शहरं
Join us  
Trending Stories
1
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
2
Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले
3
शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
4
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
5
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
6
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
7
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
8
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
9
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
10
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
11
चुकीला माफी नाही! आता WhatsApp ही देणार शिक्षा; 24 तासांसाठी बॅन होणार अकाऊंट
12
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
13
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
14
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
15
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
"आम्हाला मत न दिल्यास वीज कापू"; काँग्रेस आमदाराची जनतेला धमकी, Video व्हायरल
18
ठाणे, कल्याणमध्ये राज ठाकरेंच्या सभा होणार; श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंनी घेतली भेट
19
Qualification scenario for MI & RCB : मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमध्ये जाण्याचं गणित सापडलं; RCB लाही त्यानं बळ मिळालं
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

तीन वर्षांत ५६ शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 11:10 PM

शेतकरी आत्महत्यांनी अख्खा जिल्हा ढवळून निघत आहे. विविध उपाययोजना केल्यानंतरही तालुक्यात जानेवारी २०१५ ते २२ सप्टेंबर २०१७ या तीन वर्षांच्या कालावधीत एकूण ५६ शेतकऱ्यांनी मृत्यू जवळ केला आहे.

ठळक मुद्दे ३८ आत्महत्या ठरल्या पात्र : १९ कुटुंबीयांना नाकारली मदत

सुरेंद्र डाफ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : शेतकरी आत्महत्यांनी अख्खा जिल्हा ढवळून निघत आहे. विविध उपाययोजना केल्यानंतरही तालुक्यात जानेवारी २०१५ ते २२ सप्टेंबर २०१७ या तीन वर्षांच्या कालावधीत एकूण ५६ शेतकऱ्यांनी मृत्यू जवळ केला आहे. आर्थिक संकटाला कंटाळून या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद महसूल विभागाने घेतली आहे.सततची नापिकी आणि कर्जाला कंटाळून २६ जानेवारी २०१५ या वर्षात तालुक्यात २२ शेतकºयांनी आत्महत्या केल्या. यापैकी पाच आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्यात. या आत्महत्या वडगाव, राजणी, आर्वी, सोरटा, चोरांबा, टाकरखेडा, सालफळ, सालधरा, मोरांगणा, पाचोड (ठाकूर), वाढोणा, मांडला, धनोडी, वाढोणा, चिंचोली (डांगे), विरूळ (आ.), धनोडी, टोणा या गावांतील आहेत.२०१६ मध्ये २० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यात १४ शेतकरी आत्महत्या पात्र ठरविल्या असून सहा आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्या. सर्कसपूर, सावळापूर, हैबतपूर, बेल्हारा, विरुळ, पाचेगाव, नांदपूर, खुबगाव, पिंपळगाव, जळगाव, टाकळी, आर्वी, बेल्हारा, रसुलाबाद, वर्धमनेरी, धनोडी, निंबोली (शेंडे), चिंचोली (डांगे), मदना आदी गावांतील ते शेतकरी होते.२०१७ मध्ये १७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यात ७ आत्महत्या पात्र ठरल्या तर ८ आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्या. दोन प्रकरणे अद्यापही प्रलंबित आहेत. या शेतकरी आत्हत्या सोनेगाव, कर्माबाद, सोरटा, पिंपळा, आर्वी, पाचोड, सावरखेडा, आर्वी, बोथली (कि़), पाचोड, धनोडी, हुसेनपूर, रोहणा, डबलीपूर, लाडेगाव, अहिरवाडा या गावांत झाल्यात.तालुक्यात तीन वर्षांत ५६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्या .आर्थिक विंवचनेतून झाल्या असताना १९ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. बहुतांश आत्महत्या विष प्राशन करून करण्यात आल्याचेही नमूद करण्यात आलेले आहे. शेतकºयांच्या वाढत्या आत्महत्यांमुळे कृषी धोरणाकडे गांभीर्याने पाहण गरजेचे झाले आहे. शासन, प्रशासन मात्र याबाबत गंभीर नसल्याचेच चित्र पाहावयास मिळत आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या