शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
4
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
5
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
6
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
7
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
8
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
9
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
10
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
11
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
12
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
13
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
14
पोरी हुश्शार! भारतीय महिला फुटबॉल टीमने रचला इतिहास, २० वर्षांनी आशियाई कपसाठी क्वालिफाय
15
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
16
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
17
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
18
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
19
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
20
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?

पांढऱ्या सोन्यातून निघताहेत अळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 05:00 IST

खरीप हंगामाच्या सुरूवातीला वेळोवेळी झालेला पाऊस उभ्या सोयाबीन आणि कपाशी पिकासाठी संजीवनी ठरला. पण सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसाचा उभ्या पिकांना चांगलाच फटका बसला. अशातच सोयाबीनच्या उत्पन्नात मोठी घट आली आहे. तर सध्या जिल्ह्यात ढगाळी वातावरण कायम असल्याने कापूस उत्पादक शेतकरी कापूस वेचणीच्या कामाला गती देत आहेत.

ठळक मुद्देचिकणी भागातील शेतकऱ्यांच्या वाढल्या अडचणी : कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : थांबून थांबून कोसळणाऱ्या पावसाने सध्या विश्रांती घेतली असली तरी वेचणी करून घरात साठविलेल्या कापसातून अळ्या निघत असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.खरीप हंगामाच्या सुरूवातीला वेळोवेळी झालेला पाऊस उभ्या सोयाबीन आणि कपाशी पिकासाठी संजीवनी ठरला. पण सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसाचा उभ्या पिकांना चांगलाच फटका बसला. अशातच सोयाबीनच्या उत्पन्नात मोठी घट आली आहे. तर सध्या जिल्ह्यात ढगाळी वातावरण कायम असल्याने कापूस उत्पादक शेतकरी कापूस वेचणीच्या कामाला गती देत आहेत. पण वेचणी करून घरात आणलेला कापूस साठविल्यानंतर त्यातून अळ्या निघत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली असून कृषी विभागाने हवालदील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.उभ्या पिकावर बोंडअळीचा अटॅकचिकणी परिसरातील कपाशी पिकावर सध्या गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या भागातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. असे असले तरी कृषी विभाग उंटावरून शेळ्या हाकलत असल्याची ओरड शेतकरी करीत आहेत. बोंडअळीमुळे यंदा उत्पादनात घट होईल, अशी शक्यता आहे.

टॅग्स :cottonकापूसFarmerशेतकरी