शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
4
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
5
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
6
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
7
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
8
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
9
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
10
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
11
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
12
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
13
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
14
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
15
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
16
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
17
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
18
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
19
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
20
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
Daily Top 2Weekly Top 5

लालपरीचा प्रवास असुरक्षित; अग्निशमन यंत्र दिसेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील सर्वाधिक नागरिक राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसने प्रवास करतात. त्यामुळे ‘लोकमत’ ने महामंडळाच्या बसेसमध्ये अग्निशमन यंत्राची सुविधा आहे की नाही, याबाबत आर्वी बसस्थानकावर आलेल्या प्रत्येक बसची पाहणी केली असता बसेसमध्ये अग्निशमन यंत्रच नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. अग्निशमन यंत्र बसविण्याकडे महामंडळाचेही दुर्लक्ष होत असल्याने प्रवासी लालपरीत आगीच्या धगेवर प्रवास करीत असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देवाय-फाय सुविधा गुंडाळली : आठवड्यात सहा धावत्या वाहनांनी घेतला पेट, चांगली सेवा देण्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्षच

राजेश सोळंकीलोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : ‘एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास’ असे ब्रीद घेऊन शहरापासून गावखेड्यापर्यंत धावणारी राज्य परिवहन महामंडळाची लालपरी खऱ्या अर्थाने लोकवाहिनी ठरली. मात्र, खिळखिळ्या झालेल्या बसेस, सोयी-सुविधांचा अभावामुळे आता लालपरीतील प्रवास असुरक्षित ठरु लागला आहे. महामंडळाच्या बसेसमध्ये असलेली अग्निशमन यंत्रेही बेपत्ता झाली असून याकडे महामंडळाचेही दुर्लक्ष असल्याने प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात असल्याचे चित्र आर्वी बसस्थानकावर उभ्या असलेल्या बसमध्ये पाहणी केल्यानंतर दिसून आले आहे.जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरात विविध प्रकारच्या सहा धावत्या वाहनांनी अचानक पेट घेतल्याच्या घटना घडल्यात. आता काही दिवसांनी उन्हाळा सुरु होणार असून वर्ध्यातील पारा ३२ अंशापार जात असल्याने आगीच्या घटनेत वाढ होतात. जिल्ह्यातील सर्वाधिक नागरिक राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसने प्रवास करतात. त्यामुळे ‘लोकमत’ ने महामंडळाच्या बसेसमध्ये अग्निशमन यंत्राची सुविधा आहे की नाही, याबाबत आर्वी बसस्थानकावर आलेल्या प्रत्येक बसची पाहणी केली असता बसेसमध्ये अग्निशमन यंत्रच नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. अग्निशमन यंत्र बसविण्याकडे महामंडळाचेही दुर्लक्ष होत असल्याने प्रवासी लालपरीत आगीच्या धगेवर प्रवास करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून अग्निशमन यंत्र बसविण्याची गरज आहे. 

प्रथमोपचार पेट्या बेपत्तालालपरीमध्ये प्रवास करीत असताना कुठे काही अपघात झाला तर प्रवाशांसह चालक-वाहकांवर प्रथमोपचार करण्यासाठी चालकाच्या कॅबिनमध्ये प्रथमोपचार पेट्या बसविण्यात आल्या होत्या. त्या पेट्याही एसटी बसमधून बेपत्ता झाल्या आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून बसमध्ये प्रथमोपचार पेट्या नसल्याने प्रवाशांसह चालक-वाहकांचीही सुरक्षा ऐरणी आली आहे. एकंदरीत एसटी बसबाबत असलेल्या ‘एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास’ या ब्रीद वाक्यातील ‘सुरक्षित’ हा शब्दच हद्दपार होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मनोरंजनाचे साधनही हिरावलेअ‍ॅड्रॉईड मोबाईलच्या युगात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मनोरंजन व्हावे. याकरिता प्रत्येक बसेसमध्ये वाय-फाय यंत्रणा बसविण्यात आली होती. याचा कंत्राट एका खासगी कंपनीकडे होता. परंतु, वर्षभरातच यंत्रणेचा बोजवारा उडाला. बसेसमधील ही सुविधा बंद झाली असून काही बसेसमध्ये केवळ बॉक्स पहायला मिळत आहे. त्यामुळे मनोरंजनाकरिता असलेले साधन अल्पावधीतच हिरावल्याने प्रवाश्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

आर्वी आगारातून नियमित ४४ बसेस धावतात. या बसेसच्या एकूण २४२ फेऱ्या होत असून दररोज १७ हजार ५०० किलोमीटरचा प्रवास करतात. यातून एका दिवसाला साडेचार ते पाच लाखांचे उत्पन्न मिळते. सुरक्षिततेच्या दृष्टीने आर्वी आगाराच्या अनेक बसेसमध्ये अग्निशमन यंत्र आहेत. परंतु वाय-फाय सुविधा संबंधित कंपनीने बंद केल्याचे दिसून येत आहे.- नीलिमा हजारे, बसस्थानक प्रमुख, आर्वी.

 

टॅग्स :state transportएसटी