शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

जनतेचे लॉकडाऊन,अधिकाऱ्यांचे अप-डाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 05:00 IST

नागपूर, अमरावती व यवतमाळ हे वर्धा जिल्ह्याच्या शेजारील तिन्ही जिल्हे कोरोनाबाधित असल्याने त्यांना वर्धेत येण्याकरिता परवानगी दिली जात नाही; पण या तिन्ही जिल्ह्यातून मात्र शासकीय अधिकारी व कर्मचारी ये-जा करीत असल्याने प्रशासनाप्रती तीव्र संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देप्रशासनाकडूनच नियमांचे उल्लंघन : तपासणी नाक्यावर सर्वसामान्यांनाच अटकाव

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : संचारबंदीमध्ये वर्ध्यातून कोरोनाबाधित जिल्ह्यात जाण्याकरिता सर्वसामान्यांना अटकाव करण्यात आला आहे. मात्र, या बंदीतही शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कोरोनाबाधित जिल्ह्यात संचार सुरुच असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. प्रशासनातील अधिकारी व कर्मचारीच आपल्या ओळखपत्राच्या किंवा प्रवासपासच्या आधारे नियमोल्लंघन करीत असल्याने ‘जनतेसाठी लॉकडाऊन व अधिकाऱ्यांचे अप-डाऊन’ अशी परिस्थिती पहावयास मिळत आहे.कुणाचे लहान मुलं नागपूरात अडकले आहेत. कुणाच्या म्हाताऱ्या आईला यवतमाळातून वर्ध्याला नियमित वैद्यकीय तपासणीसाठी आणायचे आहे तर कुणी आपल्या सासुरवाडीत अमरावतीला अडकून पडले आहे. नागपूर, अमरावती व यवतमाळ हे वर्धा जिल्ह्याच्या शेजारील तिन्ही जिल्हे कोरोनाबाधित असल्याने त्यांना वर्धेत येण्याकरिता परवानगी दिली जात नाही; पण या तिन्ही जिल्ह्यातून मात्र शासकीय अधिकारी व कर्मचारी ये-जा करीत असल्याने प्रशासनाप्रती तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेषत: शनिवार व रविवार अशा दोन दिवस सुट्या असल्याने शुक्रवारीच जिल्ह्यातील काही विभाग विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी आपल्या यवतमाळ, अमरावती व नागपूर येथील स्वगृही गेले आहेत. एकीकडे जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या तपासणी नाक्यावर पोलिसांकडून चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. सर्व वाहने तपासली जात असल्याचे सांगितले जात असतानाच ये-जा करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांची यातून कसे सुटतात हा संशोधनाचा विषय ठरला आहे.... तर आज तपासणी नाक्यावर उलगडणार सत्यशासकीय अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी न राहता यवतमाळ, अमरावती व नागपूर येथून आवागमन करत आहे. यात नागपुरातून ये-जा करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. ही सत्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नाकारली जात आहे. पण, सोमवार हा आठवड्याचा पहिला दिवस असल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी अमरावती, यवतमाळ व नागपूर या तिन्ही जिल्ह्यातून येणाऱ्या सीमांवर सकाळपासून तपासणी केली तर अपडाऊन करणाऱ्यांचे सत्य बाहेर आल्या शिवाय राहणार नाही. पण, प्रशासन हे करणार का? हा मुळ प्रश्न आहे.सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. कुणालाही ये-जा करण्याकरिता प्रवास पास दिलेली नाही. मुख्यालयी न राहता ते अपडाऊन करतात, या संदर्भात माझ्याकडे एकही तक्रार आली नाही. यासंदर्भात संबंधितांकडून माहिती घेऊन कारवाई केली जाईल.- विवेक भिमनवार, जिल्हाधिकारीजिल्ह्याच्या सीमांवर तपासणी नाके लावण्यात आले आहे. त्या ठिकाणी प्रत्येक वाहनांची तपासणी होत असून शासकीय अधिकारी, कर्मचारी व इतर कुणालाही ये-जा करण्यासाठी परवानगी नाही.- नीलेश मोरे, अपर पोलीस अधीक्षक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस