शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळ सणातही भटकंतीचेच जगणे

By admin | Updated: October 30, 2016 00:52 IST

हिंदू संस्कृतिमध्ये सण, उत्सवांना प्रचंड महत्त्वाचे स्थान आहे. शिवाय परंपरांचा भारी पगडा असल्याने गरीब असो वा श्रीमंत तो सणांची श्रीमंती पाळल्याशिवाय राहत नाही.

पाल टाकून राहुटी : उदरनिर्वाहासाठी विविध वस्तूंच्या विक्रीसाठी वणवणप्रशांत हेलोंडे  वर्धाहिंदू संस्कृतिमध्ये सण, उत्सवांना प्रचंड महत्त्वाचे स्थान आहे. शिवाय परंपरांचा भारी पगडा असल्याने गरीब असो वा श्रीमंत तो सणांची श्रीमंती पाळल्याशिवाय राहत नाही. प्रसंगी डोईवर कर्जाचा भारा सहन करीत सण, उत्सव साजरा करण्याकडे नागरिकांचा कल असतो; पण भटकंतीचे जीवन जगणाऱ्या, दोन वेळच्या जेवणासाठी जीवाचे राण करणाऱ्या, मुला-बाळांसाठी काही करता येते का यासाठी झटणारा एक वर्ग प्रत्येक सणांपासून अलिप्तच दिसून येते. समाजातील हे वास्तव कधी बदलणार, असाच सवाल जणू ती पाल टाकून वास्तव्य करणारी कुटुंबे करताना दिसतात. भारतीय समाज हा सण, उत्सव प्रिय आहे. प्रत्येक सण मग, तो कोणत्याही धर्म, जाती, समाजाचा असो येथे गुण्यागोविंदाने साजरा करण्यासाठी सर्वच जण धडपडत असल्याचे दिसते; पण काही कुटुंबे या सर्वांपासून अलिप्त असल्याचेच पाहावयास मिळते. त्यांच्या चिमुकल्यांना कसल्याही सण, उत्सवांची भ्रांत नसते. किंबहुना, कधी कुठला सण आहे, हे देखील या चिमुकल्यांना माहिती नसते. त्यांना केवळ कळते ते आई-वडिलांच्या सोबत अमूक वस्तू विकायला जायचे आहे. आता आपल्या सोबतचे सर्व कोणत्या गावात जाणार, तेथे किती दिवस राहणार हे देखील त्यांना माहिती नसते. यंदा दिवाळीचा सण हा सोयाबीन काढणीच्या वेळेवरच आला आहे. यामुळे शेतकऱ्यांची सोयाबीन काढणी आणि विक्रीची लगबग सुरू आहे. यासाठी महाराष्ट्रातील मराठवाडा, चंद्रपूर जिल्ह्यासह छत्तीसगड राज्यातील मजूर जिल्ह्यात दाखल झाले आहेत. या मजुरांना कुठल्याही सणाची तमा नाही. केवळ दोन वेळच्या जेवणाची वा महिनाभर जगण्यापूरता पैसा कसा जमविता येईल, याचीच चिंता असते. यासाठी कुटुंबातील आबालवृद्ध या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात शेतांमध्ये राबताना दिसून येतात. या कुटुंबातील मुले-मुलीही शिक्षणाचा नाद सोडून आई-वडिलांच्या संगतीने शेतात राबताना दिसून येतात. या कुटुंबांवरही हार्वेस्टरने गंडांतर आणले आहे. दिवाळी हा महत्त्वाचा सण तोंडावर असल्याने अनेक शेतकऱ्यांनी लगबगीने शेतातील सोयाबीनची सवंगणी केली. सोयाबीनच्या भरवशावरच दिवाळी असल्याने शेतकऱ्यांचाही नाईलाज होता; पण या मजूर कुटुंबांचा मात्र पोटमारा झाल्याचे चित्र जिल्हाभर पाहावयास मिळत आहे. १०० कुटुंबे शहरात दाखल झाली असतील तर त्यातील ६० ते ७० कुटुंबांना काम मिळत असल्याचे चित्र आहे. दिवाळी सणासाठी विविध वस्तूंची विक्री करण्याकरिताही काही कुटुंबे शहरात डेरेदाखल झाली आहेत. या कुटुंबांचीही अशीच करुण कहाणी आहे. दिवसभर वस्तूंची विक्री केल्यानंतर सायंकाळी आपल्या चिमुरड्यांना भरवण्याइतपत मिळकत त्यांच्या पदरी पडत असल्याचे दिसून येते. शहराच्या काही भागात पाल टाकून वास्तव्य करणारी कुटुंबे आढळतात. या कुटुंबीयांना कुठल्या सणाचा मागमुस नसतो. केवळ पोटाची खळगी भरणे आणि त्यातून काही पदरी राहिले तर सण, उत्सव हेच त्यांचे जीवण झाल्याचे दिसून येत आहे. समाजातील हे वास्तव गत कित्येक वर्षांपासून बदलाची अपेक्षा केली जात आहे; पण ती निरर्थक ठरत असल्याचेच दिसून येत आहे. गावोगावी भटकंती करणाऱ्या या कुटुंबांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांच्या चिमुकल्यांना शिक्षणाचा गंध देण्याकरिता चिंतन व कार्याची जोड गरजेची झाली आहे.