शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
2
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
3
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
4
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
5
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
6
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
7
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
8
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
9
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
10
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
11
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
12
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
13
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
14
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
15
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
16
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
17
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
18
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
19
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
20
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप

Lok Sabha Election 2019; मतदान केंद्रांवर अत्यावश्यक सेवा-सुविधांचा ‘दुष्काळ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 10:41 PM

लोकशाहीच्या उत्सवात अधिकाधिक मतदारांनी सहभागी व्हावे, याकरिता प्रत्येक मतदान केंद्रावर अत्यावश्यक सुविधांमध्ये वाढ करण्यात आली आहे, असा गवगवा जिल्हा निवडणूक विभागाच्यावतीने करण्यात आला. परंतु, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी बहुतांश मतदान केंद्रांवर अत्यावश्यक सुविधांचा दुष्काळ होता.

ठळक मुद्देनियोजन केवळ कागदोपत्रीच : उन्हाच्या झळांमुळे मतदारांची होरपळ, काही ठिकाणी साधे पिण्याचे पाणीही नाही

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लोकशाहीच्या उत्सवात अधिकाधिक मतदारांनी सहभागी व्हावे, याकरिता प्रत्येक मतदान केंद्रावर अत्यावश्यक सुविधांमध्ये वाढ करण्यात आली आहे, असा गवगवा जिल्हा निवडणूक विभागाच्यावतीने करण्यात आला. परंतु, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी बहुतांश मतदान केंद्रांवर अत्यावश्यक सुविधांचा दुष्काळ होता. परिणामी, नागरिकांची उन्हामुळे होरपळ शिवाय पाण्याविना घशालाही कोरड पडलेली होती.लोकसभा निवडणुकीकरिता मतदान केंद्रावर अत्यावश्यक सुविधांची संख्या दुप्पट करून मेडिकल किट, मतदान केंद्रावर सावलीची व्यवस्था, दिव्यांग तसेच गर्भवती महिला मतदारांसाठी स्वयंसेवकांची मदत, लहान मुलांसाठी पाळणाघर, अंध आणि दिव्यांग मतदारांकरिता वाहतुकीची व्यवस्था, रांगेचे व्यवस्थापन, रॅम्पची व्यवस्था, पिण्याचे पाणी, विजेची उपलब्धता, मदत कक्ष, स्वच्छतागृहांची सुविधा या अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्या, अशा सूचना निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्या होत्या.या सूचनेनुसार मेडिकल किटमध्ये वेदनाशामक औषध, बॅण्डेज, ओआरएस पावडर, जखमेवर लावण्यासाठी पट्टी आदी साहित्याबरोबरच प्रत्येक मतदान केंद्रावर एक वैद्यकीय सहाय्यक उपलब्ध असणार, वाढत्या तापमानाची दखल घेताना मतदान केंद्रावर महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार आणि महिलांसोबत असलेल्या लहान मुलांचा उन्हापासून बचावाकरिता सावलीसाठी मंडप टाकण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. परंतु,बहुतांश मतदान केंद्रावर यातील सुविधाच उपलब्ध झाल्या नसल्याचे दिसून आले.काही मतदान केंंद्रावर दहा बाय दहाचा मंडप टाकण्यात आला. यामुळे मतदारांना उन्हाचे चटके सहन करीतच मतदान करावे लागले. मतदान केंद्रावर उन्हाची तीव्रता लक्षात घेता थंड पाण्याची व्यवस्था करणे आवश्यक होते. परंतु, पाण्याचीही व्यवस्था मतदान केंद्रावर नव्हती. पाळणाघर व वैद्यकीय सहाय्यकांचा तर पत्ताच नव्हता. यामुळे प्रशासनाने केवळ कागदोपत्रीच सेवा व सुविधांची व्यवस्था केल्याचे निदर्शनास आले. सुविधा नसल्याने मतदारांनाही याचा नाहक त्रास झाला.मतदार म्हणतात, कंत्राटदार-अधिकारी मालामालनिवडणुकीदरम्यान मतदान केंद्रावरील सुविधा पुरविण्याकरिता निवडणूक आयोगाकडून मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. यावर्षीही सर्व सुविधा पुरविण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात सुविधांची वानवा दिसून आल्याने मतदारांनी नाराजी व्यक्त केली. मतदान केंद्रावर मंडप टाकण्याचा कंत्राट दिल्याची माहिती आहे. या कंत्राटदाराने उभारलेले मंडप हे सात हजार रुपये किमतीचे असल्याचीही चर्चा मतदान केंं द्रावर सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. हजार ते पंधराशे रुपयालाही महाग असलेल्या या मंडपावर इतका मोठा खर्च कसा काय? असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला. तर व्हीलचेअरही ग्रा.पं.कडून पुरविण्यात आल्या. त्यामुळे निवडणुकीचा निधी मोठ्या प्रमाणात कंत्राटदार व अधिकारीच गडप करीत असल्याचा आरोप होत आहे.पोलिसांनी बीएलओंना दाखविला बाहेरचा मार्गमतदान केंद्रावर आलेल्या मतदारांना त्यांचा मतदार यादीतील क्रमांक शोधण्याकरिता तसेच त्यांना चिठ्ठी देण्याकरिता वर्धा शहरातील रामनगरस्थित चित्तरंजनदास या शाळेतील मतदान केंद्रावर बीएलओ बसलेले होते. ते मतदान प्रक्रि येकरिता सहकार्य करीत असताना रामनगर पोलिसांनी त्यांना मतदान केंद्र परिसरात बसण्यास मनाई केली. त्यामुळे त्यांना उन्हातच बसून कर्तव्य बजावावे लागले. पोलिसांच्या या वागणुकीमुळे मतदारांनी रोष व्यक्त केला.स्थानिक कर्मचाऱ्यांकडे दाखविले बोटदेवळी व वर्धा तालुक्यातील बहुतांश मतदान केंद्रांवर मंडपाची व्यवस्थाच नव्हती. ज्या ठिकाणी मंडप टाकण्यात आला तोही अपुरा पडल्याने मतदारांना त्रास झाला. पाण्याचीही व्यवस्था नव्हती. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी तलाठी, पोलीस पाटील यांना यांच्याकडे बोट दाखविले. परंतु, ही जबाबदारी निवडणूक आयोगाने प्रशासनाकडे सोपविली असताना याकडे दुर्लक्ष करण्यात आले, हे विशेष.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकwardha-pcवर्धाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019