शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

लालपरीचा प्रवास असुरक्षित; अग्निशमन यंत्र दिसेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील सर्वाधिक नागरिक राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसने प्रवास करतात. त्यामुळे ‘लोकमत’ ने महामंडळाच्या बसेसमध्ये अग्निशमन यंत्राची सुविधा आहे की नाही, याबाबत आर्वी बसस्थानकावर आलेल्या प्रत्येक बसची पाहणी केली असता बसेसमध्ये अग्निशमन यंत्रच नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. अग्निशमन यंत्र बसविण्याकडे महामंडळाचेही दुर्लक्ष होत असल्याने प्रवासी लालपरीत आगीच्या धगेवर प्रवास करीत असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देवाय-फाय सुविधा गुंडाळली : आठवड्यात सहा धावत्या वाहनांनी घेतला पेट, चांगली सेवा देण्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्षच

राजेश सोळंकीलोकमत न्यूज नेटवर्कदेऊरवाडा/आर्वी : ‘एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास’ असे ब्रीद घेऊन शहरापासून गावखेड्यापर्यंत धावणारी राज्य परिवहन महामंडळाची लालपरी खऱ्या अर्थाने लोकवाहिनी ठरली. मात्र, खिळखिळ्या झालेल्या बसेस, सोयी-सुविधांचा अभावामुळे आता लालपरीतील प्रवास असुरक्षित ठरु लागला आहे. महामंडळाच्या बसेसमध्ये असलेली अग्निशमन यंत्रेही बेपत्ता झाली असून याकडे महामंडळाचेही दुर्लक्ष असल्याने प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात असल्याचे चित्र आर्वी बसस्थानकावर उभ्या असलेल्या बसमध्ये पाहणी केल्यानंतर दिसून आले आहे.जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरात विविध प्रकारच्या सहा धावत्या वाहनांनी अचानक पेट घेतल्याच्या घटना घडल्यात. आता काही दिवसांनी उन्हाळा सुरु होणार असून वर्ध्यातील पारा ३२ अंशापार जात असल्याने आगीच्या घटनेत वाढ होतात. जिल्ह्यातील सर्वाधिक नागरिक राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसने प्रवास करतात. त्यामुळे ‘लोकमत’ ने महामंडळाच्या बसेसमध्ये अग्निशमन यंत्राची सुविधा आहे की नाही, याबाबत आर्वी बसस्थानकावर आलेल्या प्रत्येक बसची पाहणी केली असता बसेसमध्ये अग्निशमन यंत्रच नसल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. अग्निशमन यंत्र बसविण्याकडे महामंडळाचेही दुर्लक्ष होत असल्याने प्रवासी लालपरीत आगीच्या धगेवर प्रवास करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून अग्निशमन यंत्र बसविण्याची गरज आहे. 

प्रथमोपचार पेट्या बेपत्तालालपरीमध्ये प्रवास करीत असताना कुठे काही अपघात झाला तर प्रवाशांसह चालक-वाहकांवर प्रथमोपचार करण्यासाठी चालकाच्या कॅबिनमध्ये प्रथमोपचार पेट्या बसविण्यात आल्या होत्या. त्या पेट्याही एसटी बसमधून बेपत्ता झाल्या आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून बसमध्ये प्रथमोपचार पेट्या नसल्याने प्रवाशांसह चालक-वाहकांचीही सुरक्षा ऐरणी आली आहे. एकंदरीत एसटी बसबाबत असलेल्या ‘एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास’ या ब्रीद वाक्यातील ‘सुरक्षित’ हा शब्दच हद्दपार होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मनोरंजनाचे साधनही हिरावलेअ‍ॅड्रॉईड मोबाईलच्या युगात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मनोरंजन व्हावे. याकरिता प्रत्येक बसेसमध्ये वाय-फाय यंत्रणा बसविण्यात आली होती. याचा कंत्राट एका खासगी कंपनीकडे होता. परंतु, वर्षभरातच यंत्रणेचा बोजवारा उडाला. बसेसमधील ही सुविधा बंद झाली असून काही बसेसमध्ये केवळ बॉक्स पहायला मिळत आहे. त्यामुळे मनोरंजनाकरिता असलेले साधन अल्पावधीतच हिरावल्याने प्रवाश्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

आर्वी आगारातून नियमित ४४ बसेस धावतात. या बसेसच्या एकूण २४२ फेऱ्या होत असून दररोज १७ हजार ५०० किलोमीटरचा प्रवास करतात. यातून एका दिवसाला साडेचार ते पाच लाखांचे उत्पन्न मिळते. सुरक्षिततेच्या दृष्टीने आर्वी आगाराच्या अनेक बसेसमध्ये अग्निशमन यंत्र आहेत. परंतु वाय-फाय सुविधा संबंधित कंपनीने बंद केल्याचे दिसून येत आहे.- नीलिमा हजारे, बसस्थानक प्रमुख, आर्वी.

 

टॅग्स :state transportएसटी