शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

नामांकनासाठी अखेरचे दोन दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 06:00 IST

विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजताच उमेदवारी मिळविण्यासाठी धावपळ उडाली. युती आणि आघाडीच्या उमेदवारांनासह इतरही पक्षाचे आणि अपक्ष उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार २७ सप्टेंबरपासून नामांकन अर्ज घेण्याकरिता सुरुवात केली. आजपर्यंत वर्धा, देवळी, आर्वी व हिंगणघाट या चारही विधानसभा मतदार संघातून १४४ उमेदवारांनी तब्बल २७४ अर्जांची उचल केली आहे.

ठळक मुद्देसुट्यांचा खोडा : मंगळवारपर्यंत १४४ जणांकडून २७४ अर्जाची उचल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होताच जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघातून नामनिर्देशन अर्जाची उचल सुरु झाली. अर्ज भरण्याकरिता आठ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. पण, त्यामध्ये दोन सुट्या आल्याने आता नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याकरिता केवळ तीन दिवस शिल्लक राहिले आहे. त्यातही उद्याची गांधी जयंतीची सुटी असल्यामुळे दोन दिवसच उमेदवारांच्या हाती असल्याने गुरुवार आणि शुक्रवारी नामनिर्देशन भरण्याकरिता उपविभागीय कार्यालयात उमेदवारांची गर्दी उसळण्याची शक्यता आहे.विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजताच उमेदवारी मिळविण्यासाठी धावपळ उडाली. युती आणि आघाडीच्या उमेदवारांनासह इतरही पक्षाचे आणि अपक्ष उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार २७ सप्टेंबरपासून नामांकन अर्ज घेण्याकरिता सुरुवात केली. आजपर्यंत वर्धा, देवळी, आर्वी व हिंगणघाट या चारही विधानसभा मतदार संघातून १४४ उमेदवारांनी तब्बल २७४ अर्जांची उचल केली आहे. यामध्ये हिंगणघाट आणि वर्धा विधानसभा मतदार संघात अर्जाची उचल करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मंगळवारी सायंकाळपर्यंत वर्धा विधानसभा मतदार संघातून ४४ जणांनी ८० अर्जांची उचल केली. हिंगणघाटमध्ये ४८ उमेदवारांनी ५०, देवळीमध्ये ३२ उमेदवारांनी ८३ तर आर्वी विधानसभा क्षेत्रातून २० जणांनी ६१ अर्जांची उचल केली आहे. या चारही मतदार संघात केवळ आर्वी येथेच एका अपक्ष उमेदवाराने नामनिर्देशन भरले आहे. आज नामनिर्देशन अर्ज भरण्याकरिता दिलेल्या आठ दिवसाच्या कालावधीपैकी पाच दिवस उलटले आहे.पण, अद्यापही वर्धा, देवळी आणि हिंगणघाटमध्ये एकही अर्ज दाखल झालेला नाही.उद्याला गांधी जयंतीची सुटी आल्याने दोनच दिवस उमेदवारांच्या हाती आहे. त्यामुळे आज काही उमेदवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव सुरु केली होती. आता गुरुवार आणि शुक्रवारी पक्षांच्या उमदेवारांकडून शक्तिप्रदर्शनाव्दारे उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.निवडणूक काळात सुट्यांचा सप्ताहनिवडणूक कार्यक्रमानुसार २७ स्पटेंबर ते २५ ऑक्टोबरपर्यंतच्या कालावधीत जवळपास सात सुट्या आल्या आहेत. नामांकन अर्ज भरण्याच्या दुसºयाच दिवशी सर्वपित्री अमावश्या, तिसºया दिवशी घटस्थापना आणि सहाव्या दिवशी महात्मा गांधी जयंतीची सुटी आल्याने अर्ज भरण्याच्या कालावधीतच तीन सुट्यांचा अडथळा निर्माण झाला. त्यानंतर ४ आक्टोबर ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख असून ५ आक्टोबरला अर्जाची छाननी होणार आहे. दुसºया दिवशी रविवार असल्याने ७ ऑक्टोबरला अर्ज मागे घेण्याचा शेवटा दिवस आहे. त्यानंतर ८ ऑक्टोबरपासून प्रचाराला सुरुवात होणार आहे.पण, त्याच दिवशी दसरा असल्याने सुटी आली आहे. प्रचाराकरिता बारा दिवस दिले असून त्यातही दसरा, कोजागिरी पोर्णिमा व संकष्ट चतुर्थी अशा सुट्या आल्या आहे.१९ ऑक्टोबर या बाराव्या दिवशी प्रचार तोफा थंडावणार असून दुसऱ्या दिवशी रविवार आहे. त्यानंतर सोमवारी मतदान होणार आहे. दोन दिवसाच्या प्रतीक्षेनंतर २४ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार असून पुन्हा २५ ऑक्टोबरला दिवाळीची सुटी आहे. त्यामुळे विजयी उमेदवार यावर्षी निकालांती दिवाळी साजरी करणार आहे. पण, अल्प कालावधीत मतदारांपर्यंत पाहोचण्याकरिता उमेदवारांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.डॉ. पंकज भोयर गुरुवारी दाखल करणार नामांकनवर्धा विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार डॉ. पंकज भोयर गुरुवारी नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. दुपारी १ वाजता शिवाजी चौकातून पायदळ मिरवणूक काढून उपविभागीय कार्यालयात ते अर्ज दाखल करतील.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019