शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
2
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
3
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
4
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
5
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
6
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
7
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
8
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
9
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
10
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
11
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
12
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
13
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
14
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
15
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
16
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
17
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
18
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
19
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
20
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पट्टे रखडल्याने रमाई घरकूल अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 00:08 IST

वर्धा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ७४ ग्रामपंचायतीमध्ये पट्टे वाटपाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडून पडले आहे. त्यामुळे रमाई घरकूल योजनेचा लाभ घेण्यास लाभार्थ्यांना अडचणीचे जात आहे. शासनाने पट्टे वाटप तातडीने करा याबाबत शासन निर्णय घेतला असला तरी प्रशासनाने पट्टे वाटपाचे काम प्रलंबितच ठेवल्याने लाभार्थी त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देलाभार्थ्यांना त्रास : शासन निर्णयानंतरही प्रशासनाची गती मंदच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ७४ ग्रामपंचायतीमध्ये पट्टे वाटपाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडून पडले आहे. त्यामुळे रमाई घरकूल योजनेचा लाभ घेण्यास लाभार्थ्यांना अडचणीचे जात आहे. शासनाने पट्टे वाटप तातडीने करा याबाबत शासन निर्णय घेतला असला तरी प्रशासनाने पट्टे वाटपाचे काम प्रलंबितच ठेवल्याने लाभार्थी त्रस्त झाले आहेत.वर्धा पं.स. अंतर्गत ७४ ग्रा.पं. येतात. या ग्रा.पं.च्या हद्दीत सरकारच्या मालकीची जमीन मोठ्या प्रमाणावर आहे. येथे प्लॉट पाडून गरजू नागरिकांना घरकुल बांधकामासाठी जागा वितरीत करा, अशा सूचना दिल्या आहे. या प्लॉटसाठी शासकीय दरानुसार पैसे भरण्यासाठी लाभार्थी तयार असताना पट्टे वितरणाचे काम प्रलंबित पडले आहे. मध्यंतरीच्या काळात युवा परिवर्तन की आवाज या संघटनेने मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर पायदळ मोर्चा काढल्यानंतर राज्य सरकारने पट्टे वाटपाबाबत ८ आॅगस्ट २०१८ शासन निर्णय घेतला. शिवाय शासकीय दरानुसार पट्टे वितरीत करा, अशा सूचना वर्धा जिल्हा प्रशासनाला दिल्या. पाच ते साडेपाच महिन्याचा कालावधी लोटूनही पट्टे वितरणाचे काम झालेले नाही. त्यामुळे वर्धा पंचायत समितीला असलेले १ हजार १०० रमाई घरकुल योजनेचे उद्दीष्ट पूर्ण होण्यास अडचण निर्माण होणार आहे.सधन लाभार्थी व मोठ्या गावांना अधिक फायदापंचायत समितीला देण्यात आलेले रमाई घरकुल योजनेचे उद्दीष्ट संपूर्ण ग्रामपंचायतींतर्गत समप्रमाणात पूर्ण होत नाही. वर्धा शहरालगत असलेल्या मोठ्या पाच ते सहा ग्रामपंचायतीच्या हद्दीत राहणारे लाभार्थी सधन स्थितीत असल्याने पैसे भरून प्लॉट घेतात. त्यांना रमाई योजनेचा लाभ दिला जातो. तसेच उद्दीष्ट पूर्ण करून घेतले जाते. त्यामुळे पंचायत समितीतील लहान ग्रामपंचायतीतील लाभार्थी मागे पडत आहे. अनेक ठिकाणी या सरकारी जागांवर अतिक्रमण होऊन गेले आहे. ते हटवून प्लॉट वितरणाचे काम थंडावलेले आहे.पालकमंत्र्यांच्या आदेशालाही केराची टोपलीसेवाग्राम येथील ५१ लाभार्थ्यांना प्लॉट देवून घरकुल मंजूर करावे, असे पत्र पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १५ आॅक्टोबर २०१८ ला जिल्हाधिकाºयांना दिले. मात्र, त्यानंतरही प्लॉट वितरणाची कारवाई झाली नाही. तसेच रमाई योजनेचा लाभही देण्यात आला नाही.वर्धा पं.स.अंतर्गत अनेक ग्रा.पं. नी पट्टे वितरणाचे काम केले नाही. त्यामुळे ५ ते ६ वर्षांपासून नागरिक पट्ट्यांपासून वंचित आहे. पट्टा नसल्याने त्यांना घरकुल योजनेचा लाभ घेता येत नाही. शासनाचा निर्णय असतानाही प्रशासन दिरंगाईची भूमिका घेत आहे. सेवाग्राम येथे दिव्यांग लाभार्थ्यांना डावलून ठराविक लोकांना पट्टे दिले.-मिलिंद भेंडे, माजी सभापती, जि.प. वर्धा.२०१३ पासून सेवाग्रामचे प्रकरण प्रलंबित२०१३ मध्ये सेवाग्राम ग्रामपंचायती अंतर्गत आदर्शनगर भागात पट्टे मिळण्याबाबत अतिक्रमण करून राहणाºया नागरिकांनी ग्रामपंचायतकडे अर्ज केला होता. या भागात ५१ नागरिकांनी अर्ज केले. ५१ प्लॉट तेव्हा शिल्लक होते. मधल्या काळात राजकीय लोकांनी दबाव वापरून १६ लोकांना येथे प्लॉट मिळवून दिले. ३५ लाभार्थी अजूनही वंचित आहे. यामध्ये दिव्यांग लाभार्थ्यांचा समावेश आहे. त्यांना डावलून यादीत नसलेल्या लोकांना १,५०० फुटाचे प्लॉट देण्यात आले. अजूनही ५१ लाभार्थ्यांची यादी कायम आहे. या लाभार्थ्यांनी प्रशासनाकडे पैसे भरण्याची तयारी दर्शविली. परंतु, ग्रामपंचायत याबाबत उदासीन आहे. प्लॉट नसल्यामुळे २०१३ मध्ये घरकुल मंजूर होऊनही त्यांना बांधकाम करता आले नाही.केवळ ८४ प्रस्तावच आलेवर्धा पंचायत समितीला रमाई घरकुल योजनेचे १,१५० उद्दीष्ट देण्यात आले आहे. प्र-पत्र ‘ड’ मधील लाभार्थ्यांचे नाव पाठविण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. त्यातील लाभार्थ्यांना घरकुल मंजूर केले जातात. उद्दीष्ट मोठे असले तरी आतापर्यंत वर्धा पंचायत समितीत ग्रामपंचायतीकडून केवळ ८४ प्रस्तावच आले आहेत. ते मंजूर करण्यात आले, अशी माहिती वर्धा पंचायत समितीच्या प्रशासकीय सुत्रांनी दिली आहे.