शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

टंचाईग्रस्त नागरिकांना पाणी वाटण्याचा ध्यास

By admin | Updated: June 13, 2016 00:39 IST

पाणीटंचाई निवारणार्थ शासनस्तरावर विविध योजना राबविण्यात येत आहे. पण यातील कित्येक योजना या केवळ कागदोपत्रीच राहतात.

मिशन पाणीटंचाई निराकरण : हिंगणघाट व आसपासच्या परिसराला पाणीपुरवठाहिंगणघाट : पाणीटंचाई निवारणार्थ शासनस्तरावर विविध योजना राबविण्यात येत आहे. पण यातील कित्येक योजना या केवळ कागदोपत्रीच राहतात. परिणामी नागरिकांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागतच आहे. ही बाब लक्षात घेत हिंगणघाट व आसपासच्या परिसरातील नागरिकांना मनसे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी पाणी वाटण्याचा उपक्रम महाराष्ट्र दिनापासून हाती घेतला. आजतागायत अखंडपणे त्यांचे पाणीवाटप सुरूच आहे. त्यामुळे ते नागरिकांसाठी जलमित्रच ठरत आहे. हिंगणघाट शहर आणि आसपासच्या गावांना पाणीटंचाईच्या झळा आजही सोसाव्या लागत आहे. शासन त्यांना पाणी देण्यास अकार्यक्षम ठरत आहे. त्यामुळे वांदिले यांनी ‘मिशन पाणी टंचाई निराकरण’ हा उपक्रमच सुरू केला. यासाठी त्यांनी चार टँकरची व्यवस्था केली. स्वत:च्या शेतातील विहिरीतून तसेच इतरही स्त्रोतांमधून पाणी मिळवून नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला. यासाठी वॉर्डनिहाय कार्यकर्त्यांची स्वतंत्र फळी निर्माण केली. चालक व मदतनिसांच्या वेळा ठरवून दिल्या. शहरातील जवळपास प्रत्येक घरी भ्रमणध्वनी क्रमांक देत पाण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन केले. सकाळी ५.३० ते रात्री ११.३० पर्यंत अखंड पाणीवाटप ते करीत आहेत. यासाठी त्यांच्यासोबत प्रवीण श्रीवास्तव, राहुल सोरटे, सतीश झिलपे, अमोल भुसारी, अमोल बोरकर, सुनील भूते, रमेश घंगारे, राजू सिन्हा, किशोर चांभारे, नितीन भुते, सुशील घोडे, सोनू लांजेवार, नरेश चिरकुटे, गजानन कलोडे, अमित गावंडे परिश्रम घेत आहेत.(तालुका प्रतिनिधी)