शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

लालपरीला बसस्थानकाची ‘अ‍ॅलर्जी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 23:30 IST

सेवाग्राम येथे राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्या बसस्थानकांवर न येता रस्त्यावर थांबविल्या जातात. त्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांना अपघात होण्याची दाट शक्यता आहे. महामंडळाच्या लाल परीला बसस्थानकाची अलर्जी असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ठळक मुद्देविद्यार्थी राहतात रस्त्यावर उभे : मोठ्या अपघाताची भीती

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : सेवाग्राम येथे राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्या बसस्थानकांवर न येता रस्त्यावर थांबविल्या जातात. त्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांना अपघात होण्याची दाट शक्यता आहे. महामंडळाच्या लाल परीला बसस्थानकाची अलर्जी असल्याचे चित्र दिसून येत आहे.येथे जागतिक स्तरावरील प्रसिद्ध महात्मा गांधीजींचे आश्रम आहे. देश विदेशातील पर्यटक आणि दर्शनार्थी मोठ्या संख्येनी भेट देतात. तसेच अध्ययनासाठी येत असतात. ऐवढेच नाही तर बापुरावजी देशमुख अभियांत्रिकी आणि यशवंत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आहे. शहरच नव्हे तर ग्रामीण भागातील विद्यार्थी शाळा, महाविद्यालयात शिक्षणासाठी येतात. यात बहुसंख्य विद्यार्थी सामान्य परिवारातील असल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीने येणे जाणे करतात. यात अन्य प्रवाशांचा समावेश आहे. पण लालपरीला बसस्थानकाची अ‍ॅलर्जी असल्याने काही बसेस रोडवर थांबून पुढे जातात. यावर प्रवाशांची तीव्र नापसंती दर्शविली आहे.१५ आॅगस्ट १९९८ मध्ये राज्यमंत्री अनिल देशमुख यांच्याहस्ते बसस्थानकाचे उद्घाटन झाले. सेवाग्राम मार्गे वर्धा ते समुद्रपूर, चिमूर व परत अशा दिवसाला साधारण ४४ व सुपर बसेस ५ अशा फेऱ्या आहेत. बसच्या फेऱ्या सकाळपासून तर रात्रीपर्यंत सुरू असतात.महामंडळाने प्रवाशांच्या सोईसाठी बसस्थानक बनविले. या ठिकाणी बसेस आल्या तर सर्व प्रवाशी बसस्थानकात बसणार पण बरेचदा बस रस्त्यावर थांबत असल्याने प्रवाशी झाडाखाली थांबणे, पुलावर बसणे, पसंत करतात. विद्यार्थी प्रवाशांची संख्या यात सर्वाधिक आहे. बसस्थानकावर बसगाड्या न आणता रस्त्यावर उभ्या करण्यात येत असल्याने अपघात होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळStudentविद्यार्थी