST

शहराला उत्तर दिशेला बाह्य वळण (बाय पास) असल्याने अनेक जड वाहने बाहेरून आवागमन करतात पण दक्षिण दिशेलासुद्धा बाह्य वळण (बायपास) निर्माण होणे गरजेचे आहे.

रामदास तडस यांची माहिती : शून्य प्रहरात मांडला मुद्दावर्धा : शहराला उत्तर दिशेला बाह्य वळण (बाय पास) असल्याने अनेक जड वाहने बाहेरून आवागमन करतात पण दक्षिण दिशेलासुद्धा बाह्य वळण (बायपास) निर्माण होणे गरजेचे आहे. वाढती लोकसंख्या, प्रदूषण, जड वाहनांचे शहरातून होणारे आवागमन अश्या अनेक समस्या दक्षिण भागाला बाह्य वळण रस्ता नसल्याने वर्धा शहरासमोर उभ्या आहेत. ही प्रमुख समस्या लक्षात घेवून खासदार रामदास तडस यांनी लोकसभेमध्ये शून्य काळात मुद्दा उपस्थित करून याकरिता केंद्रीय मार्ग निधी योजना २०१६-१७ अंतर्गत मंजुरी प्रदान करून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे रेटून धरली. वर्धा शहर बाह्य वळण रस्त्याचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. परंतु राज्य शासनाने मार्च २०१६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये वर्धा शहर बाह्य वळण रस्त्याच्या अधिग्रहणाकरिता भरीव तरतूद उपलब्ध करून दिल्याने हा मुद्दा लवकरच मार्गी लागेल, असा विश्वास खा. तडस यांनी व्यक्त केला आहे.वर्धा शहर जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असून जड वाहतूक पूर्णपणे शहराबाहेरून होणे अपेक्षित आहे. शहराच्या दक्षिण भागाला अनेक मोठे उद्योग असून वर्धा औद्योगिक वसाहत सुद्धा याच दिशेला वसली आहे. वर्धा शहर बाह्य वळण रस्त्याचा विषय मार्गी लागल्यास औद्योगिक घटकांना फायदा होणार आहे. तसेच वर्धा शहरातून होणाऱ्या जड वाहनांचा त्रास सुद्धा कमी होणार आहे.सदर बायपास रस्त्याचा विषय लवकरच मार्गी लागावा, याकरिता येत्या काही दिवसात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे अर्थ व नियोजन तथा वर्धा जिल्हा पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांची प्रत्यक्ष भेट घेवून सदर प्रश्न प्रभावीपणे मांडणार असल्याची माहिती खा. तडस यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.(जिल्हा प्रतिनिधी)