लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : संचारबंदीमध्ये वर्ध्यातून कोरोनाबाधित जिल्ह्यात जाण्याकरिता सर्वसामान्यांना अटकाव करण्यात आला आहे. मात्र, या बंदीतही शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कोरोनाबाधित जिल्ह्यात संचार सुरुच असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. प्रशासनातील अधिकारी व कर्मचारीच आपल्या ओळखपत्राच्या किंवा प्रवासपासच्या आधारे नियमोल्लंघन करीत असल्याने ‘जनतेसाठी लॉकडाऊन व अधिकाऱ्यांचे अप-डाऊन’ अशी परिस्थिती पहावयास मिळत आहे.कुणाचे लहान मुलं नागपूरात अडकले आहेत. कुणाच्या म्हाताऱ्या आईला यवतमाळातून वर्ध्याला नियमित वैद्यकीय तपासणीसाठी आणायचे आहे तर कुणी आपल्या सासुरवाडीत अमरावतीला अडकून पडले आहे. नागपूर, अमरावती व यवतमाळ हे वर्धा जिल्ह्याच्या शेजारील तिन्ही जिल्हे कोरोनाबाधित असल्याने त्यांना वर्धेत येण्याकरिता परवानगी दिली जात नाही; पण या तिन्ही जिल्ह्यातून मात्र शासकीय अधिकारी व कर्मचारी ये-जा करीत असल्याने प्रशासनाप्रती तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेषत: शनिवार व रविवार अशा दोन दिवस सुट्या असल्याने शुक्रवारीच जिल्ह्यातील काही विभाग विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी आपल्या यवतमाळ, अमरावती व नागपूर येथील स्वगृही गेले आहेत. एकीकडे जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या तपासणी नाक्यावर पोलिसांकडून चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. सर्व वाहने तपासली जात असल्याचे सांगितले जात असतानाच ये-जा करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांची यातून कसे सुटतात हा संशोधनाचा विषय ठरला आहे.... तर आज तपासणी नाक्यावर उलगडणार सत्यशासकीय अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी न राहता यवतमाळ, अमरावती व नागपूर येथून आवागमन करत आहे. यात नागपुरातून ये-जा करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. ही सत्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नाकारली जात आहे. पण, सोमवार हा आठवड्याचा पहिला दिवस असल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी अमरावती, यवतमाळ व नागपूर या तिन्ही जिल्ह्यातून येणाऱ्या सीमांवर सकाळपासून तपासणी केली तर अपडाऊन करणाऱ्यांचे सत्य बाहेर आल्या शिवाय राहणार नाही. पण, प्रशासन हे करणार का? हा मुळ प्रश्न आहे.सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. कुणालाही ये-जा करण्याकरिता प्रवास पास दिलेली नाही. मुख्यालयी न राहता ते अपडाऊन करतात, या संदर्भात माझ्याकडे एकही तक्रार आली नाही. यासंदर्भात संबंधितांकडून माहिती घेऊन कारवाई केली जाईल.- विवेक भिमनवार, जिल्हाधिकारीजिल्ह्याच्या सीमांवर तपासणी नाके लावण्यात आले आहे. त्या ठिकाणी प्रत्येक वाहनांची तपासणी होत असून शासकीय अधिकारी, कर्मचारी व इतर कुणालाही ये-जा करण्यासाठी परवानगी नाही.- नीलेश मोरे, अपर पोलीस अधीक्षक
जनतेचे लॉकडाऊन,अधिकाऱ्यांचे अप-डाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 05:00 IST
नागपूर, अमरावती व यवतमाळ हे वर्धा जिल्ह्याच्या शेजारील तिन्ही जिल्हे कोरोनाबाधित असल्याने त्यांना वर्धेत येण्याकरिता परवानगी दिली जात नाही; पण या तिन्ही जिल्ह्यातून मात्र शासकीय अधिकारी व कर्मचारी ये-जा करीत असल्याने प्रशासनाप्रती तीव्र संताप व्यक्त होत आहे.
जनतेचे लॉकडाऊन,अधिकाऱ्यांचे अप-डाऊन
ठळक मुद्देप्रशासनाकडूनच नियमांचे उल्लंघन : तपासणी नाक्यावर सर्वसामान्यांनाच अटकाव