शहरं
Join us  
Trending Stories
1
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
2
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
3
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
4
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
5
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
6
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
7
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
8
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
9
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
10
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
11
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
12
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा
13
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
14
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
15
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
16
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
17
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
18
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
19
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप
20
सिंधमध्ये पाकिस्तान सरकारला विरोध तीव्र, बेनझीर भुत्तोंच्या लेकीच्या ताफ्याला घेराव, लाठ्या काठ्यांनी हल्ला   

लाखात, कोटीत घोषणा पण; शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 15:29 IST

केंद्र सरकार लाखात, कोटीत घोषणा करतात मात्र, वास्तविकता फार वेगळी राहत असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडले. अशा घोषणाबाजीतून चुकीचा संदेश दिल्यात जात असल्याचे मत, शेतकरी संघटनेचे पाईक विजय जावंधिया यांनी व्यक्त केले असून सरकारच्या हमीभावार टीकाही केली आहे.

ठळक मुद्देशासनाच्या धोरणाविषयी व्यक्त केली चिंता

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : हंगामापूर्वी केंद्र शासनाने खरीप पिकांचे हमीभाव जाहीर केलेत. तेव्हा उत्पादन खर्चावर ५० ते ८० टक्के नफा देणारे भाव वाढवून दिल्याचे सांगण्यात आले. केंद्र सरकार लाखात, कोटीत घोषणा करतात मात्र, वास्तविकता फार वेगळी राहत असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडले. अशा घोषणाबाजीतून चुकीचा संदेश दिल्यात जात असल्याचे मत, शेतकरी संघटनेचे पाईक विजय जावंधिया यांनी व्यक्त केले असून सरकारच्या हमीभावार टीकाही केली आहे.केंद्र सरकारने नेहमीच्या कार्यपद्धतीप्रमाणे केवळ ३ ते १० टक्क्यापर्यंत हमीभाव वाढविले असताना शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चावर ५० ते ८० टक्के हमीभाव वाढविल्याचा डांगोरा पिटला जात आहे. त्यामुळे लोकांमध्ये गैरसमज निर्माण होतो. मोदी सरकारने सत्तेत येण्यापूर्वी ५० टक्के नफा जोडून हमीभाव देऊ, असे जाहीर केले पण, दिले नाही. स्वाभिमान आयोगाच्या शिफारशींची योग्य अंमलबजावणी अद्याप केलेली नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा किती भाव वाढलेत, हे सरकारने लक्षात घ्यावे, असा प्रश्नही जावंधिया यांनी उपस्थित केला आहे. कापसाचे भाव ५ हजार ५५० रुपयांवरुन ५ हजार ८२५ रुपये क्विंटल केले. तुरीचे भाव ५ हजार ८०० रुपयांवरुन ६ हजार रुपये क्विंटल केलेत. धान, तूर, हरभरा, मका यापैकी आजही शेतकºयांच्या कुठल्याच शेतमालाला हमीभाव मिळत नाही. खरेदी केंद्र नसल्याने कमी भावात शेतमाल विकावा लागत आहे. जागतिक बाजारपेठेतील स्थितीनुसार कापसाला ४ हजार ५०० रुपयांच्यावर भाव देऊ शकत नाही. देशाची अर्थव्यवस्था अब्जावधीची करताना, शेतमालाचे हमीभाव दुप्पट होतील का? याचे उत्तर पंतप्रधानांनी ‘मन की बात’ मध्ये द्यावे, असेही शेतकरी नेते विजय जावंधिया म्हणाले.

व्यापाऱ्यांच्या खरेदीत शेतमालाला भावाचं संरक्षण द्याकेंद्र सरकारने यावर्षी ३ ते १० टक्क्यापर्यंत हमीभाव वाढवून निव्वळ धूळफेक केली आहे. शेतकऱ्यांना आत्मनिर्भय करण्यासाठी जगातून कोणताही शेतमाल हमी पेक्षा कमी भावात आयात होणार नाही. वायदे बाजार आणि गावांमध्ये व्यापाऱ्यांकडून थेट खरेदीतही भावाचे संरक्षण करण्याची घोषणा सरकारने करावी, अशी मागणीही जावंधिया यांनी केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी