शहरं
Join us  
Trending Stories
1
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
2
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
3
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
4
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
5
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
6
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
7
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
8
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
9
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
10
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

करारनाम्यावरच रखडली भूसंपादन प्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 10:19 PM

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाकरिता जमीन संपादनाचा करारनामा करण्यात आला; मात्र चार महिने लोटूनही मौजा पिपरी (मेघे), पांढरकवडा येथील शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेती पडितच ठेवली.

ठळक मुद्देशेतीही पडित । न्याय न मिळाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाकरिता जमीन संपादनाचा करारनामा करण्यात आला; मात्र चार महिने लोटूनही मौजा पिपरी (मेघे), पांढरकवडा येथील शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेती पडितच ठेवली. अन्यायग्रस्त शेतकºयांनी मोबदला तातडीने देण्याची मागणी केली असून अन्यथा बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग इंटरचेंजसाठी लागणाऱ्या जमिनीकरिता १८ जानेवारी २०१९ ला सूचना प्रसिद्ध करण्यात आली. यानंतर भूसंपादनाची घोषणा करण्यात आली. पिपरी (मेघे), पांढरकवडा येथील ८७ शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्याबाबत जाहीर सूचना देण्यात आली. शेतकºयांनी भूमापनाकरिता संमती दिल्यानंतर मोजणी झाली. या प्रक्रियेअंतर्गत उपविभागीय अधिकारी, वर्धा यांच्याकडे आक्षेप मागविण्यात आले होते. भूसंपादनाकरिता दाव्याची रक्कम व तपशील अर्ज करण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले. एमएसआरडीसीतर्फे १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर जमीन संपादनाचा करारनामा करण्यात आला. मोबदल्याच्या रकमेविषयी शेतकºयांना अवगत करण्यासोबतच पैसे आठ दिवसांत जमा होतील, शेती करू नका असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यातील अनेक शेतकऱ्यांनी जमीन घेण्याकरिता दुसरीकडे पैसे देऊन करारनामा केला. महिनाभरानंतर शेतकरी विचारणा करण्यास गेले असता डिझाईन चेंज झाल्याचे कारण पुढे करण्यात आले. या दरम्यान समृद्धी महामार्गाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत करारनामे झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नसल्याबाबत ठामपणे सांगण्यात आले. मात्र चार महिन्यांचा कालावधी लोटूनसुद्धा शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही. दुसरीकडे शेती पडीत ठेवल्याने नुकसान झाले. करार केलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा; अन्यथा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा पिपरी, पांढरकवडा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.