शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

दिवाळ सणातही भटकंतीचेच जगणे

By admin | Updated: October 30, 2016 00:52 IST

हिंदू संस्कृतिमध्ये सण, उत्सवांना प्रचंड महत्त्वाचे स्थान आहे. शिवाय परंपरांचा भारी पगडा असल्याने गरीब असो वा श्रीमंत तो सणांची श्रीमंती पाळल्याशिवाय राहत नाही.

पाल टाकून राहुटी : उदरनिर्वाहासाठी विविध वस्तूंच्या विक्रीसाठी वणवणप्रशांत हेलोंडे  वर्धाहिंदू संस्कृतिमध्ये सण, उत्सवांना प्रचंड महत्त्वाचे स्थान आहे. शिवाय परंपरांचा भारी पगडा असल्याने गरीब असो वा श्रीमंत तो सणांची श्रीमंती पाळल्याशिवाय राहत नाही. प्रसंगी डोईवर कर्जाचा भारा सहन करीत सण, उत्सव साजरा करण्याकडे नागरिकांचा कल असतो; पण भटकंतीचे जीवन जगणाऱ्या, दोन वेळच्या जेवणासाठी जीवाचे राण करणाऱ्या, मुला-बाळांसाठी काही करता येते का यासाठी झटणारा एक वर्ग प्रत्येक सणांपासून अलिप्तच दिसून येते. समाजातील हे वास्तव कधी बदलणार, असाच सवाल जणू ती पाल टाकून वास्तव्य करणारी कुटुंबे करताना दिसतात. भारतीय समाज हा सण, उत्सव प्रिय आहे. प्रत्येक सण मग, तो कोणत्याही धर्म, जाती, समाजाचा असो येथे गुण्यागोविंदाने साजरा करण्यासाठी सर्वच जण धडपडत असल्याचे दिसते; पण काही कुटुंबे या सर्वांपासून अलिप्त असल्याचेच पाहावयास मिळते. त्यांच्या चिमुकल्यांना कसल्याही सण, उत्सवांची भ्रांत नसते. किंबहुना, कधी कुठला सण आहे, हे देखील या चिमुकल्यांना माहिती नसते. त्यांना केवळ कळते ते आई-वडिलांच्या सोबत अमूक वस्तू विकायला जायचे आहे. आता आपल्या सोबतचे सर्व कोणत्या गावात जाणार, तेथे किती दिवस राहणार हे देखील त्यांना माहिती नसते. यंदा दिवाळीचा सण हा सोयाबीन काढणीच्या वेळेवरच आला आहे. यामुळे शेतकऱ्यांची सोयाबीन काढणी आणि विक्रीची लगबग सुरू आहे. यासाठी महाराष्ट्रातील मराठवाडा, चंद्रपूर जिल्ह्यासह छत्तीसगड राज्यातील मजूर जिल्ह्यात दाखल झाले आहेत. या मजुरांना कुठल्याही सणाची तमा नाही. केवळ दोन वेळच्या जेवणाची वा महिनाभर जगण्यापूरता पैसा कसा जमविता येईल, याचीच चिंता असते. यासाठी कुटुंबातील आबालवृद्ध या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात शेतांमध्ये राबताना दिसून येतात. या कुटुंबातील मुले-मुलीही शिक्षणाचा नाद सोडून आई-वडिलांच्या संगतीने शेतात राबताना दिसून येतात. या कुटुंबांवरही हार्वेस्टरने गंडांतर आणले आहे. दिवाळी हा महत्त्वाचा सण तोंडावर असल्याने अनेक शेतकऱ्यांनी लगबगीने शेतातील सोयाबीनची सवंगणी केली. सोयाबीनच्या भरवशावरच दिवाळी असल्याने शेतकऱ्यांचाही नाईलाज होता; पण या मजूर कुटुंबांचा मात्र पोटमारा झाल्याचे चित्र जिल्हाभर पाहावयास मिळत आहे. १०० कुटुंबे शहरात दाखल झाली असतील तर त्यातील ६० ते ७० कुटुंबांना काम मिळत असल्याचे चित्र आहे. दिवाळी सणासाठी विविध वस्तूंची विक्री करण्याकरिताही काही कुटुंबे शहरात डेरेदाखल झाली आहेत. या कुटुंबांचीही अशीच करुण कहाणी आहे. दिवसभर वस्तूंची विक्री केल्यानंतर सायंकाळी आपल्या चिमुरड्यांना भरवण्याइतपत मिळकत त्यांच्या पदरी पडत असल्याचे दिसून येते. शहराच्या काही भागात पाल टाकून वास्तव्य करणारी कुटुंबे आढळतात. या कुटुंबीयांना कुठल्या सणाचा मागमुस नसतो. केवळ पोटाची खळगी भरणे आणि त्यातून काही पदरी राहिले तर सण, उत्सव हेच त्यांचे जीवण झाल्याचे दिसून येत आहे. समाजातील हे वास्तव गत कित्येक वर्षांपासून बदलाची अपेक्षा केली जात आहे; पण ती निरर्थक ठरत असल्याचेच दिसून येत आहे. गावोगावी भटकंती करणाऱ्या या कुटुंबांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांच्या चिमुकल्यांना शिक्षणाचा गंध देण्याकरिता चिंतन व कार्याची जोड गरजेची झाली आहे.