शहरं
Join us  
Trending Stories
1
'वक्फ बोर्डाच्या जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्या'; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

Lok Sabha Election 2019; कमी मतदान होणाऱ्या केंद्रांवर जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 10:37 PM

लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. त्याकरिता २१०४ च्या लोकसभा निवडणुकीत ज्या मतदान केंद्रावर ४० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले असेल, त्या मतदान केंद्र परिसरात व्यापक जनजागृती करण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देटक्केवारी वाढविण्यावर भर : जिल्हाधिकाऱ्यांची पत्रपरिषदेत माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. त्याकरिता २१०४ च्या लोकसभा निवडणुकीत ज्या मतदान केंद्रावर ४० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले असेल, त्या मतदान केंद्र परिसरात व्यापक जनजागृती करण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी पत्रपरिषदेत दिली.लोकसभा निवडणुकीकरिता राष्ट्रीय पक्षांसह नोंदणीकृ त राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त पक्ष व अपक्ष अशा एकूण १६ उमेदवारांनी २३ नामांकन अर्ज दाखल केले होते. ते सर्व नामांकन अर्ज वैध ठरविले असून गुरुवारी दोन अपक्ष उमेदवारांनी नामांकन अर्ज मागे घेतले आहे. त्यामुळे आता १४ उमेदवार लोकसभेच्या निवडणूक रिंगणात आहे. या सर्व उमेदवारांना निवडणूक चिन्ह दिले असून ती यादी मान्यतेकरिता निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्याकरिता प्रशासन प्रयत्नरत असून मतदान केंद्रावर मतदारांची गैरसोय होणार नाही, याचीही काळजी घेतली जाणार आहे. असेही जिल्हाधिकारी भिमनवार यांनी सांगितले.या पत्रकार परिषदेला पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर जिल्हाधिकारी संजय दैने, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रवीण महिरे व जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे यांची उपस्थिती होती.निवडणुकीकरिता प्रशासन सज्जनिवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्याकरिता पुरेशा कर्मचारी वर्गाची नियुक्ती केली आहे. या कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण पूर्ण झाले असून मशीन हाताळण्याचे दुसरे प्रशिक्षण पुढच्या आठवड्यात दिले जाणार आहे. तसेच निवडणूक कार्यात असलेले व इतरही शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना आणि पोलिसांनी मतदानाचा अधिकार बजवावा याकरिताही नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.सोबतच पोलिसांचाही तगडा बंदोबस्त लावण्यात येणार आहे. याकरिता २ डीवायएसपी, ६ पोलीस निरीक्षक, ७ पोलीस उपनिरिक्षक व सहाय्यक पोलीस निरिक्षक, ५५० पोलीस कर्मचारी, ७०० गृहरक्षक दलाचे जवान तसेच राज्य राखीव दलाचे तीन तुकड्या तैनात राहणार आहेत. एका तुकडीत ३० जवानांचा समावेश असेल, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिली.मतदानापूर्वीच झाली ईश्वरचिठ्ठीएरव्ही मतदान झाल्यानंतर मतमोजणीच्या वेळी साधारणत: ईश्वरचिठ्ठी करून उमेदवाराच्या भाग्याचा फैसला केला जातो. परंतुल, आज दोन उमेदवारांनी एकाच निवडणूक चिन्हाची मागणी केल्याने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ईश्वरचिठ्ठी करण्यात आली. राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांना पक्षाचे अधिकृत चिन्ह दिल्यानंतर नोंदणीकृ त राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त पक्षांसह अपक्ष उमेदवारांना चिन्हाची निवड करायची होती. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार धनराज वंजारी व आंबेडकरिस्ट रिपब्लिकन पार्टीचे प्रवीण गाढवे या दोघांनीही एकाच चिन्हाची मागणी केली होती. त्यामुळे झालेल्या ईश्वरचिठ्ठीत गाढवे यांना त्यांच्या पसंतीचे चिन्ह देण्यात आले तर वंजारी यांना दुसरे चिन्ह दिले.